शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा

By admin | Updated: February 12, 2017 23:53 IST

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात याविषयावर गांभीर्याने चर्चा होत नाही. तपमानवाढीला विकसित देश कारणीभूत आहेत; हे उघड सत्य असले तरी याबाबत कोणी आवाज उठवत नाही. हिमनग वितळणे ही प्रक्रिया आताच सुरू झालेली नसली तरी आता हे प्रमाण वाढले आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखली नाही तर सजीवाचा विनाश अटळ आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, कमाल तपमानात सातत्याने वाढ होणे, अवेळी पाऊस पडणे, हिमनद्या वितळणे, वादळे येणे; या गोष्टी जागतिक तपमानाशी निगडित आहेत. वादळे आणि महापूर हासुद्धा जागतिक तपमानवाढीचा परिणाम आहे. मुंबईसारख्या महानगराला यापूर्वी याचा फटका बसला आहे. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढणार आहे. हे नमूद करत असताना हिमालयात असाधारण बर्फवृष्टी सुरू आहे. आत्तापर्यंत ३०हून अधिक जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गेल्या महिन्याभरात उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली. ग्रीस, रूमानिया इत्यादि देशांत तपमान उणे ३० अंशांपेक्षा खाली गेले. यावेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी ४० अंशांपेक्षा जास्त तपमान होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे १००० फूट उंचीचा प्रचंड हिमखंड मूळ भागापासून सुटला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सन २०१६ हे तपमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तपमान हे विसाव्या शतकातील सरासरी तपमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तपमान २० व्या शतकाच्या सरासरी तपमानापेक्षा ०.९४ अंशांनी जास्त होते. तपमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे. ‘पॅरिस करार’ फक्त चार वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचवण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंशांच्या वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशांची ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तपमानात होत असल्याने सध्याच्या बालके व तरुणांच्या आयुष्यकाळातच मानवजात, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका अभ्यासक व्यक्त करत आहेत. भारतीय पर्यावरण चळवळीचे ठाण्याचे विक्रांत कर्णिक आणि इतर कार्यकर्ते पर्यावरणीय जनजागृतीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचा चार महिन्यांचा दौरा सायकलवरून करत आहेत. ते गावागावांत थांबून याबाबतची माहिती देत आहेत. डहाणूच्या ‘नरपड’ गावचे कुंदन राऊत हे उद्योगातील नोकरी सोडून गावी गेल्या पाच वर्षांपासून नैसर्गिक शेती करतात. तेदेखील ग्रामीण भागात फिरून तपमानवाढीच्या धोक्याची माहिती देत आहेत. इच्छुक शेतकऱ्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत, या प्रयत्नांचीही दखल घेणे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपणही ही धोक्याची घंटा वेळीच ऐकायला हवी.