शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही हे जाहीरच करा ना!

By संदीप प्रधान | Updated: October 18, 2023 08:46 IST

टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, ही अगदी सामान्य अपेक्षा आहे. पण ते होणार नसेल, तर रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही, असे तरी सरळ जाहीर करा!

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत

‘रस्ते बांधणे, त्याची देखभाल करणे ही सरकारची जबाबदारी नाही, असे राज्यातील सरकार कधी जाहीर करणार आहे’, असा थेट सवाल जनतेच्यावतीने करण्याची वेळ आली आहे. टोल वसुलीच्या नावावर राज्यात सुरू असलेली बेसुमार लूट, रस्त्यांची दुरवस्था, टोल वसुलीच्या कंत्राटामधील राजकीय लागेबांधे, टोल कंत्राटदारांबाबत सरकारमधील मंत्री व अधिकारी यांचे दिसणारे उघड उघड ममत्व यामुळे हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल वसुलीच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. 

निवडणुका दिसू लागल्यावर मनसेचे टोलबाबत आक्रमक होणे नवीन नाही. मनसैनिकांनी अगोदर उपोषण, निदर्शने यांची गांधीगिरी केली. त्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहनांना टोलमाफी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मनसैनिकांनी टोलनाक्यांवर जाऊन प्रवाशांना तो व्हिडिओ दाखवत टोल न भरण्याची विनंती केली. अर्थात टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल वसूल केल्याखेरीज एकाही प्रवाशाला पुढे जाऊ दिले नाही हा भाग अलाहिदा. देशात लोकसभेच्या व त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्याने कदाचित मुंबई एंट्री पॉइंट व अन्य काही ठिकाणी मतदान होईपर्यंत चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचे ‘औदार्य’ कदाचित सरकार दाखवेल. यापूर्वी २०१५ मध्ये काही नाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद केला असला तरी त्यामुळे टोल कंत्राटदारांचे होणारे नुकसान सरकार भरून देत आहे. तोच कित्ता गिरवला जाईल.

महाराष्ट्रात २००० च्या दशकात टोल संस्कृती उदयाला आल्यापासून ज्या रस्त्यांवर टोल आकारला जात आहे. त्या रस्त्यांच्या बांधणी, दुरुस्ती व देखभाल यावर किती रक्कम खर्च झाली. त्या रस्त्यांवर कंत्राटदाराने आतापर्यंत किती टोल वसूल केला व किती नफा कमावला, याची आकडेवारी सरकार जाहीर करीत नसल्याने लोकांच्या मनात शंका आहेत. ज्या रस्त्यांवर टोल आकारला जात आहे तो रस्ता खराब असेल तर टोल वसुली थांबवण्याची तरतूद सरकारने का केलेली नाही? टोल कंत्राटदारांनी टोल आकारला पण रस्त्याची अवस्था खराब असेल तर त्याच्याकडून दंड का वसूल केल जात नाही? टोल कंत्राटदारांवर सरकार इतके मेहरबान असल्याचे कारण टोल वसूल करणाऱ्या कंपन्या वरकरणी खासगी भासत असल्या तरी बहुतांश टोलनाक्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची भागीदारी आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपले बगलबच्चे टोल वसुलीकरिता नाक्यांवर बसवले आहेत. 

राज्यात विविध रस्त्यांवर टोल आकारणी होत असताना मुंबई फ्री वे या २२ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर टोल आकारणी केलेली नाही. जर हा रस्ता टोल न आकारता लोकांच्या सेवेत असू शकतो तर अन्य रस्त्यांवर टोल का, असा मुंबईकरांचा सवाल आहे. पेट्रोल-डिझेलवरील सेस, वाहन खरेदी करताना आकारला जाणारा कर, कमर्शियल वाहनांना परवाने देताना आरटीओकडून आकारला जाणारा कर वगैरे मार्गाने जमा होणारे शेकडो कोटी रुपये सरकार रस्त्यांची देखभाल करण्यावर खर्च करत नाही तर मग या पैशाचे काय केले जाते? 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उभारणीकरिता कंत्राटदाराने ९०० कोटी रुपये सरकारला भरले. १५ वर्षे टोल वसुलीची परवानगी दिली. या काळात कंत्राटदार २८६९ कोटी रुपये वसूल करणार ही अपेक्षा असताना कंत्राटदाराने ४८६९ कोटी वसूल केल्याची माहिती सरकारनेच दिली आहे. सरकारने स्वत: टोल वसुलीची यंत्रणा उभी केली असती तर ही मोठी रक्कम वाचली असती. पुणे ते बेळगाव किंवा मुंबई ते अहमदाबाद रस्त्यावर प्रवास करताना अनेक प्रवासी महाराष्ट्राची हद्द ओलांडल्यावर रस्ते तुलनेने कित्येक पट चांगले असल्याचे सांगतात. कोल्हापूर ते बेळगाव या प्रवासात ५० पैसे प्रति किलोमीटर दराने प्रवास होतो. त्याचवेळी महाराष्ट्रात दीड रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास होतो. शिवाय कर्नाटकात टोलचा रस्ता पकडायचा नसेल तर सर्व्हिस रोडने प्रवासाची मुभा आहे. टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, अन्यथा रस्ते ही जबाबदारी सरकारने सोडल्याचे सरळ जाहीर करा!

टॅग्स :tollplazaटोलनाका