शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मृत्युनंतरचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 02:48 IST

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर लोकप्रिय होत्या यात शंका नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मृत्युनंतर जेमतेम महिनाभराच्या आतच त्यांच्यावर पुन्हा मृत्यूस सामोरे जाण्याची वेळ आलेली दिसते. अद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याने जयललिता जिवंत होत्या तोपर्यंत त्यांच्या पक्षातील सारे त्यांचे गुलाम होते. मैत्रीण म्हणून शशीकला नटराजन त्यातल्या त्यात जवळ इतकेच. साहजिक त्याच पक्षातील जयललितांची जागा नव्हे तर पद स्वीकारतील असे वातावरण असतानाच दुसऱ्या शशीकला म्हणजे पक्षातून खूप आधीच निलंबित खासदार शशीकला पुष्पा यांनी उघड आव्हानात्मक पवित्रा धारण करुन पक्षाच्या सरचिटणीसपदावर हक्क सांगितला. त्यांच्या या हट्टापायीच पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी एक रक्तरंजित हाणामारीही झाली. त्यामुळे हा संघर्ष तिथेच थांबेल असे समजायचे कारण नाही. दुसरीकडे याच पक्षाचे एक पाईक पी.ए.जोसेफ यांनी जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात शंका उपस्थित करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली असता, आश्चर्य म्हणजे ज्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली त्या खंडपीठानेदेखील ‘आमच्या मनातसुद्धा जयललितांच्या मृत्युविषयी शंका आहे’ असे उद्गार काढून दफन केलेला जयललितांचा मृतदेह तपासण्यासाठी पुन्हा बाहेर काढण्याचे आदेश आम्ही का देऊ नयेत असा सवालदेखील उपस्थित केला आहे. तब्बल ७५ दिवस त्या रुग्णालयात दाखल होत्या आणि मधून मधून त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्या आहार घेत आहेत, कागदपत्रांवर सह्या करीत आहेत आणि बैठका घेत आहेत अशा बातम्या आम्हीही वाचत होतो मग अचानक असे काय झाले, हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. केवळ तितकेच नव्हे तर न्यायालयाने पंतप्रधान आणि केन्द्र तसेच राज्य सरकारला नोटीसदेखील जारी केली आहे. वस्तुत: जयललिता यांना पहिल्यांदा जेव्हां रुग्णालयात दाखल केले तेव्हांच त्यांचा अवतार आटोपल्याची कुजबुज सुरु झाली होती. पण कधी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तर कधी पक्षांतर्गत तजवीज करायला वेळ मिळावा म्हणून तर कधी भक्तांचे मनोबल खच्ची होऊ नये म्हणून जयललिता यांना बळेबळे जगवले जात होते अशीदेखील चर्चा होती. हे सारे खास दक्षिणी भडकपणाला साजेसेच होते. पण आता ते सारे अंगलट येण्याची शक्यता दिसत असल्याने जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा मरणाला सामोेरे जाण्याची वेळ येईल असे दिसते.