शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

दत्ताेपंतांची भिक्षांदेही..

By admin | Updated: June 11, 2014 10:52 IST

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत.

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक शिक्षणसंस्थांचे संचालक-मालक-पालक व महर्षी असलेले माननीय दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत. मागितलेली भिक्षा त्यांनी दडविली नाही. ‘मुलांना द्या’ म्हणजे मुलांना द्या, ‘मुलांना हवे’ म्हणजे मुलांना हवे. गेली चाळीस वर्षे सत्तेची सगळी पदे व त्यावरचे आनंद अनुभवल्यानंतर पंचाहत्तरी उलटलेल्या या मेघ्यांना आता स्वत:साठी काही नको. त्यांचे पोट आणि मन भरले आहे, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. (तरीही प. नागपूरची विधानसभेची जागा मिळाली, तर ती लढविण्याचा एक इरादा त्यांचे मन अजून सोडत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीवर्गाचे म्हणणे आहे.) घरी सारे आहे.  पैसा आहे, गाड्या आहेत, नोकरचाकर आहेत. पण, तरीही सत्तेचे पद नाही. ते द्या आणि त्यांचे कुशलमंगल करा, अशी त्या वृद्ध व तृप्त पित्याची मागणी आहे. भाजपामध्ये बरीच दयाळू माणसे आहेत. ती अशा बाहेरच्यांना सामावून घेण्यासाठी घरातल्यांना जागा रिकामी करायला सांगू शकणारी आहेत. एकट्या नागपुरात त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहितांसाठी जागा केली. मग अटल बहादूर सिंग या लोहियावाद्यासाठी केली, राष्ट्रवादीच्या रामदास तडसासाठी केली. आपली माणसे आणखी काही काळ मागे राहतील, तशीही त्यांना मागे राहण्याची सवय आहे. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ ही संघाची कविता त्यांना प्रेरणा देऊन दीर्घ काळ पायातच ठेवू शकणारी आहे. त्यामुळे दत्ताभाऊंना निराश होण्याचे कारण नाही. त्यांच्या दोन पोरांनीही आशा सोडण्याची गरज नाही. संघ परिवार मोठा आहे. तो राजकीय मतभेद पोटात घेतो आणि वैचारिक मतभेदही सांभाळून घेतो. तसे मेघ्यांजवळ वैचारिक म्हणावेसे काही नाहीही. त्यांच्याजवळ जे आहे, ते भाजपाला व त्याच्या पुढार्‍यांना याआधीही चालले आहे व तसे ते पुढेही चालणार आहे. मेघ्यांची खरी अडचण भाजपात नाही. त्या पक्षाच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या आप्तस्वकीयांच्या लोंढय़ात ती आहे. त्यात त्यांना दिसणारे त्यांचे स्नेही, नातेवाईक, जवळचे व दूरचे असे खूप लोक आहेत. त्यांची गर्दी वाढली, तर आपल्याला आणि आपल्या पोरांना तीत पाय ठेवायला जागा उरेल की नाही, ही त्यांची भ्रांत आहे. राजकारणात वरच्या जागा तशाही थोड्याच असतात. त्या वाढविण्यावरही एक र्मयादा आहे. शिवाय, त्या वाढविण्याचे स्वातंत्र्य आता नागपुरात नाही. ते अहमदाबादेत आहे. त्यामुळे गिरीश गांधी, त्यांचे चिरंजीव निशांत गांधी आणि त्यांच्या मागून येणारे बाकीचे लोंढे दारात पोहोचण्याआधीच जर काही होऊ शकले, तर ते मेघ्यांना हवे आहे. त्यासाठी ते दिल्लीत गेले. संबंधितांना भेटले आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी ‘काही तरी करा हो,’ असं म्हणून परतले. त्यांच्या आधी आणखीही एका पराभूत वैदर्भीयाने तेथे हजेरी लावली होती. पण, त्यांचे पुढारी सावध. त्यांनी त्याला तत्काळ दोन वर्षांसाठी राज्यसभा देऊ केली आणि त्याचा भाजपाप्रवेश तेवढय़ा काळासाठी रोखला. केंद्रीय नियोजन आयोगावरील एक मराठी सभासद आपला बायोडाटा घेऊन एका दिल्लीकर वजनदाराकडे मेघ्यांच्या उपस्थितीतच हजर झाला. आपला बायोडाटा त्या पुढार्‍यांच्या हाती रीतसर देऊन त्याने त्यांच्या पायांना रीतसर हातही लावला. तो गेला, तेव्हाही मेघे तेथेच होते, असे म्हणतात. असो. मेघे सावध आहेत. त्यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या मार्गात आता आणखी अडसर नको आहेत. सारे असते. पैसा, मान, लोकप्रियता, शिक्षणसंस्था, सलामीसाठी मास्तर-प्राध्यापक, चेलेचपाटे, हाताशी बाळगलेले आणि पोसलेले असे सारेच काही. पण, गाडी साधी असते. तिच्यावर दिवा नसतो अन् तेवढय़ासाठी जीव टाकणारे लोक असतात. प. महाराष्ट्रातले एक असे दिवंगत पुढारी राज्याला ठाऊक आहेत. मरतानाही त्यांच्या तोंडी ‘लाल दिवा, लाल दिवा’ हे शब्द होते, असे म्हणतात. पण, त्यालाच निष्ठा हेही नाव आहे. पवार दिवा देत असतील तर पवार, विलासराव देत असतील तर विलासराव आणि आता गडकरी देणार असतील तर गडकरी. गंमत म्हणजे जो असे काही देईल, ‘त्याच्या पायात आपल्या कातड्याचे जोडे घालायला’ मेघे नेहमीच तयार असतात. त्यांचे असे बरेच कातडे त्या कामी वाया गेल्याची चर्चा जाणकारांत आहे. असो. एवढय़ा भक्तिभावाने आणि श्रद्धाबुद्धीने केलेली कोणतीही तपश्‍चर्या निष्फळ होत नाही. तशी ती मेघ्यांचीही होणार नाही. अखेर दैवते तरी दुसरी कोणती आश्‍वासने देणार असतात.. आणि ती दिली, तरीही ती फुकटच्या शब्दांची असतील. पदे वा दिवे तत्काळ देणारी असणार नाहीत.. नाही का?