शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दंगल-मंगल

By admin | Updated: March 14, 2015 00:45 IST

शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड.

विजयराज बोधनकर,शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड. जशी माणसं तसा गाव. जसा विचार तसा प्रचार. जशी माय-बाप तशी मुलं. जेवढं शिक्षण तेवढीच नोकरी. जेवढे कष्ट तेवढेच यश स्पष्ट. अशीच एक सत्यकथा अनुभवलेल्या आईबापाची. नवराबायको जेमतेम शिकलेले. नवरा दारूडा. बायको जगाच्या दृष्टीने भरकटलेली. तीन मुलं, एक मुलगी इतका त्यांचा परिवार. मोठा मुलगा दहावी नापास. बाकीचे दोघे जेमतेम. मुलगी आठवी नापास. काय करायचं शिकून ! हा आईबापाचा मंत्र. पोरंही तशीच झाली. चलो धंदा करो पैसा लाओ! म्हणून मोठा मुलगा बापाचा धंदा सांभाळू लागला. बापाचा धंदा लायटर दुरुस्त करून देण्याचा. तेवढ्यावर घर चालायचं. हळूहळू पुढची दोन मुले मोठी झाली. दिशा नसल्यामुळे उनाड होत गेली. एकाने लोकांचा पैसा गोळा करून दाम दुप्पटचा धंदा चालू केला. चांगले वीस लाख जमवून पोबारा केला. काही दिवसातच पोलिसांनी पकडला. जेलात घातला. कसाबसा पाच वर्षांनी सुटला. सुटल्यावर घेणेकऱ्यांनी मनसोक्त तुडवला. शेवटी मुलगा वाया गेला. तिसराही मुलगा तसाच निघाला. कुणालातरी मारून यायचा. रोज माणसं घरावर यायची. मग न्यायनिवाडे! मुलगी आईवर गेली. कुणातरी मुलाबरोबर पळून जाणार होती म्हणून बापाने जातीच्या मुलाशी पटकन लग्न करून दिले. पण मुलगी वर्षभरात घरी परतली. दारुडा मुलगा रोज मारतो म्हणून घटस्फोट झाला. सर्वात मोठा मुलगा दारूच्या व्यसनापायी मेला. त्याची बायको विधवा झाली. या छोट्याशा गोष्टीतून एकच उलगडा होतो तो म्हणजे... मुलांच्या आयुष्याचे मार्ग आईवडीलच बदलवितात. त्यांना अज्ञानी ठेवतात. मग सारेच आयुष्यभर दु:खाचा जेल •भोगतात. म्हणूनच जेव्हा बालगणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावयास सांगितले तेव्हा त्याने चक्क शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या. ही पुराणातली गोष्ट ज्या आई-बापांना उमगली त्यांचं भलं झालं. देव, नियती कुणाचंही वाईट करीत नसते. माणूस जे ठरवतो ते घडतं. कुणाला जगवायचं असेल तर माणूस त्याला जगवितो. कुणाला मारायचं ठरवलं तर त्याला तो मारतो. देवळात जाऊनही जे पालक देवासारखे वागत नाहीत त्यांच्या घरात नाश करणारे सर्वनाशीच जन्म घेतात. मातृदेवो-पितृदेवो भव: या मंत्राचा जागर जिथे असतो तिथे घराचंच देऊळ बनतं. जशी जिजाबाई तसे शिवराय. जसा चाणक्य तसाच चंद्रगुप्त. आईवडील हेच पहिलं विद्यालय जन्मभराच्या विद्येचं. उच्च शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं नसून उत्तम संस्काराने माणूस मोठाच बनतो हे मात्र सत्य.