शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा

By admin | Updated: February 12, 2017 23:53 IST

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश

जागतिक तपमानवाढ हा विषय सातत्याने चघळला जात आहे; मात्र यावर उपाययोजनेबाबत फार कोणी गंभीर नाही. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात याविषयावर गांभीर्याने चर्चा होत नाही. तपमानवाढीला विकसित देश कारणीभूत आहेत; हे उघड सत्य असले तरी याबाबत कोणी आवाज उठवत नाही. हिमनग वितळणे ही प्रक्रिया आताच सुरू झालेली नसली तरी आता हे प्रमाण वाढले आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखली नाही तर सजीवाचा विनाश अटळ आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, कमाल तपमानात सातत्याने वाढ होणे, अवेळी पाऊस पडणे, हिमनद्या वितळणे, वादळे येणे; या गोष्टी जागतिक तपमानाशी निगडित आहेत. वादळे आणि महापूर हासुद्धा जागतिक तपमानवाढीचा परिणाम आहे. मुंबईसारख्या महानगराला यापूर्वी याचा फटका बसला आहे. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढणार आहे. हे नमूद करत असताना हिमालयात असाधारण बर्फवृष्टी सुरू आहे. आत्तापर्यंत ३०हून अधिक जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गेल्या महिन्याभरात उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली. ग्रीस, रूमानिया इत्यादि देशांत तपमान उणे ३० अंशांपेक्षा खाली गेले. यावेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत ऐतिहासिक दुष्काळ पडला आहे. आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी ४० अंशांपेक्षा जास्त तपमान होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे १००० फूट उंचीचा प्रचंड हिमखंड मूळ भागापासून सुटला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सन २०१६ हे तपमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तपमान हे विसाव्या शतकातील सरासरी तपमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तपमान २० व्या शतकाच्या सरासरी तपमानापेक्षा ०.९४ अंशांनी जास्त होते. तपमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे. ‘पॅरिस करार’ फक्त चार वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचवण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंशांच्या वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशांची ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तपमानात होत असल्याने सध्याच्या बालके व तरुणांच्या आयुष्यकाळातच मानवजात, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका अभ्यासक व्यक्त करत आहेत. भारतीय पर्यावरण चळवळीचे ठाण्याचे विक्रांत कर्णिक आणि इतर कार्यकर्ते पर्यावरणीय जनजागृतीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचा चार महिन्यांचा दौरा सायकलवरून करत आहेत. ते गावागावांत थांबून याबाबतची माहिती देत आहेत. डहाणूच्या ‘नरपड’ गावचे कुंदन राऊत हे उद्योगातील नोकरी सोडून गावी गेल्या पाच वर्षांपासून नैसर्गिक शेती करतात. तेदेखील ग्रामीण भागात फिरून तपमानवाढीच्या धोक्याची माहिती देत आहेत. इच्छुक शेतकऱ्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत, या प्रयत्नांचीही दखल घेणे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपणही ही धोक्याची घंटा वेळीच ऐकायला हवी.