शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक राजकारण!

By admin | Updated: February 6, 2017 23:50 IST

मिरवायची हौस आहे; पण निधी जमवण्याचं ओझं नको, आयोजनाचे कष्ट नकोत या भावनेतून जेव्हापासून साहित्यिकांनी वेगवेगळ्या संस्थांवर संमेलन आयोजनाची जबाबदारी टाकली

मिरवायची हौस आहे; पण निधी जमवण्याचं ओझं नको, आयोजनाचे कष्ट नकोत या भावनेतून जेव्हापासून साहित्यिकांनी वेगवेगळ्या संस्थांवर संमेलन आयोजनाची जबाबदारी टाकली, तेव्हापासून व्यासपीठावर अमुक मंडळी नकोत हे सांगण्याचा हक्कही त्यांनी गमावला. पण त्यानंतरही दरवर्षी राजकारण्यांच्या वावराला आक्षेप घेत मतांची पिंक टाकल्याखेरीज एकही संमेलन पार पडत नाही. यंदा डोंबिवलीच्या संमेलनात तर महामंडळानेच पुढाकार घेत राजकारण्यांबाबत ‘सूचना’ केली.

योग्यवेळी सोईस्कररीत्या ती मागेही घेतली. एरवी मराठीच्या नावाने गळे काढत राजकारण करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या संमेलनात ‘दांडी-यात्रा’ घडवून मराठी माणूस हा त्यांच्या लेखी कसा राजकारणापुरता उरला आहे हेच दाखवून दिले. या व्यासपीठाचा हक्काने वापर करून त्यांना त्यांच्या भूमिका मांडता आली असती; पण ती संधी त्यांनी गमावली. त्यामुळे आता साहित्यात काय घडायला हवे हे सांगण्याचा नैतिक अधिकारही त्यांना उरलेला नाही. तसाच तो साहित्य रसिकांनाही, राहिलेला नाही. त्यांनी दाखविलेला निरुत्साहही तितकाच ठळक आहे. संमेलन सांगतेला खुल्या अधिवेशनात मंजूर होणारे ठराव हा फक्त उपचार उरला आहे.

स्वत: येण्या-जाण्यासाठी गाडी मागायची, मानधन घ्यायचे, चांगल्या हॉटेलात सोय लावून घ्यायची, संमेलनाचा खर्च कोट्यवधींच्या घरात न्यायचा आणि ऐश्वर्याचे प्रदर्शन करू नये, असा ठराव करून मानभावीपणा दाखवायचा उद्योगही झाला. ठराव मंजूर करताना भूमिका न घेणे, व्यक्ती किंवा संस्थांचे नावही न घेणे हे त्यांच्या भाषेचे राजकीय वैशिष्ट्य. बंद उद्योग सुरू करा, कामगारांची देणी द्या, २७ गावे वेगळी करा, संपादित जमिनींना बाजारभाव द्या हे असले ठराव करणाऱ्या महामंडळाने आपल्या पायाखाली काय जळते आहे ते एकदा वाकून पाहायला हवे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, सीमाभागातील मराठीजनांना पाठिंबा, मराठी अधिकारी नेमा, अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, पुरोगाम्यांवरील हल्ले रोखा असे ठराव वारंवार करून महामंडळ त्याचे पुढे काय करते, तर पुढच्या अधिवेशनाची वाट पाहते. त्यामुळे इतरांच्या कृतीचे मूल्यमापन करण्याचा टेंभा त्यांना मिरवता येत नाही. मग संमेलनाला कुणी बैलबाजार म्हणतो, साहित्यिकांना कुणी फुकटे म्हणतो. पण त्यांच्यावाचून यांचे पानही हलत नाही. मग अशा अभिनिवेशाची धार बोथट होणार नाही तर काय?