शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

दंगल-मंगल

By admin | Updated: March 14, 2015 00:45 IST

शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड.

विजयराज बोधनकर,शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड. जशी माणसं तसा गाव. जसा विचार तसा प्रचार. जशी माय-बाप तशी मुलं. जेवढं शिक्षण तेवढीच नोकरी. जेवढे कष्ट तेवढेच यश स्पष्ट. अशीच एक सत्यकथा अनुभवलेल्या आईबापाची. नवराबायको जेमतेम शिकलेले. नवरा दारूडा. बायको जगाच्या दृष्टीने भरकटलेली. तीन मुलं, एक मुलगी इतका त्यांचा परिवार. मोठा मुलगा दहावी नापास. बाकीचे दोघे जेमतेम. मुलगी आठवी नापास. काय करायचं शिकून ! हा आईबापाचा मंत्र. पोरंही तशीच झाली. चलो धंदा करो पैसा लाओ! म्हणून मोठा मुलगा बापाचा धंदा सांभाळू लागला. बापाचा धंदा लायटर दुरुस्त करून देण्याचा. तेवढ्यावर घर चालायचं. हळूहळू पुढची दोन मुले मोठी झाली. दिशा नसल्यामुळे उनाड होत गेली. एकाने लोकांचा पैसा गोळा करून दाम दुप्पटचा धंदा चालू केला. चांगले वीस लाख जमवून पोबारा केला. काही दिवसातच पोलिसांनी पकडला. जेलात घातला. कसाबसा पाच वर्षांनी सुटला. सुटल्यावर घेणेकऱ्यांनी मनसोक्त तुडवला. शेवटी मुलगा वाया गेला. तिसराही मुलगा तसाच निघाला. कुणालातरी मारून यायचा. रोज माणसं घरावर यायची. मग न्यायनिवाडे! मुलगी आईवर गेली. कुणातरी मुलाबरोबर पळून जाणार होती म्हणून बापाने जातीच्या मुलाशी पटकन लग्न करून दिले. पण मुलगी वर्षभरात घरी परतली. दारुडा मुलगा रोज मारतो म्हणून घटस्फोट झाला. सर्वात मोठा मुलगा दारूच्या व्यसनापायी मेला. त्याची बायको विधवा झाली. या छोट्याशा गोष्टीतून एकच उलगडा होतो तो म्हणजे... मुलांच्या आयुष्याचे मार्ग आईवडीलच बदलवितात. त्यांना अज्ञानी ठेवतात. मग सारेच आयुष्यभर दु:खाचा जेल •भोगतात. म्हणूनच जेव्हा बालगणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावयास सांगितले तेव्हा त्याने चक्क शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या. ही पुराणातली गोष्ट ज्या आई-बापांना उमगली त्यांचं भलं झालं. देव, नियती कुणाचंही वाईट करीत नसते. माणूस जे ठरवतो ते घडतं. कुणाला जगवायचं असेल तर माणूस त्याला जगवितो. कुणाला मारायचं ठरवलं तर त्याला तो मारतो. देवळात जाऊनही जे पालक देवासारखे वागत नाहीत त्यांच्या घरात नाश करणारे सर्वनाशीच जन्म घेतात. मातृदेवो-पितृदेवो भव: या मंत्राचा जागर जिथे असतो तिथे घराचंच देऊळ बनतं. जशी जिजाबाई तसे शिवराय. जसा चाणक्य तसाच चंद्रगुप्त. आईवडील हेच पहिलं विद्यालय जन्मभराच्या विद्येचं. उच्च शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं नसून उत्तम संस्काराने माणूस मोठाच बनतो हे मात्र सत्य.