शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एक काय ते ठरवा!

By admin | Updated: October 4, 2015 22:20 IST

खूप मागे जाण्याची गरज नाही. रालोआच्या पहिल्या कारकीर्दीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकचे लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ व पंतप्रधान नवाझ शरीफ या दोहोंशी चर्चा केली.

खूप मागे जाण्याची गरज नाही. रालोआच्या पहिल्या कारकीर्दीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकचे लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ व पंतप्रधान नवाझ शरीफ या दोहोंशी चर्चा केली. ‘चर्चा होनी चाहिए’ असे वाजपेयी म्हणत राहिले आणि त्याला दहशतवाद चालू राहिला पाहिजे हे प्रत्युत्तर मिळत गेले. संपुआच्या दोन्ही कार्यकाळातही काही वेगळे झाले नाही. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नकोतच असा आग्रह धरणारे लोक उभयपक्षी चर्चेला विरोध करीत असतानाही कधी अधिकाऱ्यांच्या, कधी राजदूतांच्या, कधी सचिव आणि मंत्र्यांच्या, तर कधीमधी सरकार प्रमुखांच्या पातळीवरही चर्चा होत राहिल्या. मधेच चर्चारोध जाहीर करायचा आणि कालांतराने पुन्हा चर्चेचे दरवाजे खुले करायचे. पाकिस्तानने अधिकृत चर्चेच्या आधी काश्मिरातील फुटीर हुरियतच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेकडे कधी दुर्लक्ष करायचे, तर कधी तेच निमित्त करून चर्चा रद्द करायची. इतके धरसोडीचे राजकारण सातत्याने सुरू असल्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनो) खुल्या अधिवेशनात पाकिस्तानला जे तथाकथित ठणकावले त्याला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्नच आहे. युनोच्या स्थापनेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या अधिवेशनात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचेही भाषण होऊन गेले. संघटनेला सत्तर वर्षे पूर्ण होऊनही ती अद्याप दहशतवादाची व्याख्या करू शकली नाही अशी टीका करून त्यांनी दहशतवादाच्या संदर्भात चांगला आणि वाईट अशी जी काही विभागणी केली जाते, तिच्याविरुद्ध जोरदार टीका केली. सुषमा स्वराज यांनीही त्यांच्या भाषणात या मुद्द्याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांची शाबासकी मिळवली. याच अधिवेशनात स्वराज यांच्या आधी बोलून गेलेल्या नवाझ शरीफ यांनी मांडलेला चार कलमी कार्यक्रम धुडकावून लावून, आधी ‘दहशतवाद’ सोडा हा एककलमी कार्यक्रम त्यांनी समोर ठेवला. ‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून येऊ शकत नाहीत’ असेही त्या म्हणाल्या. पण तसे म्हणणाऱ्या त्या काही पहिल्या भारतीय नेत्या नाहीत. याआधीही अनेकांकरवी हे वाक्य उच्चारून झाले आहे. तरीही स्वराज यांच्या या रोखठोक भूमिकेचे माध्यमांनी स्वागत केले असल्याने जर स्वराज यांनी जाहीर केलेली भूमिकाच यापुढेही कायम राहणार असेल तर त्यात यापुढील काळात बदल होता कामा नये. अमेरिकेचा दबाव आला तरी!