शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दिल्ली अब दूर नहीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:49 IST

तिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे.

तिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. भविष्यात आॅक्सिजनच्या टाक्या पाठीवर घेऊन फिरावे लागते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ७ नोव्हेंबर २०१७ हा दिवस दिल्लीच्या इतिहासातील सर्वात प्रदूषित दिवस ठरला. पीएम २.५ चे कमाल स्तर १५५६ इतके नोंदविण्यात आले. दिल्लीच्या प्रदूषणाचा हा स्तर लंडनपेक्षा १००, पॅरिसपेक्षा ८५, तर बीजिंगपेक्षा १८ पट जास्त होता. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या आकडेवारीनुसार याआधी १ नोव्हेंबर २०१६ रोजी पीएम २.५ सर्वाधिक ४०१ नोंदल्या गेला होता. वेगवेगळे जळतण आणि कचरा उघड्यावर जाळल्याचा हा परिणाम. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हवा प्रदूषित होण्याचे सर्वात मोठे कारण हेच सांगितले जात आहे. दरवर्षी ५० टक्के प्रदूषण याच कारणामुळे होते. रस्त्यावरील धुळीमुळे ३५ टक्के, वाहनांमुळे २५ ते ३६ टक्के, तर बांधकामामुळे २० टक्क्यांपर्यंत प्रदूषण होते. लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी या प्रदूषणामुळे २५ लाख जणांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ त्यावर्षी भारतात एड्स, मलेरिया आणि क्षयरोग यांनी एकत्रित झालेल्या मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील हवा मागील पाच वर्षांत आठपट दूषित झाली आहे. पीएम २.५ हे कण अतिशय सृूक्ष्म असतात. ते मानवी केसाच्या व्यासाच्या तीन टक्के आकाराचे असतात आणि अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळून जाऊ शकतात. हे कण श्वासाद्वारे फुप्फुस आणि हृदयाच्या धमण्यांमध्ये जातात. त्यामुळे कॅन्सरसह हृदयाच्या आजारांची शक्यता वाढत असते. दिल्लीत असे घडणार याची कल्पना आधीच दिली गेली होती. राष्टÑीय हरित लवादाने तशी सूचना देऊनही काळजी घेतली गेली नाही. परिणामी या प्रदूषणाने दिल्लीकरांना श्वास घेण्याचेही स्वातंत्र्य ठेवले नाही. हे फक्त तिथेच घडते आहे असे अजिबात नाही. अमेरिकेतील वॉशिंग्टनपासून ते महाराष्टÑातील चंद्रपूरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. मानवी कृतींमुळे हवामान बदल होत असून त्यात तथ्य असल्याचे अमेरिका सरकारच्याच एका अहवालात म्हटले आहे. असे असतानादेखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ मधील पॅरिस हवामान करारातून माघार घेतली. अमेरिकेला सोयीचे निकष असतील, तरच या करारास मान्यता देण्याची भूमिका ट्रम्प यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे बॉर्न येथे सुरू असलेल्या हवामान बदलाच्या मंथनात अमेरिका नाही. ही मनमानी अमेरिकेत ट्रम्पची, दुसºया देशात आणखी कोणाची? माझ्याकडे सत्ता आणि संपत्ती आहे तर हवे ते मी करणार, ही छोट्या घरापासून ते देशपातळीपर्यंतची वृत्ती आपल्यावरील हवामान बदलाचे संकट आणखी गडद करते आहे. कॅरिबियन वादळे, युरोपातील उष्णतेच्या लाटा, दक्षिण आशियातील पूर हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. आपल्या देशाचा विचार केल्यास अवकाळी पाऊस, गारा त्याचवेळी दुसºया राज्यात दुष्काळझळा याला काय म्हणायचे? १९०१ ते २०१६ या काळात आपले तापमान सरासरी १.८ फॅरनहिट म्हणजे एक अंश सेल्सियसने वाढले आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली. विचार करा, तसे झालेच तर आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल?