शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भेदाभेद अमंगळ

By admin | Updated: May 25, 2016 03:24 IST

अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच

- डॉ.गोविंद काळे‘उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्।’ अंत:करण विशाल असणाऱ्यांना वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंबासारखी आहे़ मी सुद्धा विशाल अंत:करणाचा आहे़ स्त्री-पुरुष, लहान-मोठा, जात-पात, गरीब-श्रीमंत, अडाणी-सुशिक्षित असले कुठलेच भेद पाळले नाहीत़ सर्वांना समान वागणूक़ सर्वांचे स्वागत एकाच पद्धतीने़ सकलासी येथे आहे अधिकाऱ ‘दे धरू-सर्वांस पोटी’ अशी सर्वांना कवेत घेणारी माझी विशाल भावना़ भूत, भविष्य आणि वर्तमानातही मी बदललो नाही. मी खरेच बोलत आहे़ ज्या धर्मराजाची महती तुम्ही जगाला सांगता त्याने सुद्धा ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणून असत्याचा आधार घेतला. माझे मात्र एकच ब्रीद ‘सत्यमेव जयते’़ खोटे कशासाठी? काय साधणार त्यातून? मी म्हणजे थकलेल्या जीवाचे विश्रांतीस्थाऩ चिरकाल विश्रांतीसाठी लोक माझाच आश्रय घेतात. जीवनात सुखावलेले माझ्याकडे येण्यासाठी किंचित टाळाटाळ करतात; परंतु माझे स्थान त्यांनाही अपरिहार्य आहे़ कंटाळलेले मात्र माझ्याकडे येण्यासाठी आतुर असतात़ साऱ्या रंजल्या-गांजल्यांचा मी परमसखा आहे़ मैत्री मी जपली आहे आजपर्यंत़ ‘अहो जग पुढे गेले/आता सारे बदलले’ अशी कवनं माणूस करतो आणि बदलत्या जगाची दखल घेतो़ जो कधीच बदलत नाही, अशा माझ्यासारख्याची दखल घेणारा महामानव अजून तरी दृष्टिपथात नाही़ दु:ख काय माणसालाच होते? वेदना काय फक्त तुम्हालाच होतात? अंतिम यात्रेत सहभागी होणाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझे सुद्धा डोळे क्षणिक गहिवरतात़ उन्हाळ्यात उकाडा असतो म्हणून तुम्ही वैतागता़ पावसाळ्यात पावसाने कहर केला म्हणून ओरड तर थंडीत कुडकुडायला होते म्हणून तुमची तक्राऱ अरे! ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याची सुद्धा तक्रार सांगता़ तुमचे रडगाणे संपणार कधी? कर्तव्याला जागणार कधी? मला कर्तव्य कर्मातून मुक्ती नाही़ भगवंताला रडकी लेकरं आवडत नाहीत़ त्याला मनापासून आवडतो तो स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञाची सारी लक्षणे केवळ माझ्या आणि माझ्याचकडे विद्यमान आहेत कायमस्वरूपी़ भगवंताला सुद्धा मीच प्रिय आहे़ स्वत:बद्दल इतके अभिमानपूर्वक बोलणे म्हणजे आत्मगौरव ठरतो; परंतु माझाही नाईलाज आहे़ माझ्याबद्दल गौरवोद्गार काढणारा अजूनपर्यंत जन्मास आला नाही म्हणून चार वाक्ये बोललो. क्षमस्व! अरे! नाव सांगायचे राहूनच गेले़ माझे नाव स्मशाऩ यो न दृश्यति न द्वेष्टिन शोचति न कांक्षति। शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य:स मे प्रिय:॥