शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

उच्छृंखल माध्यमे

By admin | Updated: December 1, 2015 02:11 IST

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे आता येती अनेक वर्षे मोदीच देशाचे मुख्य कारभारी असतील आणि काँग्रेसचे नामोनिशाण पुसून गेलेले असेल अशा कल्पनेच्या भरारी मारणाऱ्या माध्यमांनी आता लगेचच लोकसभेची येती निवडणूक (२०१९) म्हणजे नरेन्द्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दुरंगी सामना असेल असे भाकीत वर्तवून तशी चर्चादेखील सुरु केली आहे. याला स्वच्छ शब्दात उच्छृंखलपणा म्हणतात. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक विळ्यांची आणि भोपळ्यांची एकत्रित मोट बांधली गेली व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीतही झाला होता. त्याच किंवा तशाच समीकरणाची पुनरावृत्ती मागील महिन्यात पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झाली. भाजपाला शह देण्यासाठी त्या राज्यातील नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे परस्परांचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले आणि भाजपाची अत्यंत दयनीय अवस्था करुन टाकली. या एकीकरणाशिवाय आणखीही काही घटक तिथे महत्वाचे ठरले होते. बिहार भले देशातील एक मोठे राज्य असले तरी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरुन नितीशकुमार यांना देश पातळीवरील नेतृत्व बहाल करणे आणि तसे करताना पुन्हा काँग्रेसला मोडीत काढणे म्हणजे अतीच झाले. नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी देशातील बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते या एका बाबीवरुन माध्यमे असे तर्काचे इमले उभारु लागली आहेत. पण देशातील एका अन्य मोठ्या राज्याचे नेते मुलायमसिंह यादव शपथविधीला हजर नव्हते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी नितीश मान्य पण त्यांची लालूंशी दोस्ती अमान्य असे त्यांच्या स्वभावास अनुसरुन भोंगळ विधान केले होते, हे विसरता येत नाही. नितीश, लालू, मुलायम, ममता, जयलललिता आणि तत्सम सारे नेते आणि त्यांचे पक्ष केवळ त्यांच्या राज्यांपुरते मर्यादित असल्याने त्यापैकी कोणालाच देशव्यापी ओळख नाही. ती आज आहे केवळ भाजपा आणि काँग्रेस याच पक्षांना. काँग्रेसवर जसा एका घराण्याचा पगडा आहे तसा भाजपावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपाची दारोमदार मोदींवरच राहील याचा तरी भरवसा काय? पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर होण्यापूर्वी यावेळी लालकृष्ण अडवाणीच मुख्य नेते असतील असे खुद्द भाजपाच्याच लोकाना वाटत नव्हते?