शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युनंतरचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 02:48 IST

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर लोकप्रिय होत्या यात शंका नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मृत्युनंतर जेमतेम महिनाभराच्या आतच त्यांच्यावर पुन्हा मृत्यूस सामोरे जाण्याची वेळ आलेली दिसते. अद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याने जयललिता जिवंत होत्या तोपर्यंत त्यांच्या पक्षातील सारे त्यांचे गुलाम होते. मैत्रीण म्हणून शशीकला नटराजन त्यातल्या त्यात जवळ इतकेच. साहजिक त्याच पक्षातील जयललितांची जागा नव्हे तर पद स्वीकारतील असे वातावरण असतानाच दुसऱ्या शशीकला म्हणजे पक्षातून खूप आधीच निलंबित खासदार शशीकला पुष्पा यांनी उघड आव्हानात्मक पवित्रा धारण करुन पक्षाच्या सरचिटणीसपदावर हक्क सांगितला. त्यांच्या या हट्टापायीच पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी एक रक्तरंजित हाणामारीही झाली. त्यामुळे हा संघर्ष तिथेच थांबेल असे समजायचे कारण नाही. दुसरीकडे याच पक्षाचे एक पाईक पी.ए.जोसेफ यांनी जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात शंका उपस्थित करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली असता, आश्चर्य म्हणजे ज्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली त्या खंडपीठानेदेखील ‘आमच्या मनातसुद्धा जयललितांच्या मृत्युविषयी शंका आहे’ असे उद्गार काढून दफन केलेला जयललितांचा मृतदेह तपासण्यासाठी पुन्हा बाहेर काढण्याचे आदेश आम्ही का देऊ नयेत असा सवालदेखील उपस्थित केला आहे. तब्बल ७५ दिवस त्या रुग्णालयात दाखल होत्या आणि मधून मधून त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्या आहार घेत आहेत, कागदपत्रांवर सह्या करीत आहेत आणि बैठका घेत आहेत अशा बातम्या आम्हीही वाचत होतो मग अचानक असे काय झाले, हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. केवळ तितकेच नव्हे तर न्यायालयाने पंतप्रधान आणि केन्द्र तसेच राज्य सरकारला नोटीसदेखील जारी केली आहे. वस्तुत: जयललिता यांना पहिल्यांदा जेव्हां रुग्णालयात दाखल केले तेव्हांच त्यांचा अवतार आटोपल्याची कुजबुज सुरु झाली होती. पण कधी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तर कधी पक्षांतर्गत तजवीज करायला वेळ मिळावा म्हणून तर कधी भक्तांचे मनोबल खच्ची होऊ नये म्हणून जयललिता यांना बळेबळे जगवले जात होते अशीदेखील चर्चा होती. हे सारे खास दक्षिणी भडकपणाला साजेसेच होते. पण आता ते सारे अंगलट येण्याची शक्यता दिसत असल्याने जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा मरणाला सामोेरे जाण्याची वेळ येईल असे दिसते.