शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याखाली अंधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:24 IST

ग्रामपंचायतींना जादा स्वायत्तता मिळावी. गावाचा विकास करताना ग्रामपंचायतीला सरकार वा प्रशासकीय स्तरावर अडचणी येऊ नये यासाठी सक्षमीकरणाची मोहीम देशभरात राबविण्यात आली.

ग्रामपंचायतींना जादा स्वायत्तता मिळावी. गावाचा विकास करताना ग्रामपंचायतीला सरकार वा प्रशासकीय स्तरावर अडचणी येऊ नये यासाठी सक्षमीकरणाची मोहीम देशभरात राबविण्यात आली. यात आपला पुरोगामी महाराष्ट्रही मागे नाही. येथे तर सरपंचाची निवडणूक थेट जनतेच्या माध्यमातून करण्याचा कौतुकास्तपद निर्णय घेण्यात आला. मात्र लोकशाही कधी कधी अतिस्वायत्तता आणि त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या अधिकारात कपात करण्यात आल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर महापालिकेत एलईडी लाईटच्या खरेदीचा घोटाळा ताजा असताना नागपूर जिल्ह्यातील ६३८ ग्रामंपचायतीमध्ये एलईडी लाईटच्या खरेदीवर अवास्तव निधी उधळल्याची बाब पुढे आली आहे. या घोटाळ्यात थेट जनेतून निवडून आलेल्या सरंपचावरही नागपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाने ठपका ठेवला आहे. अंदाजे २५ कोटी रुपयांच्या लाईट खरेदी घोटाळ्याप्रकरणी पंचायत राज विभागाने १३ विस्तार अधिकाºयांसह ६३८ सरपंच, सचिवांना नोटीस बजावली आहे. विकासाच्या प्रवाहात गावात प्रकाशव्यवस्था करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अधिकचा पैसा उधळल्याने ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण झाले की भ्रष्टाचार वाढला, ही निश्चितच चिंतनाची बाब आहे. दिल्लीतून येणारा एक रुपया गावापर्यंत पोहोचताना घटत येतो असा काँग्रेसचे सरकार असताना विरोधकांकडून आरोप होत होता. यानंतर आता वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळू लागला. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीला विकास निधी थेट मिळत असल्याने त्यांना गावात एलईडी लाईट बसवायचे होते. आयएसआय मार्क व ठरवून दिलेल्या आकृतिबंधानुसार ही खरेदी करायची होती़ परंतु ग्रामपंचायतींनी हजार रुपयांची होणारी खरेदी ५ ते १० हजार रुपयांना दाखविली़ या खरेदीत सर्वाधिक घोळ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कामठी, सावनेर तालुक्यात झाला आहे़. राजकीयदृष्ट्या विचार केला तर या तीनपैकी दोन तालुक्यात भाजपचे प्रभृत्व जास्त आहे. त्यामुळे घोटाळे केवळ कॉँग्रेसच्या काळात होत होते. भाजपच्या काळात याला थारा नाही, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे ठरेल. मुळात ग्रामविकासात राजकीय पक्षापेक्षा गावाचा विकास आणि गावाच्या प्रमुखाला कायद्याने अधिक अधिकार दिले असले तरी भारतीय स्वातंत्र्यानंतर आजही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. उलट गावाच्या राजकारणात आणि तेथील पक्षीय कलहात वाढ झाली आहे. विद्यमान मोदी सरकारने देशात ‘साफ नियत, सही विकास’ हा नारा दिला असतानाच देशात, राज्यात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपचे सरकार असताना साध्या एलईडी लाईटच्या खरेदीत भ्रष्टाचार होणे. चौकशी समितीत यावर शिक्कामोर्तब होणे, ही बाब मोदी सरकारच्या ‘साफ नियत, सही विकास’ या संकल्पाला हरताळ फासणारी आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असल्याने गावात उजेड पडणार कसा ?