शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

बिहारमधील दुग्धक्रांती

By admin | Updated: February 16, 2017 23:52 IST

गेल्या वर्षभरातील दारूबंदीनंतर बिहारमध्ये आता साक्षात रामराज्य अवतरायला लागले आहे. येथील मद्यपींच्या हाती आता दारूऐवजी दुधाचे प्याले

गेल्या वर्षभरातील दारूबंदीनंतर बिहारमध्ये आता साक्षात रामराज्य अवतरायला लागले आहे. येथील मद्यपींच्या हाती आता दारूऐवजी दुधाचे प्याले आले आहेत. विशेष म्हणजे या दुधाचा लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम जाणवू लागला असून, राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही किमया करून दाखविली आहे. त्यांनी स्वत: सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही आनंदवार्ता दिली आहे. नितीशकुमार यांनी केलेला हा दावा खरा असेल तर ही एका सामाजिक क्रांतीची नांदीच म्हणावी लागेल. हेलन केलर यांनी म्हटले होते, तुम्ही तुमचे डोळे, कान, बोलण्याची शक्ती गमावली तरीसुद्धा काहीच गमावले नाही. पण तुम्ही तुमची इच्छाशक्ती गमावली तर सर्व काही गमावले. इच्छा तेथे मार्ग म्हटले जाते ते यामुळेच. नितीशकुमार यांनीसुद्धा आपल्या राज्यातील दारूबंदीचा निर्णय यशस्वी करून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली आहे. बिहारमध्ये वर्षभरापूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली त्यावेळी त्याच्या यशापयशाबद्दल अनेक शंकाकुशंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. येथील लोक दारूसाठी शेजारील राज्यांमध्ये कसे वणवणत आहेत त्याच्या सुरस बातम्याही कानी पडत होत्या. पण नितीशकुमार यांच्या सांगण्याप्रमाणे येथील मद्यप्रेमी आता दूधप्रेमी झाले आहेत. गुंडागर्दीसाठी बदनाम असलेल्या या राज्यात अपहरणाची प्रकरणे ६१.७६ टक्के तर हत्त्येचे प्रमाण २८ टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय दरोडे, बलात्काराच्या घटनांमध्येही कमतरता आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपघात २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर दुसरीकडे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. दारूबंदीने या राज्यात खरोखरच हा चमत्कार घडला असेल तर इतर राज्यांनीही किंबहुना अख्ख्या देशातच बिहारचे हे दारूबंदी मॉडेल राबवायला हवे. महाराष्ट्रात म्हणायला काही जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण प्रत्यक्षात याच ठिकाणी जास्त दारू विकली जात असल्याचे ऐकिवात येते. यासंदर्भात आपल्याला वर्धा जिल्ह्याचे उदाहरण घेता येईल. थोडक्यात म्हणजे दारूबंदी हा निव्वळ एक फार्स ठरला आहे. एरवी दारू सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध असते. पंजाबसारख्या राज्यात तर मद्य आणि अमलीपदार्थांच्या आहारी जाऊन तरुणपिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होते आहे. तेथील राजकीय नेत्यांनीही केवळ तोंडाची वाफ न दवडता नितीशकुमार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. खरे तर या दारूबंदीमुळे राज्याच्या तिजोरीला वार्षिक कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. पण त्याची भरपाई इतर काही करांच्या माध्यमाने करण्यात आली. चालण्याची इच्छा नसलेला गरुड एक पाऊलही पुढे टाकत नाही पण काम करण्याची इच्छा असलेली मुंगी अनेक योजने अंतर चालून जातेच ना!