शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हा निर्धार खरा ठरो ...

By admin | Updated: June 21, 2017 01:14 IST

जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया नेटवर्क समजल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केल्याचे वृत्त निश्चितच आशादायी मानायला हवे.

जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया नेटवर्क समजल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केल्याचे वृत्त निश्चितच आशादायी मानायला हवे. विचारांची देवाण-घेवाण, घटना-घडामोडींचे अपडेट्स, यश-निवड-नियुक्ती, सुख-दु:खाच्या गोष्टी शेअर करण्यासोबतच जेथे शंका-समाधान होणे अपेक्षित होते, अशा फेसबुकला सध्या एखाद्या जनता गाडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चिमुकल्यांच्या वाढदिवसापासून लग्नाचा वाढदिवस ते वृद्धांच्या दशक्रिया विधीपर्यंतचा मजकूर, सहली, पार्ट्या आणि वेगवेगळ्या पोझेसमधील छायाचित्रे अपलोड करून हे नेटवर्क म्हणजे निव्वळ हौस भागविण्याचे साधन बनत चालल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यात भर म्हणून धार्मिक भावना भडकावणाऱ्या, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट याठिकाणी नोंदवून समाजमन दूषित करण्याचा प्रयत्नदेखील समाजकंटकांकडून होत होता. त्यात उणीव म्हणून की काय अश्लील छायाचित्रे आणि व्हिडीओ लोड करण्याचे लोणही आता पसरू लागले आहे. आंबटशौकिनांसाठी हे आवडीचे दालन ठरत असले तरी दिवसभरातून अनेकदा मोबाईल हाताळणारी हल्लीची चाणाक्ष पिढीसुद्धा नको ते पाहण्याच्या मोहात पडू लागली आहे. पॉर्न साईटवरील दृश्यांनीही बालकांसह युवावर्गाला आपल्या जाळ्यात ओढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हाच सध्या तरी सुज्ञ पालकांसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. या गोष्टींना चाप लावावा यासाठी लोकांच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्या लोकांपर्यंत पोहचण्याआधीच फेसबुकवरून डीलिट करण्यात येणार आहेत. काल-परवापर्यंत लोकांनी माहिती दिल्यावर आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवरून पुसला जायचा, आता फेसबुक व्यवस्थापनानेच सावधगिरी बाळगण्याची तयारी दर्शविली आहे. फेसबुकवर अपलोड होणारा मजकूर, छायाचित्रे व व्हिडीओ दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत की काय याची शहानिशा आता आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्राद्वारे केली जाणार आहे. असाच जर निर्धार फेसबुकने केला असेल तर तो खरा ठरो; पण केवळ दहशतवाद रोखण्यासोबतच लैंगिक भावना चाळवणाऱ्या पोस्टलादेखील आळा घालण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. फेसबुकचाच कित्ता गूगल, व्हॉट्सअ‍ॅप वा तत्सम सोशल मीडियानेही गिरवला तर समाजमन अधिक निरोगी राहण्यास निश्चितच हातभार लागू शकेल, यात शंका नाही.