शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाचाळांची ‘संस्कृती’

By admin | Updated: September 14, 2016 05:02 IST

नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे

नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे ती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी. परदेशी महिला पर्यटकांनी भारतात स्कर्ट परिधान करू नये, असा अनाहूत सल्ला त्यांनी दिला आहे. पण तो देताना आपल्या देशात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट संकेत आपण देत आहोत याचे साधे भानही त्यांना राहिले नाही. नंतर सारवासारव करताना आपली सूचना केवळ धार्मिक स्थळांपुरती मर्यादित असल्याचे शर्मा यांनी म्हटले. पण त्यावर कोण विश्वास ठेवणार? याआधीही शर्मा यांनी महिलांबाबत अविचारी विधाने करण्याचा असांस्कृतिकपणा दाखविला होता. रात्रीच्या वेळी मुलींचे बाहेर फिरणे ही भारतीय संस्कृती नसल्याचा जावईशोध त्यांनी लावला होता. शर्मा यांच्या स्कर्टबाबतच्या सूचनेचे पडसाद उमटले आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातींना लिहिलेल्या पत्रात शर्मांंना काही शालीजोडीतले ठेऊन दिले. ‘तुमच्या स्कर्टची लांबी तुमचे चरित्र ठरवत नाही. समाज तुमच्यावर व तुमच्या विचारांवर काही मर्यादा घालण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही मात्र तुम्हाला योग्य वाटेल, पटेल तेच करा’ असा प्रेमाचा सल्ला एक आजोबा या नात्याने त्यांनी दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर वैदिक काळातील महिलांना वस्त्रप्रावरणाबाबत मोदी राजवटीपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते, असा सणसणीत टोलाच लगावला. मुलींच्या परिधानाला दोष देणारे कधी पुरुषांमधील विकृती कशी दूर सारता येईल, याचा सल्ला देताना मात्र दिसत नाहीत. केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून तर असल्या वाचाळवीरांना उधाणच आले आहे. व्ही.के.सिंह, गिरीराजसिंह, साध्वी निरंजन ज्योती, सुब्रह्मण्यम स्वामी यांसारख्या नेत्यांच्या बेलगाम व्यक्तव्यांमुळे सरकार व भाजपावर अनेकदा नामुष्कीची वेळ आली. पण त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही, हेही तेवढेच खरे!