शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

दिठी : श्वासात भरून घ्यावा, उरात जपावा असा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 09:21 IST

उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख भोगणाऱ्या माणसांची पाऊस-भिजली अनोखी कहाणी

- शर्वरी कलोती-जोशी

एका खेड्यातलं रामजी लोहाराचं कुटुंब! प्रौढ रामजी, त्याचा तरणाताठा मुलगा व पोटुशी सून! बरं चाललेलं असतं त्यांचं!काही काळासाठी सांसारिक व्यापातून अलिप्त होऊन विठोबाच्या वारीला तीसेक वर्षं नेमानं जाणारा रामजी हा तसा श्रद्धाळू इसम! जमलं तर पुण्यसंचय होईल आणि आयुष्याच्या वाटेवर पुढंमागं कधी संकंटांचा सामना करावा लागला, तर दरवर्षीच्या वाऱ्यांची पुण्याई कामात येईल असा साधा सरळ हिशेब असणारा मर्त्य माणूस! 

पण हातातोंडाशी आलेला त्याचा तरुण मुलगा गावच्या ओढ्यात वाहून जातो व मृत्युमुखी पडतो. रामजीला हा पराकोटीचा दुर्दैवी आघात सहन होत नाही. त्यातच त्याची सून एका मुलीला जन्म देते. सुनंच्या पोटी मुलगाच परतून येईल, या भाबड्या आशेवर असलेला रामजी सुनेला मुलगी झाली, हे स्वीकारूच शकत नाही. तो अधिकाधिक कठोर होत जातो. स्वत:शी, सुनेशी आणि त्या नव्या कोवळ्या बाळाशीदेखील वैर धरतो. नजरेसमोर नको होते त्याला सून व ते नवजात बाळही! 

विख्यात लेखक दि.बा. मोकाशी यांच्या ‘आमोद सुनांसी आले’ या कथेवर आधारित ‘दिठी’ या सिनेमात अक्षरश: प्राण ओतलाय तो  सुमित्रा भावे यांनी. अविरत कोसळणारा पाऊस, दाटलेलं मळभ आणि त्याच्याशीच लगटलेला सभोवताल कॅमेऱ्यानं हुबेहूब टिपलाय. किशोर कदम, डाॅ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकार, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, अंजली पाटील यांनी या व्यक्तिरेखांना पडद्यावर बेमालूम उतरवलं आहे.

उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख… सारं काही विठ्ठलाच्या साक्षीनंच भोगायचं किंवा त्यागायचं अशा वारकरी परंपरेची जपणूक करणारी भोळीभाबडी माणसं हे रामजीचे सवंगडी! ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन ग्रंथांना आपलं मार्गदर्शक मानणारे… जीवनातल्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरंदेखील यांच्या पारायणातून शोधू पाहणारी ही माणसं! जीवन जगत राहण्यासाठीची, सुख-दु:खाला सामोरं जाण्यासाठीची प्रेरणा विठ्ठलाठायी शोधणारी आणि त्यावरच्या अपार श्रद्धेलाच आपला तारणहार मानणारी.

संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान तीस वर्षे आळंदीच्या वाऱ्या करूनही रामजीला कळत नाही, ते केवळ एका प्रसंगानं त्याला उमगतं. गावातल्या एका अडलेल्या गायीची अतिशय कठीण प्रसूती करवताना रामजीला हा साक्षत्कार होतो. मातृत्वाच्या वेणांच्या वेदना अनुभवताना जणू त्याचाही पुनर्जन्म होतो. गायीसारखीच आपली सूनही तडफडली ‌असेल. बाळाला जन्म देताना ही जाणीव होते आणि  दु:खावेगाची झड ओसरून विशुद्ध झालेल्या अंत:करणात कैवल्याचं चांदणं पसरतं. विधवा सून व नातीसाठी स्वीकाराचा भाव उरात जन्म घेतो. 

सुख- दु:ख, जीवन- मृत्यू हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्याला हे एकदा स्वीकारता आलं की सुख- दु:ख, जन्म आणि मृत्यू हे पॅराडाॅक्स एकच होऊन जातात- जसं नृत्य आणि नर्तक, फूल आणि फुलपाखरू. स्वत:ला त्याच्या चरणी विलीन करता येणं हे जमायला हवं. रामजीला झालेला हा साक्षात्कार! सुमित्रा भावेंनी इहलोकीची यात्रा संपवण्यापूर्वी मराठी सिनेमासाठी ‘दिठी’ हा अमृतानुभव मागं ठेवून दिला आहे.

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशे