शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय चांगला, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 02:44 IST

निवडणुका, मग त्या ग्रामपंचायतीच्या असोत की विधानसभा, लोकसभेच्या, त्याठिकाणी घोडेबाजार हा ओघाने येतोच. आधी आपापल्या वॉर्ड, प्रभाग किंवा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी

निवडणुका, मग त्या ग्रामपंचायतीच्या असोत की विधानसभा, लोकसभेच्या, त्याठिकाणी घोडेबाजार हा ओघाने येतोच. आधी आपापल्या वॉर्ड, प्रभाग किंवा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मतदारांना विविध आमिष दाखविले जाते. नंतर सरपंच, सभापती, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण व्हावे म्हणून घोडेबाजार सुरू होतो. हे चित्र कोठेतरी थांबावे, असे राज्यातील कारभाऱ्यांच्या मनात आले आणि ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा’ निर्णय घेऊन मोकळे झाले. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार चालू वर्षाअखेरीस राज्यातील १९५ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने घेतलेला निर्णय हा निवडणुक इतिहासातला पहिलाच निर्णय आहे, असे नव्हे. याआधी हा प्रयोग करून झालेला आहे. अलिकडचे उदाहरणच द्यायचे झाल्यास विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात सन २००१ मध्ये थेट नगराध्यक्षाची पद्धत अवलंबिण्यात आली होती. या पद्धतीमुळे निवडणुकीनंतर सभापती आणि अध्यक्षपदासाठी होणाऱ्या घोडबाजाराला आळा बसू शकेल, तसेच मतदारांना आपापल्या शहरातील हवा तो नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल. या दोन्ही समाधान देणाऱ्या बाबी यानिमित्ताने घडू शकतील म्हणून राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह म्हणायला हवा. पण या पद्धतीमुळे जो संभाव्य धोका पुढ्यात वाढून ठेवलेला आहे त्याचा विचार होणेही गरजेचे आहे. जनतेने निवडून दिलेला नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि सभागृहात बसलेले उर्वरित सदस्य दुसऱ्या पक्षांचे असे जर चित्र असले तर विरोधी पक्षांचे सदस्य नगराध्यक्षाला मनाजोगे काम करू देणे आणि निर्णय घेऊ देण्यात अडसर ठरू शकतात. परिणामी त्या-त्या शहरांचा विकास खोळंबून राहण्याची भीतीच अधिक असते. २००१ मध्ये लातूर नगरपालिका निवडणुकीत बहुमत कॉँग्रेसला आणि नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचे होते. असेच प्रकार राज्यातील अन्य नगरपालिकांमध्येही घडले होते. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेणाऱ्या विलासरावांनाच अखेर २००६ मध्ये पूर्वीची पद्धत लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. बहुमत आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाच्या वाट्याला जाणारे निकालही हाती येतील, पण ज्या नगरपालिकेत विरोधाभास असेल त्या नगराच्या विकासाचे काय, असा प्रश्न निश्चितच उपस्थित होऊ शकतो. सत्ताधारी एकाच पक्षाचे असले तर विकासप्रक्रियेत फारशा अडचणी येत नाहीत. या अंगाने विचार करावयाचा झाल्यास राज्य शासनाचा हा निर्णय वरकरणी स्तुत्य असला, तरी त्या अनुषंगाने जे तोटे दृष्टिपथास दिसतात, ते नाकारूनही चालणार नाही.