शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

दिठी : श्वासात भरून घ्यावा, उरात जपावा असा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 09:21 IST

उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख भोगणाऱ्या माणसांची पाऊस-भिजली अनोखी कहाणी

- शर्वरी कलोती-जोशी

एका खेड्यातलं रामजी लोहाराचं कुटुंब! प्रौढ रामजी, त्याचा तरणाताठा मुलगा व पोटुशी सून! बरं चाललेलं असतं त्यांचं!काही काळासाठी सांसारिक व्यापातून अलिप्त होऊन विठोबाच्या वारीला तीसेक वर्षं नेमानं जाणारा रामजी हा तसा श्रद्धाळू इसम! जमलं तर पुण्यसंचय होईल आणि आयुष्याच्या वाटेवर पुढंमागं कधी संकंटांचा सामना करावा लागला, तर दरवर्षीच्या वाऱ्यांची पुण्याई कामात येईल असा साधा सरळ हिशेब असणारा मर्त्य माणूस! 

पण हातातोंडाशी आलेला त्याचा तरुण मुलगा गावच्या ओढ्यात वाहून जातो व मृत्युमुखी पडतो. रामजीला हा पराकोटीचा दुर्दैवी आघात सहन होत नाही. त्यातच त्याची सून एका मुलीला जन्म देते. सुनंच्या पोटी मुलगाच परतून येईल, या भाबड्या आशेवर असलेला रामजी सुनेला मुलगी झाली, हे स्वीकारूच शकत नाही. तो अधिकाधिक कठोर होत जातो. स्वत:शी, सुनेशी आणि त्या नव्या कोवळ्या बाळाशीदेखील वैर धरतो. नजरेसमोर नको होते त्याला सून व ते नवजात बाळही! 

विख्यात लेखक दि.बा. मोकाशी यांच्या ‘आमोद सुनांसी आले’ या कथेवर आधारित ‘दिठी’ या सिनेमात अक्षरश: प्राण ओतलाय तो  सुमित्रा भावे यांनी. अविरत कोसळणारा पाऊस, दाटलेलं मळभ आणि त्याच्याशीच लगटलेला सभोवताल कॅमेऱ्यानं हुबेहूब टिपलाय. किशोर कदम, डाॅ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकार, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, अंजली पाटील यांनी या व्यक्तिरेखांना पडद्यावर बेमालूम उतरवलं आहे.

उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख… सारं काही विठ्ठलाच्या साक्षीनंच भोगायचं किंवा त्यागायचं अशा वारकरी परंपरेची जपणूक करणारी भोळीभाबडी माणसं हे रामजीचे सवंगडी! ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन ग्रंथांना आपलं मार्गदर्शक मानणारे… जीवनातल्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरंदेखील यांच्या पारायणातून शोधू पाहणारी ही माणसं! जीवन जगत राहण्यासाठीची, सुख-दु:खाला सामोरं जाण्यासाठीची प्रेरणा विठ्ठलाठायी शोधणारी आणि त्यावरच्या अपार श्रद्धेलाच आपला तारणहार मानणारी.

संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान तीस वर्षे आळंदीच्या वाऱ्या करूनही रामजीला कळत नाही, ते केवळ एका प्रसंगानं त्याला उमगतं. गावातल्या एका अडलेल्या गायीची अतिशय कठीण प्रसूती करवताना रामजीला हा साक्षत्कार होतो. मातृत्वाच्या वेणांच्या वेदना अनुभवताना जणू त्याचाही पुनर्जन्म होतो. गायीसारखीच आपली सूनही तडफडली ‌असेल. बाळाला जन्म देताना ही जाणीव होते आणि  दु:खावेगाची झड ओसरून विशुद्ध झालेल्या अंत:करणात कैवल्याचं चांदणं पसरतं. विधवा सून व नातीसाठी स्वीकाराचा भाव उरात जन्म घेतो. 

सुख- दु:ख, जीवन- मृत्यू हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्याला हे एकदा स्वीकारता आलं की सुख- दु:ख, जन्म आणि मृत्यू हे पॅराडाॅक्स एकच होऊन जातात- जसं नृत्य आणि नर्तक, फूल आणि फुलपाखरू. स्वत:ला त्याच्या चरणी विलीन करता येणं हे जमायला हवं. रामजीला झालेला हा साक्षात्कार! सुमित्रा भावेंनी इहलोकीची यात्रा संपवण्यापूर्वी मराठी सिनेमासाठी ‘दिठी’ हा अमृतानुभव मागं ठेवून दिला आहे.

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशे