शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मृत्युनंतरचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 02:48 IST

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर

थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर लोकप्रिय होत्या यात शंका नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मृत्युनंतर जेमतेम महिनाभराच्या आतच त्यांच्यावर पुन्हा मृत्यूस सामोरे जाण्याची वेळ आलेली दिसते. अद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याने जयललिता जिवंत होत्या तोपर्यंत त्यांच्या पक्षातील सारे त्यांचे गुलाम होते. मैत्रीण म्हणून शशीकला नटराजन त्यातल्या त्यात जवळ इतकेच. साहजिक त्याच पक्षातील जयललितांची जागा नव्हे तर पद स्वीकारतील असे वातावरण असतानाच दुसऱ्या शशीकला म्हणजे पक्षातून खूप आधीच निलंबित खासदार शशीकला पुष्पा यांनी उघड आव्हानात्मक पवित्रा धारण करुन पक्षाच्या सरचिटणीसपदावर हक्क सांगितला. त्यांच्या या हट्टापायीच पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी एक रक्तरंजित हाणामारीही झाली. त्यामुळे हा संघर्ष तिथेच थांबेल असे समजायचे कारण नाही. दुसरीकडे याच पक्षाचे एक पाईक पी.ए.जोसेफ यांनी जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात शंका उपस्थित करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली असता, आश्चर्य म्हणजे ज्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली त्या खंडपीठानेदेखील ‘आमच्या मनातसुद्धा जयललितांच्या मृत्युविषयी शंका आहे’ असे उद्गार काढून दफन केलेला जयललितांचा मृतदेह तपासण्यासाठी पुन्हा बाहेर काढण्याचे आदेश आम्ही का देऊ नयेत असा सवालदेखील उपस्थित केला आहे. तब्बल ७५ दिवस त्या रुग्णालयात दाखल होत्या आणि मधून मधून त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्या आहार घेत आहेत, कागदपत्रांवर सह्या करीत आहेत आणि बैठका घेत आहेत अशा बातम्या आम्हीही वाचत होतो मग अचानक असे काय झाले, हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. केवळ तितकेच नव्हे तर न्यायालयाने पंतप्रधान आणि केन्द्र तसेच राज्य सरकारला नोटीसदेखील जारी केली आहे. वस्तुत: जयललिता यांना पहिल्यांदा जेव्हां रुग्णालयात दाखल केले तेव्हांच त्यांचा अवतार आटोपल्याची कुजबुज सुरु झाली होती. पण कधी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तर कधी पक्षांतर्गत तजवीज करायला वेळ मिळावा म्हणून तर कधी भक्तांचे मनोबल खच्ची होऊ नये म्हणून जयललिता यांना बळेबळे जगवले जात होते अशीदेखील चर्चा होती. हे सारे खास दक्षिणी भडकपणाला साजेसेच होते. पण आता ते सारे अंगलट येण्याची शक्यता दिसत असल्याने जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा मरणाला सामोेरे जाण्याची वेळ येईल असे दिसते.