शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

दिल्ली अब दूर नहीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:49 IST

तिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे.

तिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. भविष्यात आॅक्सिजनच्या टाक्या पाठीवर घेऊन फिरावे लागते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ७ नोव्हेंबर २०१७ हा दिवस दिल्लीच्या इतिहासातील सर्वात प्रदूषित दिवस ठरला. पीएम २.५ चे कमाल स्तर १५५६ इतके नोंदविण्यात आले. दिल्लीच्या प्रदूषणाचा हा स्तर लंडनपेक्षा १००, पॅरिसपेक्षा ८५, तर बीजिंगपेक्षा १८ पट जास्त होता. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या आकडेवारीनुसार याआधी १ नोव्हेंबर २०१६ रोजी पीएम २.५ सर्वाधिक ४०१ नोंदल्या गेला होता. वेगवेगळे जळतण आणि कचरा उघड्यावर जाळल्याचा हा परिणाम. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हवा प्रदूषित होण्याचे सर्वात मोठे कारण हेच सांगितले जात आहे. दरवर्षी ५० टक्के प्रदूषण याच कारणामुळे होते. रस्त्यावरील धुळीमुळे ३५ टक्के, वाहनांमुळे २५ ते ३६ टक्के, तर बांधकामामुळे २० टक्क्यांपर्यंत प्रदूषण होते. लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी या प्रदूषणामुळे २५ लाख जणांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ त्यावर्षी भारतात एड्स, मलेरिया आणि क्षयरोग यांनी एकत्रित झालेल्या मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील हवा मागील पाच वर्षांत आठपट दूषित झाली आहे. पीएम २.५ हे कण अतिशय सृूक्ष्म असतात. ते मानवी केसाच्या व्यासाच्या तीन टक्के आकाराचे असतात आणि अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळून जाऊ शकतात. हे कण श्वासाद्वारे फुप्फुस आणि हृदयाच्या धमण्यांमध्ये जातात. त्यामुळे कॅन्सरसह हृदयाच्या आजारांची शक्यता वाढत असते. दिल्लीत असे घडणार याची कल्पना आधीच दिली गेली होती. राष्टÑीय हरित लवादाने तशी सूचना देऊनही काळजी घेतली गेली नाही. परिणामी या प्रदूषणाने दिल्लीकरांना श्वास घेण्याचेही स्वातंत्र्य ठेवले नाही. हे फक्त तिथेच घडते आहे असे अजिबात नाही. अमेरिकेतील वॉशिंग्टनपासून ते महाराष्टÑातील चंद्रपूरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. मानवी कृतींमुळे हवामान बदल होत असून त्यात तथ्य असल्याचे अमेरिका सरकारच्याच एका अहवालात म्हटले आहे. असे असतानादेखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ मधील पॅरिस हवामान करारातून माघार घेतली. अमेरिकेला सोयीचे निकष असतील, तरच या करारास मान्यता देण्याची भूमिका ट्रम्प यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे बॉर्न येथे सुरू असलेल्या हवामान बदलाच्या मंथनात अमेरिका नाही. ही मनमानी अमेरिकेत ट्रम्पची, दुसºया देशात आणखी कोणाची? माझ्याकडे सत्ता आणि संपत्ती आहे तर हवे ते मी करणार, ही छोट्या घरापासून ते देशपातळीपर्यंतची वृत्ती आपल्यावरील हवामान बदलाचे संकट आणखी गडद करते आहे. कॅरिबियन वादळे, युरोपातील उष्णतेच्या लाटा, दक्षिण आशियातील पूर हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. आपल्या देशाचा विचार केल्यास अवकाळी पाऊस, गारा त्याचवेळी दुसºया राज्यात दुष्काळझळा याला काय म्हणायचे? १९०१ ते २०१६ या काळात आपले तापमान सरासरी १.८ फॅरनहिट म्हणजे एक अंश सेल्सियसने वाढले आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली. विचार करा, तसे झालेच तर आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल?