शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

एका ‘टॉपर’चे अध:पतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:36 IST

एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते.

एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते. चोरलेली वाहने वेबसाइटवर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग या २३ वर्षीय विद्यार्थ्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली. या बातमीत दडलेली खरी बातमी पुढेच आहे. आरोपी जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून, त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५० टक्के गुण मिळाले होते. या तपशिलाने वाचकांना अधिक धक्का बसला असेल.कुशाग्र बुद्धिमत्तेचा जयकिशन गाड्यांची चोरी करून त्या विकण्याच्या गुन्ह्यांमध्ये पकडला जावा, हा दैवदुर्विलास आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या जयकिशनने आपली हुशारी वाहनचोरीसाठीही वापरल्याचे दिसून येते. आपण पकडले जाऊ नये यासाठी जयकिशनने त्या विभागातील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते. यावरून तो किती योजनाबद्धरीतीने गुन्हे करीत असे हे लक्षात येते. हा प्रकार केवळ जयकिशनच्या व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित नाही तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्याचबरोबर समाजातील नैतिक मूल्यांची घसरण दाखवणारा आहे. उत्तम शैक्षणिक कारकीर्द वाट्यास आलेला विद्यार्थी सहजगत्या गुन्हेगारीकडे वळतो आणि त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही, हे प्रकर्षाने दिसून येते. शिक्षणासोबत अपेक्षित असलेल्या संस्कारांपेक्षा त्याला भौतिक सुखांची अधिक लालसा निर्माण झाली. अशा रीतीने तुरुंगात गेलेले आरोपी सराईत गुन्हेगारीचे शिक्षण घेऊनच तुरुंगाबाहेर पडतात, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच तरुण आरोपींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा नव्या सरळमार्गी जीवनाची वाट दाखवण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे. मनुष्य केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतही असला पाहिजे. शिक्षणात आघाडीवर असलेल्या जयकिशनवर संस्कार करण्यात कोण कमी पडले, या प्रश्नाची आता चर्चा होईल. पण खरे उत्तर आहे, संपूर्ण समाजच यासाठी उत्तरदायी आहे. जयकिशन हा हुशार विद्यार्थी असल्याने ही बातमी अधिक ठळकपणे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली. मात्र शिक्षणात फारशी प्रगती नसलेले असे अनेक विद्यार्थी व्यसनाधीनता, नैराश्य, वैफल्याचे बळी ठरतात. कुमारवयीन मुलांमधील ऊर्जेला विधायक वळण देत त्यांना वाममार्गापासून दूर ठेवण्याचे प्रकार जाणीवपूर्वक समाजाने रुजवले पाहिजेत, तेव्हाच असे जयकिशन वाताहत होण्यापासून वाचतील.