शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उच्छृंखल माध्यमे

By admin | Updated: December 1, 2015 02:11 IST

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे आता येती अनेक वर्षे मोदीच देशाचे मुख्य कारभारी असतील आणि काँग्रेसचे नामोनिशाण पुसून गेलेले असेल अशा कल्पनेच्या भरारी मारणाऱ्या माध्यमांनी आता लगेचच लोकसभेची येती निवडणूक (२०१९) म्हणजे नरेन्द्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दुरंगी सामना असेल असे भाकीत वर्तवून तशी चर्चादेखील सुरु केली आहे. याला स्वच्छ शब्दात उच्छृंखलपणा म्हणतात. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक विळ्यांची आणि भोपळ्यांची एकत्रित मोट बांधली गेली व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीतही झाला होता. त्याच किंवा तशाच समीकरणाची पुनरावृत्ती मागील महिन्यात पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झाली. भाजपाला शह देण्यासाठी त्या राज्यातील नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे परस्परांचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले आणि भाजपाची अत्यंत दयनीय अवस्था करुन टाकली. या एकीकरणाशिवाय आणखीही काही घटक तिथे महत्वाचे ठरले होते. बिहार भले देशातील एक मोठे राज्य असले तरी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरुन नितीशकुमार यांना देश पातळीवरील नेतृत्व बहाल करणे आणि तसे करताना पुन्हा काँग्रेसला मोडीत काढणे म्हणजे अतीच झाले. नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी देशातील बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते या एका बाबीवरुन माध्यमे असे तर्काचे इमले उभारु लागली आहेत. पण देशातील एका अन्य मोठ्या राज्याचे नेते मुलायमसिंह यादव शपथविधीला हजर नव्हते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी नितीश मान्य पण त्यांची लालूंशी दोस्ती अमान्य असे त्यांच्या स्वभावास अनुसरुन भोंगळ विधान केले होते, हे विसरता येत नाही. नितीश, लालू, मुलायम, ममता, जयलललिता आणि तत्सम सारे नेते आणि त्यांचे पक्ष केवळ त्यांच्या राज्यांपुरते मर्यादित असल्याने त्यापैकी कोणालाच देशव्यापी ओळख नाही. ती आज आहे केवळ भाजपा आणि काँग्रेस याच पक्षांना. काँग्रेसवर जसा एका घराण्याचा पगडा आहे तसा भाजपावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपाची दारोमदार मोदींवरच राहील याचा तरी भरवसा काय? पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर होण्यापूर्वी यावेळी लालकृष्ण अडवाणीच मुख्य नेते असतील असे खुद्द भाजपाच्याच लोकाना वाटत नव्हते?