शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेची हालत खस्ता!

By admin | Updated: April 28, 2017 23:31 IST

कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने वसुलीही थकली व सरकारी अनुदानही लाभत नाही, अशा कोंडीत जिल्हा सहकारी बँक सापडली आहे.

कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने वसुलीही थकली व सरकारी अनुदानही लाभत नाही, अशा कोंडीत जिल्हा सहकारी बँक सापडली आहे. सहकारातील अग्रणी व जिल्ह्याची मुख्य अर्थवाहिनी म्हणविणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांवर शिक्षक व शेतकऱ्यांना ठिय्या मांडण्याची व तितकेच नव्हे तर मुख्य शाखेला टाळे ठोकण्याची वेळ यावी, ही बाब केवळ या बँकेच्याच दृष्टीने नामुश्कीची नसून एकूणच सरकारी धोरणातून सहकाराची हालत कशी खस्ता होत चालली आहे, यावर पुरेसा प्रकाश टाकणारीही आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत होणारे जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन थकल्याने बँकेच्या जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाखांवर संबंधित शिक्षकांना ठिय्या मांडून आंदोलने करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचा संताप इतका तीव्र रूप धारण करीत आहे की, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयालाही शिक्षकांनी टाळे ठोकले. हे लोण आता वाढत चालले आहे. अलीकडेच शेतपीक कर्जासाठी शेतकऱ्यांनीही या बँकेत ठिय्या मांडला होता. या सर्व आंदोलनांना कारणीभूत असलेल्या बँकेच्या नादारीमागे, तेथील अव्यावहारिक कामकाज व संचालकांच्या उधळपट्टीसारख्या बाबी आहेतच; पण त्याचबरोबर सहकार जगविण्याबद्दलची सरकारची अनास्थाही प्रकर्षाने दिसून येणारी आहे. संचालकांच्या मनमर्जीमुळे बँक गोत्यात आली तेव्हा प्रशासक मंडळ नेमून संबंधितांना घरी बसविण्यात आलेच होते. आताही संचालकांचा दोष असेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारता येईल; पण तसे न करता ज्या पद्धतीने बँकेची चलन कोंडी सुरू आहे, ते पाहता बँकेला घरघर लागून त्याचा फटका वेतनदार तसेच सभासद शेतकऱ्यांना बसणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. कारण रोखता थंडावण्यापाठोपाठ अन्य बॅँकांत दिले जाणारे जिल्हा बॅँकेचे धनादेश वटणेही बंद झाल्याने संबंधितांचे व्यवहारच खोळंबले आहेत. नोटबंदीनंतर सर्वच बँकांमधील व्यवहारांवर आर्थिक निर्बंध आले होते. जिल्हा बँकही त्याला अपवाद नव्हती. त्यामुळे तेव्हा पगारदारांनी ती बाब समजून घेतली. परंतु आता सारे काही पूर्ववत झाल्याच्या पार्श्वभूमीवरही पगारदारांना त्यांचे वेतन मिळत नसल्याने ते बँकेच्या शाखांसमोर ठिय्या देत आहेत. यात नोटबंदीनंतर जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या सुमारे ३५० कोटींच्या बाद नोटा बदलून न मिळाल्याने बँकेची कोंडी झालीच; पण सद्यस्थितीत स्टेट बँकेकडून पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याचीही त्यात भर पडली. दुसरे म्हणजे, कर्जमाफीसंबंधीचा शासनाचा निर्णय होत नसल्याने कर्जफेड व वसुलीही रखडली आहे. गेल्या हंगामातील पीककर्जाची वसुली अवघी पाच टक्के झाली आहे. अशात वेळोवेळी शासनातर्फे घोषित केले गेलेले अनुदानही मिळत नसल्याने बॅँकेतील रोखता व तरलता धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी नाबार्डमार्फत दहा हजार कोटींचे अनुदान देण्याची घोषणा मध्यंतरी केंद्र सरकारने केली होती. ही रक्कम कोणत्याही एका राज्यासाठीदेखील पुरेशी नाही असे तेव्हाच शरद पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याने सांगितले होते. परंतु तरी त्या घोषणेनुसार एक छदामही अद्याप बँकेला मिळालेला नाही. राज्यात चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते असताना त्यांनीही पीककर्जासाठी जिल्हा बँकांना निधी देण्याचे सांगितले होते, तर जिल्ह्यातल्याच दादा भुसे यांच्याकडे सहकारी राज्यमंत्रिपद होते तेव्हा त्यांनीही बँकेत बैठक घेऊन पुनर्गठित कर्जासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बँक कर्ज वाटप करून मोकळीही झाली; परंतु दोघांचाही खातेबदल झाल्याने तो विषय मागे पडला. एकीकडे सहकार जगविण्याची भाषा करताना शासनाकडूनच होत असलेली सहकाराची कोंडी यातून स्पष्ट होणारी असून, त्याच्या एकत्रित परिणामातून जिल्हा बँक अडचणीत आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, हे सगळे घडून येत बँकेच्या गळ्याला नख लागत असतानाही सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या हाताची घडी मोडू दिली नाही. त्यामुळेही जिल्हा बँकेच्या कारभाराला शिस्त लागू शकली नाही व आजच्या परिस्थितीला तोंड देण्याची वेळ ओढवली आहे. - किरण अग्रवाल