शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या यंत्रणेवर अपु-या हवामानाचे अंदाज कठीणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:17 IST

अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन संकल्पना राबविणे जरूरीचे आहे. मात्र, शेतकºयाला हवी तशी हवामानाच्या अंदाजाची व्यवस्था नाही

रामचंद्र साबळेहवामान अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन संकल्पना राबविणे जरूरीचे आहे. मात्र, शेतकºयाला हवी तशी हवामानाच्या अंदाजाची व्यवस्था नाही. उदा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सरासरीने ५ हजार मिमी पाऊस पडतो, त्याच जिल्ह्यातील म्हसवड येथे सरासरी २५० मिमी पाऊस पडतो. यावरून सरासरी जिल्ह्याचा अंदाज दिल्यास तो बरोबर येत नाहीत. देशाच्या पूर्वेला चेरापुंजी येथे सरासरी १२ हजार मिमी पाऊस पडतो, तर देशाच्या पश्चिमेला राजस्थानमध्ये जोधपूर येथे ३०० ते ३५० मिमी पाऊस पडतो. यावरून सरासरी दिलेले अंदाज बरोबर येत नाहीत. त्यासाठी स्थानिक ठिकाणांचा पावसाचा अंदाज देणारी मॉडेल बनवून हवामानाचे अंदाज दिल्यास ते काही प्रमाणात बरोबर येतील.बदलते हवामान ही जगभर मोठी समस्या बनलेली आहे. यामागे वाढते तापमान, हवेमध्ये वाढणारे प्रदूषण, हवेतील कार्बन डायआॅक्साइड, नायट्रो आॅक्साइड, मिथेन गॅस यांचे वाढते प्रमाण, तसेच कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत गेल्यास तापमान वाढत आहे आणि यापुढे हे प्रमाण अधिक असेल. जेथे तापमान वाढेल, तेथे हवेचा दाब कमी होईल. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारे बाष्प वाहून नेतील. त्यामुळे पाऊस पडेल. मात्र, जेथे हवेचा दाब अधिक राहील, तेथे दुष्काळी परिस्थिती उद्भवेल. हवामान बदलाला रोखणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे वृक्ष, वने. मात्र, जगभरातून वनांना नष्ट केले जात आहे. आशिया खंडात ५५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल, आफ्रिका खंडात ६५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल, उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडात ८५ दशलक्ष हेक्टर जागेवरील जंगल मानवाने नष्ट केले आहे. कार्बन डायआॅक्साइड शोषण करणारी शोषण यंत्रणा मानवाने नष्ट केली आहे. दुसºया बाजूस कारखानदारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाहने वाढत आहेत. यातून कार्बन डायआॅक्साइड मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडला जातो. त्यामुळेच कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत आहे. विमानांची संख्या वाढत असल्याने, कोरो कार्बन हवेतील वरच्या थरावर सोडला जात आहे. त्यामुळे पुढील काळात हवामान बदलाचे परिणाम वेगाने जाणवत आहेत आणि जाणवतील. गारपीट, कधीही वीज कोसळणे याचे प्रमाण वाढत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे जगाच्या बहुतांश देशांत अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. दुसºया बाजूला लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशी परिस्थिती उद्भवत राहिली, तर सर्व जगात अन्न सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल.देशाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. कारण देशातील सध्याची लोकसंख्या १३४ कोटीवर पोहोचली आहे, तर चीनची लोकसंख्या १३८ कोटी आहे. आपला देश लवकरच चीनला मागे टाकून जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होणार आहे. त्यामुळे देशातील अन्न सुरक्षा क्षेत्राकडे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पाणी समस्यादेखील दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे हा परिणाम हवामान बदलामुळे दिसून येत आहे.बदलत्या हवामानाला अनुरूप व्यवस्थेची गरज आहे. मात्र, त्या दिशेने संशोधनाची दिशा कमी पडत आहे. त्यामुळेच हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापनावरही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. यात प्रामुख्याने कापूस, चहा उत्पादक शेतकºयांचा समावेश जास्त आहे. जवळपास ७ टक्के शेतकरी शेती व्यवसाय सोडण्याचा विचार करत आहेत. अलीकडच्या काळात शेती उत्पादनाचे भाव कोसळल्याने बहुतांश शेतकरी अडचणीत आहेत. दरवर्षी कर्जमाफी दिली, तरी शेतकºयांचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी कृषीमधील आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे.राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचा प्रकल्प ‘स्कायमेट’ या कंपनीकडून महाराष्ट्र शासन राबवित आहे. मात्र, मॉडेल बनविण्यासाठी तीस वर्षांचा हवामानाचा डेटा लागतो. या डेटाची माहिती कोणालाही नसल्याने, ही केंद्र हवामान अंदाज देण्यासाठी उपयोगी पडतील, अशी चुकीची अपेक्षा धरून सर्वजण आपल्याला स्थानिक स्वरूपाचे हवामान, पावसाचे अंदाज मिळतील, या आशेवर आहेत. मात्र, आपल्याला त्यातून स्थानिक स्वरूपाचे हवामान कळू शकेल. यातून पंतप्रधान पीक विमा योजनेच्या कामासाठी उपयोग होऊ शकेल. भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि ‘स्कायमेट’ या कंपनीकडे हवी असलेली यंत्रणा अपुरी आहे. या अपुºया यंत्रणेवर अचूक हवामान देणे कठीण जात आहे. याबाबतीत सुधारणा झाल्याशिवाय हवामान अंदाज बरोबर येणार नाहीत. याशिवाय हवामान अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करता येणार नाही. सध्या दिले जाणारे मध्यम पल्ल्याचे, लांब पल्ल्याचे अंदाज काही प्रमाणात बरोबर येत असले, तरी त्याची अचूकता वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.सर्व कृषी विद्यापीठांमध्ये आणि कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे, परंतु बहुतांश मनुष्यबळ हे हवामानाच्या अभ्यासाने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. जोपर्यंत हवामान खात्यातील शास्त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी हे प्रशिक्षित होणार नाहीत, तोपर्यंत हवामानावर आधारित संशोधन होणार नाही. हवामानावर आधारित योजना तयार होणार नाहीत. हवामानाच्या अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन करू शकणार नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे.(शब्दांकन : कुलदीप घायवट)