शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

देवेंद्रभाऊ हाजीर हो...

By राजा माने | Updated: January 15, 2018 02:15 IST

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती.

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती. त्याच क्वॉलिफिकेशनवर नारदांनी त्याची इंद्रलोकचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर म्हणून नियुक्ती केली होती. त्याच दिव्यशक्तीचा वापर करून यमकेने भीमा-कोरेगाव प्रकरणाची पाळेमुळे खोदून इंद्रदेवांना आपला रिपोर्ट सादर केला होता. त्यामुळे कालची संक्रांत त्याच्यासाठी आनंदाची ठरली होती. भिडे गुरुजी, एकबोटे, बाळासाहेब आंबेडकर, पुरुषोत्तम खेडेकर, भीमा-कोरेगाव प्रकरणात गप्प राहिलेल्या नीलम गो-हेंपासून ते थेट जाणता राजा, रावसाहेब कसबे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडेसह ‘ढवळ्या-पवळ्यां’ना तिळगुळाच्या वड्या वाटून गावाकडे निघाला होता. एवढ्यात मोबाईलची रिंग सुरू झाली... कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी... नारदांचा फोन होता ! यमकेने जीवावर येऊनच उचलला. तिकडून नारदांनी त्याला निरोप दिला, उद्या इंद्रदरबारी हजर राहा. देवेंद्रभाऊंना इंद्रदेवांनी दरबारात हजर राहण्याचे फर्मान काढलंय ! आता मराठी भूमी शांत झाली असे वाटतानाच इंद्रदेवांनी देवेंद्रभाऊंना का बरे बोलावले? संक्रांत आनंदात गेली आता किंक्रांत कोणते रंग दाखविणार याचा अंदाज बांधत नारदांनी पाठविलेला व्हीव्हीआयपी पास घेऊन इंद्रदरबारात दाखल झाला. यावेळी नारद स्वत:च देवेंद्रभाऊंना घेऊन इंद्रदरबारात हजर होते. ‘देवेंद्रभाऊ हाजीर हो...’ या हाकेनेच दरबार सुरू झाला.इंद्रदेव- बाळ देवेंद्र, एकटेच आलात?नारद- देवा, आपणच केवळ त्यांनाच हाजीर करण्याचा निरोप दिला होता.देवेंद्रभाऊ- जी देवा !इंद्रदेव- बाळ देवेंद्र, काय चाललंय हे मराठी भूमीत? (इंद्रदेवांचा प्रश्न संपताच देवेंद्रभाऊऐवजी यमकेच उत्तर देऊ लागला.)यमके- देवा, मी संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला सादर केला आहे. अनेकांचा डाव बुमरँग ठरला आहे. वेगवेगळ्या जातींचे ध्रुवीकरण, मतांची जातीय गणिते अन् नव्या जाती नेतृत्वाचे बीजरोपण असे अनेक मुद्दे त्यात आहेत...इंद्रदेव- थांब यमके ! मी बाळ देवेंद्रला विचारले आहे. बाळा बोल...देवेंद्रभाऊ- अध्यक्ष महोदय... अध्यक्ष महोदय... माफ करा, मला देवा म्हणायचे होते ! देवा, मी काय करू? एकीकडे रेशीमबाग, दुसरीकडे मोदी दरबार या प्रेशरमुळे माझे वजन आपोआपच घटू लागले आहे. डायटेशियनचे देखील तसेच म्हणणे होते ! पण देवा, मी शांत राहाण्यातच आनंद मानला...इंद्रदेव- मग बुमरँगचा तडाखा कोणाला बसला?देवेंद्रभाऊ- देवा, आपण सगळेच जाणता ! पण मराठी भूमीतील जनतेला मी सलाम करतो. कारण ते कुठल्याही षड्यंत्राला बळी पडले नाहीत. लाखोंचे विश्वविक्रमी मोर्चे काढणाºया मराठा समाजाने जसा समजूतदारपणा दाखविला तसा दलित समाजानेही दाखविला आणि मी सुटलो...इंद्रदेव- बाळ देवेंद्र, आता कोणत्याही बागेचे अथवा जंगलाचे प्रेशर घेणे तुम्हाला परवडणार नाही हे बजावण्यासाठीच येथे पाचारण केले आहे. जे सत्य ते स्वीकारा आणि अ‍ॅक्शन घ्या अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. (एवढेच बोलून देवांनी दरबार विसर्जित केला.)- राजा माने