शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

प्रज्ञावंताचा मृत्यू की हत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 03:51 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘व्हीएनआयटी’ला ‘डेंग्यू’ने ग्रासले असून चक्क यामुळे एका प्रज्ञावंत प्राध्यापकाला जीव गमवावा लागला. आतापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना हा आजार झाला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘व्हीएनआयटी’ला ‘डेंग्यू’ने ग्रासले असून चक्क यामुळे एका प्रज्ञावंत प्राध्यापकाला जीव गमवावा लागला. आतापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना हा आजार झाला आहे. ही लागण वरकरणी केवळ डासांमुळे झाली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिका प्रशासनदेखील याला तितकेच कारणीभूत आहे. ‘व्हीएनआयटी’चा स्वतंत्र परिसर शहरातच येतो आणि कमीतकमी तेथील आरोग्य स्थितीवर लगेच पावले उचलणे त्यांची जबाबदारी आहेच. प्रशासकीय अनास्थेमुळे डॉ.वीरेंद्र अवस्थी यांचा बळी गेला असून यासाठी मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘व्हीएनआयटी’सारख्या संस्थांमध्ये समाजातील बुद्धिवंत विद्यार्थ्यांमधील ‘क्रिम’ येथे येते आणि हेच विद्यार्थी संस्था, शहर व पर्यायाने देशाची ओळख जगभरात नेतात. देशात जागतिक दर्जाच्या संस्था निर्माण व्हाव्या अशी अपेक्षा करण्यात येते. मात्र त्याच दर्जाच्या सुविधा अन् विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी पुढाकार मात्र दिसून येत नाही. या संस्थांमधील प्राध्यापकांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित होऊच शकत नाही. मात्र त्यांच्याकडेच इतर प्रशासकीय जबाबदारीदेखील दिल्या जाते. त्यामुळे शिक्षण आणि प्रशासन यांचा ताळमेळ बसवताना त्यांची चांगलीच कसरत होते. याच्या नेमके उलट चित्र विदेशांत दिसून येते. तेथील अनेक विद्यापीठांमधील संपूर्ण व्यवस्था स्थानिक शहर प्रशासनाकडून पाहण्यात येते. देशाचा मौलिक ठेवा असल्याप्रमाणे शिक्षक व विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येते. त्यांना सुविधा देण्यात येतात व त्यांच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य देण्यात येते. सरकारी व्यवस्थेचा दृष्टिकोन किती संकुचित आहे याचे ‘व्हीएनआयटी’तील ही दुर्दैवी घटना उदाहरणच म्हणावे लागेल. ‘व्हीएनआयटी’ असो किंवा इतर कुठली संस्था, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर नकळतपणे सामाजिक संस्कारदेखील होत असतात. सरकारी प्रशासनाची कार्यप्रणाली त्यांच्या नजरेसमोर येत असते. एक अधिकारी किंवा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे संपूर्ण व्यवस्थेबाबत त्यांच्या मनात एक ग्रह तयार होतो. एका विद्यार्थ्यामागे शासनाचे लाखो रुपये खर्च होत असतात. मात्र त्याच व्यवस्थेतील चटके जाणवल्यानंतर अनेक जण ‘कशाला हवी ती कटकट’ असा विचार करत उच्चशिक्षण झाल्यानंतर थेट परदेशच गाठतात. ही देशाची हानी असते हे लक्षात घ्यायला हवे. अनेक राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्था प्रशासकीय कोडगेपणाशी संघर्ष करत आहेत. देशातील प्रज्ञावंतांना जपणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे याचे भान समाज आणि सरकारी यंत्रणांनीदेखील जपणे आवश्यक आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे कठीण असते, मात्र ठरविले तर हेच विद्यार्थी प्रशासनाला जागे करू शकतात, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.