शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

अंधार वाढत चालला, पणत्या जपूया। 

By किरण अग्रवाल | Updated: August 19, 2021 10:53 IST

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. 

- किरण अग्रवाल

अलीकडे समाजजीवनाचे व जगण्याचेही संदर्भच बदलले असल्याने प्रत्येकजण मी व माझ्यात गुंतत चालला आहे, त्यामुळे स्वार्थांधांच्या मतलबी गोतावळ्यात माणुसकीचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे हे खरेच; पण इतरांचे जाऊ द्या, जेव्हा आपलेही आपल्याला होत नसल्याचे दिसून येते तेव्हा मनाचे व्याकूळ होणे गहिरे होऊन गेल्याखेरीज राहत नाही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. काही घटना या अपवादात्मक असतात, पण पांढऱ्या कॅनव्हासवर काळा डाग उठून दिसावा तशा असतात. समाजमनाची अस्वस्थता वाढीस लावणाऱ्या या घटनांमुळे वेदना व व्याकुळतेच्या जाणिवा घट्ट होतातच, परंतु नात्यांचे बंध किती सैल होत चालले आहेत हेदेखील त्यातून लक्षात येते. नागपुरातील घटना तशीच आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील किसनराव बोरकर हे ज्येष्ठ गृहस्थ आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीस नागपुरात उपचारासाठी घेऊन आले होते. दवाखान्यात असताना तर तिच्या मुला मुलींनी तिच्याकडे ढुंकून पाहिले नाहीच, परंतु आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही कोणी आले नाही; अखेर मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाच्या लोकांनी या अभागी मातेवर अंत्यसंस्कार केले. परिस्थिती कितीही हलाखीची वा कशीही असो, पण पोटची मुले असताना एखाद्या मातेवर अशी वेळ यावी हेच हृदय पिळवटून काढणारे आहे. यात ज्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला त्या अपरिचितांकडून माणुसकीचा प्रत्यय येत असताना, हक्काच्या म्हणवणार्‍या मुलांकडून, आप्तांकडून आलेला संवेदनाहीनतेचा अनुभव वयोवृद्ध पित्याला किती वेदना देऊन गेला असेल याची कल्पनाच करता येऊ नये. सदरची घटना ही प्रातिनिधिक म्हणता यावी, कारण समाजात अनेक ज्येष्ठांच्या वाट्याला असे दुःख आले आहे. म्हातारपणाची काठी म्हणवणार्‍या मुलांकडे आश्रितासारखे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या व्यथा या अशा असतात, ज्या सहन होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखे असते ते, पण समाजात मुलांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपला सन्मान खुंटीवर टांगून ते वाट्याला येणारे एकटेपणाचे जीवन जगत असतात. खरेतर आई वडिलांचा नीट सांभाळ न करणाऱ्या मुलांना घराबाहेर काढून देता येईल, असा एक निकाल मागे उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्येष्ठांचा योग्य सांभाळ व सन्मानासाठी कायदाही अस्तित्वात आहे, आपल्या चरितार्थासाठी ते मुलांकडून अधिकृतपणे पोटगीही मागू शकतात; पण अनेकांना हा कायदा माहित नाही व ज्यांना माहित आहे ते त्याचा वापर  करण्यास धजावत नाहीत. अर्थात प्रश्न कायद्याचाही नाहीच, तो आहे संवेदनेचा व माणुसकीचा. दुर्दैवाने या बाबी क्षीण होत चालल्या आहेत.अर्थात सारेच काही संपलेले अगर बिघडलेले नाही. तुफानातही काही दिवे तेवत असतात. नागपुरात संबंधित नलिनी बोरकर या मातेवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले तसे इतरही ठिकाणच्या घटना अधून मधून समोर येतात. परभणी जिल्ह्यातील सेलू येथेही पार्वतीबाई जैस्वाल या वयोवृद्ध महिलेवर तेथील मुस्लिम तरुणांनी रीतसर अंत्यसंस्कार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे, तर जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील जावूबाई भिल्ल या रस्त्यात बेवारस आढळलेल्या वृद्ध महिलेस काही तरुणांनी रूग्णालयात दाखल करून माणुसकीचा परिचय घडविला. अशा घटनांची यादी आणखीही लांबू शकेल, तेव्हा मथितार्थ इतकाच की; संवेदनाहीनतेचा अंधार वाढत असला तरी त्याला भेदु पाहणाऱ्या पणत्या आपल्या क्षमतेनुसार मिणमिणत आहेतच. या पणत्यांभोवती कौतुकाचा व सहकार्याचा हात धरूया इतकेच यानिमित्ताने.