शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्थलांतराचा शाप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 14:42 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोनामुळे जग बदलले, अर्थकारण बदलले असे म्हटले जात असले तरी खान्देशातील आदिवासी बांधवांच्या नशिबी असलेला स्थलांतराचा शाप ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनामुळे जग बदलले, अर्थकारण बदलले असे म्हटले जात असले तरी खान्देशातील आदिवासी बांधवांच्या नशिबी असलेला स्थलांतराचा शाप कायम आहे. दरवर्षी शेकडो मजूर गुजराथ, कर्नाटकात रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात. सरकारच्या रोजगार हमी योजनेसह अनेक योजना असूनही गाव सोडून स्थलांतराची वेळ या मजुरांवर येते, याचा अर्थ स्पष्ट आहे. यंदा, तर आॅक्टोबरऐवजी सप्टेबरमध्येच स्थलांतर सुरु झाले आहे.

कोरोना काळ आणि बिकट अर्थव्यवस्था यामुळे स्थलांतर केलेल्या लोकांचे रोजगार जात आहे. शहादा तालुक्यातील लोहारा या गावातील प्रकाश अंबालाल चौधरी या २८ वर्षीय युवकाने नोकरी गेल्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाशने आयटीआय केले होते आणि आठ वर्षांपासून तो पुण्यात नोकरी करीत होता. कोरोना काळात उद्योग बंद राहिले, त्यामुळे कामगारांची कपात केली गेली. घरभाडे, खाणावळीचा खर्च यामुळे कर्जबाजारी झालेल्या प्रकाशला नैराश्य आले. दोन दिवसांपूर्वी तो पुण्याहून परतला ते थेट मामाकडे वडाळी येथे आला. बुधवारी, ९ सप्टेबर रोजी मामाच्या शेतात तो गेला. तेथून मोठा भाऊ किरणला त्याने अहमदाबादला फोन केला. किरणदेखील खाजगी कंपनीत नोकरी करतो. भाऊ, मी हरलोय. जीवनयात्रा संपवतोय. आईची काळजी घे, असे सांगितले. आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरु नये, असे चिठ्ठीत लिहून त्याने गळफास जवळ केला. किती दुर्देवी घटना आहे. अशा अनेक प्रकाशच्या आयुष्यात अंधार पसरला असेल.

स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरदेखील आम्ही ‘मागेल त्याला काम’ देऊ शकत नाही. हंगामी स्थलांतराची समस्या सोडवू शकलो नाही. महात्मा गांधी यांचे ‘ग्रामस्वराज्य’ ही संकल्पना प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात अडकून पडली आहे. पंचायत राज व्यवस्था कागदावर खूप चांगली आहे. परंतु, वास्तव वेगळेच आहे. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांनी १०० रुपयांचे सांगितलेले गणित अद्यापही कायम आहे. केद्र सरकारने १०० रुपये दिले, तर ते गावापर्यंत येताना केवळ १५ रुपये येतात. वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत असला तरी त्याचा लाभ गरजूंना किती होतो, हा संशोधनाचा विषय ठरावा.

कोरोना काळात परराज्य आणि महाराष्टÑाच्या इतर जिल्ह्यात असलेल्या खान्देशातील मूळ रहिवाशांना उद्योग - धंदे गेल्याने गावी परत यावे लागले. मुळात याठिकाणी असलेल्या रहिवाशांना वर्षातून आठ महिने हंगामी स्थलांतर करावे लागते. त्यात भाऊबंदाचे भागणार कसे. चार महिने कसेबसे काढले आणि सगळे पुन्हा कामाच्या शोधात शहराकडे धावले. प्रशासन मात्र स्वत:ची पाठ थोपटून घेतेय, या चार महिन्यात नंदुरबार जिल्ह्याने नाशिक विभागात सर्वाधिक रोजगार हमी योजनेची कामे केली आहे.काय खरे, काय खोटे, देव जाणे.रोजगार हमी योजनेची कामे कशी चालतात, याचा अनुभव शहादा तालुक्यातील गणोर येथील ग्रामस्थांना आला. प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलाच्या कामासाठी अकुशल देय रक्कम म्हणून प्रत्येक लाभार्थीला १८ हजार रुपये देण्यात येतात. या गावातील १५ पैकी ९ लाभार्र्थींची घरे बांधून पूर्ण झाली. पण अद्यापही त्यांच्या जॉबकार्डवर देय रक्कम जमा झालेली नाही. ग्रामस्थांनी पाठपुरावा केला असता, ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायत आॅपरेटर यांनी स्वत:च्या कुटुंबातील लोकांच्या नावे ही रक्कम टाकून घेतली असल्याचे उघड झाले. आतापर्यंत अशा पध्दतीने ५० ते ६० लोकांची रक्कम या दोघांनी हडपल्याचा संशय आहे. आता प्रशासकीय पातळीवर चौकशी आणि कारवाई सुरु झाली असली तरी लाभार्थी मात्र वंचित आहेत.

नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. केद्र सरकारचा कोटयवधी रुपयांचा निधी याठिकाणी येतो. मात्र तरीही हंगामी स्थलांतराची समस्या कायम आहे. या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये बाधा येते. आदिवासी भागात आश्रमशाळा, वसतिगृह, गाव तेथे शाळा, आंतरराष्टÑीय शाळा, आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश अशा मोठ्या संधी शिक्षणासाठी उपलब्ध असल्या तरी पालक आणि त्यांचे पाल्य रोजगारासाठी ७ ते ८ महिने स्थलांतर करीत असतील, तर शिक्षण घेणार कसे? २०१८ -१९ ची आकडेवारी पाहता चौथीनंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४९२, पटावर आहेत, पण शाळेत येत नाही असे विद्यार्थी ५ हजार ८३४, ३० दिवसांपेक्षा अधिक गैरहजर विद्यार्थी ६ हजार ३६८, चौथीनंतर शाळेत न आलेले विद्यार्थी ३ हजार ३६७ आहेत. स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह आता प्रशासनाचा विचाराधीन आहे.

या कोरोनाकाळात अंगणवाडी बंद होत्या. त्यामुळे माता व बालकांना घरपोच अमृत आहार देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र दोन महिने उशिरा हा आहार पोहोचविण्यात आला. त्यामुळे कुपोषण चारपटीने वाढल्याचे समोर आले आहे. शासन, प्रशासनाच्या चौकशीचे आदेश निघाले, तरी कारवाई आणि आहाराची प्रतीक्षा करण्यापेक्षा आदिवासी बांधव हंगामी स्थलांतरासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव