शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

दळभद्री डब्ल्युटीओ

By admin | Updated: March 3, 2016 03:59 IST

जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करण्यासाठी स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) सदस्य आहेत. त्यांच्यातील

जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करण्यासाठी स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) सदस्य आहेत. त्यांच्यातील व्यापाराचे नियमन करण्याची आणि वाद उत्पन्न झाल्यास तो सोडविण्याची जबाबदारी डब्ल्यूटीओकडे आहे. अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रत्येक पाऊल पुरोगामीच असायला हवे. मात्र नुकताच तिने भारतासंदर्भात घेतलेला पवित्रा प्रतिगामीच म्हणायला हवा. जागतिक तपमानवाढ कमी करण्यास मदत करणे आणि त्याचवेळी ‘मेक इन इंडिया’ धोरणास अनुसरून देशाच्या विकासास चालना देणे, अशा दुहेरी उद्देशाने, अधिकाधिक प्रमाणात सौर उर्जेचा वापर करण्याचे धोरण भारताने आखले असून, सौर ऊर्जा निर्मितीसाठी देशातच निर्माण झालेल्या उपकरणांचा वापर करण्यास प्राधान्य देणे सुरू केले आहे. मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी देशातच तयार झालेल्या उपकरणांचा वापर केल्यास, अशा प्रकल्पांना अनुदान देण्याचा आणि त्यामधून निर्माण झालेली वीज निश्चित दराने खरेदी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. भारत, चीनसारख्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरणाऱ्या विकसनशील देशांनी कोळसा वा खनीज तेल जाळून वीज निर्माण करण्यापेक्षा, सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करणे संपूर्ण जगाच्याच हिताचे आहे. मात्र त्यासाठी देशातच उत्पादित उपकरणांच्या वापरास चालना देण्याच्या भारत सरकारच्या धोरणास मारक असा पवित्रा डब्ल्यूटीओने घेतला आहे. भारताच्या या धोरणाच्या विरोधात अमेरिकेने दाखल केलेल्या दाव्याची तळी उचलण्याचा दळभद्रीपणा करताना, आपण अंतत: जगाचेच नुकसान करीत आहोत, हे डब्ल्यूटीओने लक्षात घेतलेले दिसत नाही. भारत सध्या पाच गिगावॅट सौर वीज निर्मिती करतो आणि २०२२ पर्यंत १०० गिगावॅट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. ते साध्य झाल्यास प्रदूषणाच्या पातळीत आणि जागतिक तपमानवाढीत बऱ्यापैकी घट होऊ शकते. एकीकडे भारत आणि चीनने जागतिक तपमानवाढ कमी करण्यात आणखी मोठी भूमिका निभवावी, यासाठी दबाव आणायचा आणि दुसरीकडे तशा प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण करायचे, हे अमेरिकेच्या चिरपरिचित दुटप्पी वागणुकीला अगदी साजेसे आहे. किमान डब्ल्यूटीओने तरी अमेरिकेच्या चालीस बळी पडायला नको होते; पण शेवटी डब्ल्यूटीओ म्हणजे तरी काय? अमेरिकेने जन्मास घातलेले बाळच ना?