शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दंगल-मंगल

By admin | Updated: March 14, 2015 00:45 IST

शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड.

विजयराज बोधनकर,शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड. जशी माणसं तसा गाव. जसा विचार तसा प्रचार. जशी माय-बाप तशी मुलं. जेवढं शिक्षण तेवढीच नोकरी. जेवढे कष्ट तेवढेच यश स्पष्ट. अशीच एक सत्यकथा अनुभवलेल्या आईबापाची. नवराबायको जेमतेम शिकलेले. नवरा दारूडा. बायको जगाच्या दृष्टीने भरकटलेली. तीन मुलं, एक मुलगी इतका त्यांचा परिवार. मोठा मुलगा दहावी नापास. बाकीचे दोघे जेमतेम. मुलगी आठवी नापास. काय करायचं शिकून ! हा आईबापाचा मंत्र. पोरंही तशीच झाली. चलो धंदा करो पैसा लाओ! म्हणून मोठा मुलगा बापाचा धंदा सांभाळू लागला. बापाचा धंदा लायटर दुरुस्त करून देण्याचा. तेवढ्यावर घर चालायचं. हळूहळू पुढची दोन मुले मोठी झाली. दिशा नसल्यामुळे उनाड होत गेली. एकाने लोकांचा पैसा गोळा करून दाम दुप्पटचा धंदा चालू केला. चांगले वीस लाख जमवून पोबारा केला. काही दिवसातच पोलिसांनी पकडला. जेलात घातला. कसाबसा पाच वर्षांनी सुटला. सुटल्यावर घेणेकऱ्यांनी मनसोक्त तुडवला. शेवटी मुलगा वाया गेला. तिसराही मुलगा तसाच निघाला. कुणालातरी मारून यायचा. रोज माणसं घरावर यायची. मग न्यायनिवाडे! मुलगी आईवर गेली. कुणातरी मुलाबरोबर पळून जाणार होती म्हणून बापाने जातीच्या मुलाशी पटकन लग्न करून दिले. पण मुलगी वर्षभरात घरी परतली. दारुडा मुलगा रोज मारतो म्हणून घटस्फोट झाला. सर्वात मोठा मुलगा दारूच्या व्यसनापायी मेला. त्याची बायको विधवा झाली. या छोट्याशा गोष्टीतून एकच उलगडा होतो तो म्हणजे... मुलांच्या आयुष्याचे मार्ग आईवडीलच बदलवितात. त्यांना अज्ञानी ठेवतात. मग सारेच आयुष्यभर दु:खाचा जेल •भोगतात. म्हणूनच जेव्हा बालगणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावयास सांगितले तेव्हा त्याने चक्क शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या. ही पुराणातली गोष्ट ज्या आई-बापांना उमगली त्यांचं भलं झालं. देव, नियती कुणाचंही वाईट करीत नसते. माणूस जे ठरवतो ते घडतं. कुणाला जगवायचं असेल तर माणूस त्याला जगवितो. कुणाला मारायचं ठरवलं तर त्याला तो मारतो. देवळात जाऊनही जे पालक देवासारखे वागत नाहीत त्यांच्या घरात नाश करणारे सर्वनाशीच जन्म घेतात. मातृदेवो-पितृदेवो भव: या मंत्राचा जागर जिथे असतो तिथे घराचंच देऊळ बनतं. जशी जिजाबाई तसे शिवराय. जसा चाणक्य तसाच चंद्रगुप्त. आईवडील हेच पहिलं विद्यालय जन्मभराच्या विद्येचं. उच्च शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं नसून उत्तम संस्काराने माणूस मोठाच बनतो हे मात्र सत्य.