शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मृत्युंजयची पन्नाशी

By admin | Updated: April 2, 2017 01:18 IST

शिवाजी सावंतांची पहिलीच कादंबरी -‘मृत्युंजय’ची लोकप्रियता वादातीत आहे. आजही कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ नाही असं होऊच शकत नाही

- रविप्रकाश कुलकर्णीशिवाजी सावंतांची पहिलीच कादंबरी -‘मृत्युंजय’ची लोकप्रियता वादातीत आहे. आजही कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ नाही असं होऊच शकत नाही. पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ला मागणी नाही असं कादंबरी प्रकाशित होऊन पन्नास वर्षे झाली तरी झालेलं नाही! मराठी गं्रथजगतात ही अतिदुर्मीळ गोष्ट आहे, असं एरव्ही सरसकट विधान करतात तसं मी म्हटलं असतं.पण ‘मृत्युंजय’चं आणखी एक वेगळेपण सहसा कुणी नोंदवत नाही. ते सांगायला हवं. आज बाजारात दोन वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या ‘मृत्युंजय’च्या आवृत्त्या उपलब्ध आहेत. दोघेही प्रकाशक या पुस्तकाचा कॉपीराईट आपल्याकडेच आहे असा दावा करतात. याबाबत कोर्ट-कचेऱ्यादेखील झालेल्या आहेत. पण प्रश्नाची तड लागलेली नसावी. त्यामुळे दोन्ही प्रकाशक ‘मृत्युंजय’ प्रकाशित करत आहेत हे मात्र खरं.विशेष म्हणजे या दोन्ही प्रकाशकांच्या पुस्तकाच्या किमती वेगवेगळ्या आहेत, तरीही दोघांच्या पुस्तकाच्या विक्रीवर अजिबात परिणाम झालेला नाही! अशा दोन प्रकाशकांच्या दोन आवृत्त्या शेजारी-शेजारी मांडलेल्या दिसतात. त्याबाबत पुस्तक विक्रेत्यांना विचारताच ते सांगतात, ‘‘वाचकांनी कुठली आवृत्ती घ्यायची हे आम्ही त्या वाचकांवरच सोपवतो.’’या जोडीला आणखी एक सांगायला हवं ‘मृत्युंजय’ची पायरेटेड कॉपी- अनधिकृत प्रकाशित झालेली आवृत्ती राजरोसपणे मिळते हे वेगळेच..तरीसुद्धा ‘मृत्युंजय’च्या मागणीला घट नाही. मराठी ग्रंथजगतात ही अशी एकमेव घटना आहे, असेही ‘मृत्युंजय’चं वेगळेपण सांगता येईल. पण त्याच वेळेच मराठी समीक्षकांनीच ‘मृत्युंजय’ची फारशी दखल घेतलेली नाही.अर्थात लोकप्रियता आणि मान्यता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे शिवाजी सावंतांचे एक प्रशंसक डॉ. सागर देशपांडे यांचे मत नोंदवतो - ते लिहितात,‘१९७४ ते १९९९ यादरम्यान ‘मृत्युंजय’चे हिंदी, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मल्याळम्, कन्नड आणि इंग्रजी अशा देशी-विदेशी भाषांमध्ये सशक्त अनुवाद झाले आहेत. प्रा. प्रतिभा दवे यांनी गुजराती भाषेत केलेल्या दोन आवृत्त्या १९९०मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्याला गुजरात राज्य शासनाच्या आणि दिल्लीच्या साहित्य अकादमीचाही पुरस्कार लाभला आहे. मात्र मूळ मराठी भाषेतील कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला नाही. कदाचित निवड मंडळातल्या काही परीक्षकांचीच आपल्या माणसांना मोठं न होऊ देण्याची खेकडा वृत्तीही त्याला कारणीभूत असावी. हाच अनुभव भारतीय ज्ञानपीठाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडीच्या वेळीही आला. भारतातील प्रख्यात विचारवंत डॉ. करण सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी या ग्रंथाची शिफारस केली असतानाही महाराष्ट्रातल्याच एका मराठी साहित्यिकानं मात्र नकाराची भूमिका घेतली होती. एक परीक्षक म्हणून त्यांच्या मतस्वातंत्र्याचा मान राखूनसुद्धा प्रश्न पडतो की, मानवी द्वेष भावनेचा हा सर्वाधिक संसर्ग मराठी माणसांनाच इतका का होत असावा?डॉ. देशपांडे यांनी एकाच वेळी ‘त्या’ समीक्षकाला आणि तसाच मराठी माणसांना एकाच मापात तोलावं याचं आश्चर्य वाटतं.पुरस्काराच्या तोलण्यावर ‘मृत्युंजय’चं मोठेपण अवलंबून आहे काय? अशा वेळी ‘मृत्युंजय’संदर्भात जे काही टीकाकारांनी आक्षेप घेतलेले आहेत त्याचा प्रतिवाद करायला कोण पुढे कसं येत नाही?वाङ्मयीन महत्ता केवळ आग्रहीपणामुळे उभी राहत नसते आणि उभी राहिल्यास म्हणण्यापेक्षा उभी राहिली आहे असं वाटलं तरी त्याचं अस्तित्व फार काळ टिकत नाही. युगप्रवर्तक म्हणवून घेणाऱ्या लेखकाचं अल्पावधीत काय झालं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण म्हणून त्या लेखकाला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. त्यानं त्याचा काळ गाजवला; मात्र खरं ही गोष्ट शिल्लक राहतेच ना!अशावेळी खुद्द शिवाजीरावांनी या गोष्टीचा मागोवा घेताना म्हटलंय... ‘हजारो वर्षे अंधारात गाढले गेलेले महारथी, महादानी कर्णाचे अंतर्विश्व ‘मृत्युंजय’मध्ये रसाळ, लालित्य शैलीत व्यक्त झाले आहे. म्हणूनच वाचकांनी ते स्वीकारले आहे. प्रत्येक मानवाठायी कुठं ना कुठं अंशरूपानं कर्ण असतो. त्याला ‘मृत्युंजय’ नकळत हळुवार हातानं स्पर्श करतं. कर्णाची अंधारातील बाजू ‘मृत्युंजय’ने उजेडात आणली.’बहुसंख्य वाचकांना ‘मृत्युंजय’चं आकर्षण अजूनही वाटतं त्याचं हेदेखील कारण असावं. काय ते असो, असं भाग्य पन्नास वर्षांपेक्षा जास्त लाभणाऱ्या किती कलाकृती आहेत?हे वेगळेपण मान्य करायला कुणाची आडकाठी नसावी.’