शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उच्छृंखल माध्यमे

By admin | Updated: December 1, 2015 02:11 IST

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे आता येती अनेक वर्षे मोदीच देशाचे मुख्य कारभारी असतील आणि काँग्रेसचे नामोनिशाण पुसून गेलेले असेल अशा कल्पनेच्या भरारी मारणाऱ्या माध्यमांनी आता लगेचच लोकसभेची येती निवडणूक (२०१९) म्हणजे नरेन्द्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दुरंगी सामना असेल असे भाकीत वर्तवून तशी चर्चादेखील सुरु केली आहे. याला स्वच्छ शब्दात उच्छृंखलपणा म्हणतात. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक विळ्यांची आणि भोपळ्यांची एकत्रित मोट बांधली गेली व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीतही झाला होता. त्याच किंवा तशाच समीकरणाची पुनरावृत्ती मागील महिन्यात पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झाली. भाजपाला शह देण्यासाठी त्या राज्यातील नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे परस्परांचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले आणि भाजपाची अत्यंत दयनीय अवस्था करुन टाकली. या एकीकरणाशिवाय आणखीही काही घटक तिथे महत्वाचे ठरले होते. बिहार भले देशातील एक मोठे राज्य असले तरी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरुन नितीशकुमार यांना देश पातळीवरील नेतृत्व बहाल करणे आणि तसे करताना पुन्हा काँग्रेसला मोडीत काढणे म्हणजे अतीच झाले. नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी देशातील बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते या एका बाबीवरुन माध्यमे असे तर्काचे इमले उभारु लागली आहेत. पण देशातील एका अन्य मोठ्या राज्याचे नेते मुलायमसिंह यादव शपथविधीला हजर नव्हते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी नितीश मान्य पण त्यांची लालूंशी दोस्ती अमान्य असे त्यांच्या स्वभावास अनुसरुन भोंगळ विधान केले होते, हे विसरता येत नाही. नितीश, लालू, मुलायम, ममता, जयलललिता आणि तत्सम सारे नेते आणि त्यांचे पक्ष केवळ त्यांच्या राज्यांपुरते मर्यादित असल्याने त्यापैकी कोणालाच देशव्यापी ओळख नाही. ती आज आहे केवळ भाजपा आणि काँग्रेस याच पक्षांना. काँग्रेसवर जसा एका घराण्याचा पगडा आहे तसा भाजपावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपाची दारोमदार मोदींवरच राहील याचा तरी भरवसा काय? पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर होण्यापूर्वी यावेळी लालकृष्ण अडवाणीच मुख्य नेते असतील असे खुद्द भाजपाच्याच लोकाना वाटत नव्हते?