शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्ससारखाच कर्जमाफीचा आकडा अधूनमधून होतो कमी-जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 02:01 IST

‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही.

‘कर्जासाठी आत्महत्या’, ‘मोदी सरकार’ असा मजकूर सागाच्या पानावर लिहित टिटवी (घाटंजी) येथील प्रकाश मानगावकर या तरुण शेतक-याने परवा आत्महत्या केली. आत्मसन्मान दुखावलेल्या प्रकाशच्या आत्महत्येनंतर सरकारच्या डोळ्यात ‘प्रकाश’ पडला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. कारण सरकार सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या आकडेमोडीत गर्क आहे. कर्जमाफीचा नेमका आकडा किती हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही. सेन्सेक्सचा आकडा जसा कमी जास्त होतो तसा कर्जमाफीचा आकडा अधूनमधून कमी जास्त होत असतो. तो अद्यापही स्थिरावलेला नाही. तो वाढवायचा असेल तरी उत्तर प्रदेशातील ‘योगी’फॉर्म्युला महाराष्ट्रातही अमलात आणावा लागेल. तिथे दोन ते दहा रुपये कर्जमाफीचे सर्टिफिकेट मिळविणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. हे वास्तव कानावर पडताच शेतकरी आणि जनसामान्यांच्या मुखातून ‘श्री’ हरी... ऐवढेच बाहेर पडले.मात्र कालपरवापर्यंत सरकारसाठी कायद्याची भाषा बोलणारे राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्ताक्षरी’ अभियानाच्या समारोप्रसंगी सरकारला शिव्या हासडल्या. शेतात रक्त आटवणाºया शेतकºयांसाठी अणे यांचे ‘ब्लडप्रेशर वाढले. त्यांनी सरकारची लायकी काढली. ‘अच्छे दिन’ आणायला पैसे लागतात. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के पैसा पगारावर व कर्ज फेडण्यासाठी जातो. उरलेले ४० टक्के जीएसटीमुळे केंद्राने नेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे भीक मागावी लागतेय, अशी सेडेतोड टीका अणे यांनी फडणवीस सरकारवर केली. अणे यांचे भाषण ऐकल्यावर विदर्भवादी भाजप नेत्यांनी ‘श्री’ हरी... म्हणत निश्चितच दीर्घ श्वास सोडला असेल. मात्र सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने स्वतंत्र विदर्भाचा ढोल वाजविणारे विदर्भवादी भाजप नेते विकासाच्या मार्गात व्यस्त आहेत. इकडे अडगळीत पडल्यासारखे वाटत असल्याने विदर्भातील निवडक काँग्रेस नेत्यांनी ‘चाय पे चर्चा’ करीत विदर्भ प्रदेश काँग्रेसचा फटाका फोडत कॉँग्रेस हायकमांडचे लक्ष वेधले आहे. विदर्भाचे नाव पुढे करीत त्यांनी प्रदेश काँग्रेसला टार्गेट केले आहे. सत्तेत कॉँग्रेस असो वा भाजप, विदर्भात केवळ मतांचे राजकारण झाले, हे येथील मतदारही जाणतो. मात्र तो सध्या महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या भडक्याने सामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. डाळीची डोकेदुखी पुन्हा सुरू झाली आहे. अजून दसरा-दिवाळी बाकी आहे. विकासपर्वात कधी काय होईल याचा नेम नाही. मात्र शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत तर बाजार बेभाव असल्याने सामान्य माणून ‘श्री’ हरी... म्हणत गप्प आहे. या साºयात सरकार मात्र पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियानात व्यस्त आहे.