शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक राजकारण!

By admin | Updated: February 6, 2017 23:50 IST

मिरवायची हौस आहे; पण निधी जमवण्याचं ओझं नको, आयोजनाचे कष्ट नकोत या भावनेतून जेव्हापासून साहित्यिकांनी वेगवेगळ्या संस्थांवर संमेलन आयोजनाची जबाबदारी टाकली

मिरवायची हौस आहे; पण निधी जमवण्याचं ओझं नको, आयोजनाचे कष्ट नकोत या भावनेतून जेव्हापासून साहित्यिकांनी वेगवेगळ्या संस्थांवर संमेलन आयोजनाची जबाबदारी टाकली, तेव्हापासून व्यासपीठावर अमुक मंडळी नकोत हे सांगण्याचा हक्कही त्यांनी गमावला. पण त्यानंतरही दरवर्षी राजकारण्यांच्या वावराला आक्षेप घेत मतांची पिंक टाकल्याखेरीज एकही संमेलन पार पडत नाही. यंदा डोंबिवलीच्या संमेलनात तर महामंडळानेच पुढाकार घेत राजकारण्यांबाबत ‘सूचना’ केली.

योग्यवेळी सोईस्कररीत्या ती मागेही घेतली. एरवी मराठीच्या नावाने गळे काढत राजकारण करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या संमेलनात ‘दांडी-यात्रा’ घडवून मराठी माणूस हा त्यांच्या लेखी कसा राजकारणापुरता उरला आहे हेच दाखवून दिले. या व्यासपीठाचा हक्काने वापर करून त्यांना त्यांच्या भूमिका मांडता आली असती; पण ती संधी त्यांनी गमावली. त्यामुळे आता साहित्यात काय घडायला हवे हे सांगण्याचा नैतिक अधिकारही त्यांना उरलेला नाही. तसाच तो साहित्य रसिकांनाही, राहिलेला नाही. त्यांनी दाखविलेला निरुत्साहही तितकाच ठळक आहे. संमेलन सांगतेला खुल्या अधिवेशनात मंजूर होणारे ठराव हा फक्त उपचार उरला आहे.

स्वत: येण्या-जाण्यासाठी गाडी मागायची, मानधन घ्यायचे, चांगल्या हॉटेलात सोय लावून घ्यायची, संमेलनाचा खर्च कोट्यवधींच्या घरात न्यायचा आणि ऐश्वर्याचे प्रदर्शन करू नये, असा ठराव करून मानभावीपणा दाखवायचा उद्योगही झाला. ठराव मंजूर करताना भूमिका न घेणे, व्यक्ती किंवा संस्थांचे नावही न घेणे हे त्यांच्या भाषेचे राजकीय वैशिष्ट्य. बंद उद्योग सुरू करा, कामगारांची देणी द्या, २७ गावे वेगळी करा, संपादित जमिनींना बाजारभाव द्या हे असले ठराव करणाऱ्या महामंडळाने आपल्या पायाखाली काय जळते आहे ते एकदा वाकून पाहायला हवे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, सीमाभागातील मराठीजनांना पाठिंबा, मराठी अधिकारी नेमा, अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, पुरोगाम्यांवरील हल्ले रोखा असे ठराव वारंवार करून महामंडळ त्याचे पुढे काय करते, तर पुढच्या अधिवेशनाची वाट पाहते. त्यामुळे इतरांच्या कृतीचे मूल्यमापन करण्याचा टेंभा त्यांना मिरवता येत नाही. मग संमेलनाला कुणी बैलबाजार म्हणतो, साहित्यिकांना कुणी फुकटे म्हणतो. पण त्यांच्यावाचून यांचे पानही हलत नाही. मग अशा अभिनिवेशाची धार बोथट होणार नाही तर काय?