शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाची हवाहवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:05 IST

सामान्य माणसासाठी ही डिजिटल इंडिया समस्या झाली. ग्रामीण भागातील बँकांबाबत तर बोलायलाच नको. सर्व्हर बंद ही कायमची गोष्ट.

सामान्य माणसासाठी ही डिजिटल इंडिया समस्या झाली. ग्रामीण भागातील बँकांबाबत तर बोलायलाच नको. सर्व्हर बंद ही कायमची गोष्ट. त्यामुळे बँकेचे कामकाज चालू हा ‘सोनियाचा दिन’ समजला जातो. दुसरा प्रश्न सेवा केंद्रांचा. जातीचे प्रमाणपत्र, सात-बारा, रहिवासी प्रमाणपत्र ही सोय सर्वांसाठी केली असली तरी ती गैरसोयच झाली आहे. अशा एक ना अनेक कहाण्या. यात माझा भारत कुठे ?तंत्रज्ञानाच्या कितीही बाता मारल्या तरी ‘हम नही सुधरनेवाले’! तंत्रज्ञान स्वीकारणे जेवढे सोपे तेवढे ते व्यवहारात कायम ठेवणे अवघड. कारण त्यासाठी शिस्त लागते. प्रसंग साधाच पण तंत्रज्ञानाची काळजी न घेतल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना किती मनस्ताप सोसावा लागला त्याचे हे विदारक उदाहरणच म्हणता येईल. दर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवृत्त कर्मचाºयांच्या बँक खात्यांमध्ये त्यांचे निवृत्तीवेतन जमा केले जाते. निवृत्त कर्मचाºयांना ते वेळेवर मिळावे यासाठी काळजी घेतली जाते. प्रत्येक विभागात ‘लीड बँक’ वेगळी असल्याने हा सारा कारभार त्या बँकेमार्फत चालतो. फक्त जिल्हा कोषागाराला ती ठराविक रक्कम जमा करावी लागते. या महिन्याच्या पहिले चार दिवस औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखांमध्ये निवृत्तीवेतनधारकांची गर्दी होती आणि पहिला आठवडा ती अपेक्षित असते; पण रोज गर्दी वाढत होती. हे वृद्ध खातेदार रांगा करून वाट पाहत होते आणि कोषागारातून खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे उत्तर त्यांना रोज मिळत असे. एकट्या औरंगाबाद शहरात ३३ हजार निवृत्त कर्मचाºयांचा हा प्रश्न होता. उपचार, औषधे आणि महिन्याचा खर्च यासाठी हे सर्वच निवृत्त वेतनावर अवलंबून; पण कोषागाराने अजून पैसे जमा का केले नाही असे बँकेनेही विचारले नाही. ज्यावेळी ‘लोकमत’ने हा प्रश्न उचलला त्यावेळी जाग आली आणि कोषागारातून पैसे कधीच जमा झाले आहेत; पण हैदराबादस्थित बँकेचा मुख्य सर्व्हर नादुरुस्त असल्याने ते खातेदारांच्या खात्यात जमा झाले नाहीत. हे ज्यावेळी उलगडले त्याक्षणी बँकेचे अधिकारी खडबडून जागे झाले; पण सर्व्हर चार दिवस बंद होता याचा कुणालाही पत्ता नव्हता. पुढे यंत्रणा हलली. प्रश्न सुटले; पण वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना मनस्ताप आणि हेलपाटे झाले त्याचे काय?प्रश्न तंत्रज्ञानाचा आणि ओघानेच जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’चा जयघोष केला जातो त्याचा आहे. कॅशलेस सोसायटी हा सुद्धा याचाच भाग आहे आणि त्याचा मनस्ताप आपण सोसत आहोत. एटीएम सेवा २४ तास उपलब्ध असण्यासाठी आहे; पण सलग दोन दिवस सुट्या आल्या तर देशभरातील एटीएममध्ये होणारा खडखडाट नवा नाही. म्हणजेच तंत्रज्ञानाचा स्वीकार हा नागरिकांना विनाकष्टाची सेवा मिळावी यासाठी केला असला तरी पैसे काढण्यासाठी एटीएमच्या चपला घासाव्या लागतात. हे काही प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न वाढत्या सायबर गुन्ह्यांचा. तंत्रज्ञान वापरात आणण्यापूर्वी त्यासाठी समाजात तंत्रज्ञान साक्षरता रुजवावी लागते; पण तो लोकशिक्षणाचा भाग आपल्याकडे अधुराच सोडला गेला. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होताना दिसते. म्हणजे असे अनुभव गाठीशी घेत शिका आणि तंत्रज्ञान स्वीकारा, असे तर सरकारला वाटत नाही ना? तर अशा एका संक्रमणातून आपण जात आहोत; पण ही संक्रमणावस्था कधी संपणार? हे सरकारही सांगत नाही. याचाच अर्थ डिजिटल इंडियाची उभारणी करताना असे फटके आपल्याला सोसावे लागणार.