शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

उच्छृंखल माध्यमे

By admin | Updated: December 1, 2015 02:11 IST

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे आता येती अनेक वर्षे मोदीच देशाचे मुख्य कारभारी असतील आणि काँग्रेसचे नामोनिशाण पुसून गेलेले असेल अशा कल्पनेच्या भरारी मारणाऱ्या माध्यमांनी आता लगेचच लोकसभेची येती निवडणूक (२०१९) म्हणजे नरेन्द्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दुरंगी सामना असेल असे भाकीत वर्तवून तशी चर्चादेखील सुरु केली आहे. याला स्वच्छ शब्दात उच्छृंखलपणा म्हणतात. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक विळ्यांची आणि भोपळ्यांची एकत्रित मोट बांधली गेली व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीतही झाला होता. त्याच किंवा तशाच समीकरणाची पुनरावृत्ती मागील महिन्यात पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झाली. भाजपाला शह देण्यासाठी त्या राज्यातील नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे परस्परांचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले आणि भाजपाची अत्यंत दयनीय अवस्था करुन टाकली. या एकीकरणाशिवाय आणखीही काही घटक तिथे महत्वाचे ठरले होते. बिहार भले देशातील एक मोठे राज्य असले तरी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरुन नितीशकुमार यांना देश पातळीवरील नेतृत्व बहाल करणे आणि तसे करताना पुन्हा काँग्रेसला मोडीत काढणे म्हणजे अतीच झाले. नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी देशातील बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते या एका बाबीवरुन माध्यमे असे तर्काचे इमले उभारु लागली आहेत. पण देशातील एका अन्य मोठ्या राज्याचे नेते मुलायमसिंह यादव शपथविधीला हजर नव्हते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी नितीश मान्य पण त्यांची लालूंशी दोस्ती अमान्य असे त्यांच्या स्वभावास अनुसरुन भोंगळ विधान केले होते, हे विसरता येत नाही. नितीश, लालू, मुलायम, ममता, जयलललिता आणि तत्सम सारे नेते आणि त्यांचे पक्ष केवळ त्यांच्या राज्यांपुरते मर्यादित असल्याने त्यापैकी कोणालाच देशव्यापी ओळख नाही. ती आज आहे केवळ भाजपा आणि काँग्रेस याच पक्षांना. काँग्रेसवर जसा एका घराण्याचा पगडा आहे तसा भाजपावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपाची दारोमदार मोदींवरच राहील याचा तरी भरवसा काय? पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर होण्यापूर्वी यावेळी लालकृष्ण अडवाणीच मुख्य नेते असतील असे खुद्द भाजपाच्याच लोकाना वाटत नव्हते?