शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

एका ‘टॉपर’चे अध:पतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:36 IST

एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते.

एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते. चोरलेली वाहने वेबसाइटवर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग या २३ वर्षीय विद्यार्थ्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली. या बातमीत दडलेली खरी बातमी पुढेच आहे. आरोपी जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून, त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५० टक्के गुण मिळाले होते. या तपशिलाने वाचकांना अधिक धक्का बसला असेल.कुशाग्र बुद्धिमत्तेचा जयकिशन गाड्यांची चोरी करून त्या विकण्याच्या गुन्ह्यांमध्ये पकडला जावा, हा दैवदुर्विलास आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या जयकिशनने आपली हुशारी वाहनचोरीसाठीही वापरल्याचे दिसून येते. आपण पकडले जाऊ नये यासाठी जयकिशनने त्या विभागातील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते. यावरून तो किती योजनाबद्धरीतीने गुन्हे करीत असे हे लक्षात येते. हा प्रकार केवळ जयकिशनच्या व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित नाही तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्याचबरोबर समाजातील नैतिक मूल्यांची घसरण दाखवणारा आहे. उत्तम शैक्षणिक कारकीर्द वाट्यास आलेला विद्यार्थी सहजगत्या गुन्हेगारीकडे वळतो आणि त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही, हे प्रकर्षाने दिसून येते. शिक्षणासोबत अपेक्षित असलेल्या संस्कारांपेक्षा त्याला भौतिक सुखांची अधिक लालसा निर्माण झाली. अशा रीतीने तुरुंगात गेलेले आरोपी सराईत गुन्हेगारीचे शिक्षण घेऊनच तुरुंगाबाहेर पडतात, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच तरुण आरोपींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा नव्या सरळमार्गी जीवनाची वाट दाखवण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे. मनुष्य केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतही असला पाहिजे. शिक्षणात आघाडीवर असलेल्या जयकिशनवर संस्कार करण्यात कोण कमी पडले, या प्रश्नाची आता चर्चा होईल. पण खरे उत्तर आहे, संपूर्ण समाजच यासाठी उत्तरदायी आहे. जयकिशन हा हुशार विद्यार्थी असल्याने ही बातमी अधिक ठळकपणे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली. मात्र शिक्षणात फारशी प्रगती नसलेले असे अनेक विद्यार्थी व्यसनाधीनता, नैराश्य, वैफल्याचे बळी ठरतात. कुमारवयीन मुलांमधील ऊर्जेला विधायक वळण देत त्यांना वाममार्गापासून दूर ठेवण्याचे प्रकार जाणीवपूर्वक समाजाने रुजवले पाहिजेत, तेव्हाच असे जयकिशन वाताहत होण्यापासून वाचतील.