शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

गाळप की लागवड?

By admin | Updated: September 3, 2015 21:51 IST

मुख्यमंत्र्यांनीच आता खुलासा करुन टाकला ते बरे झाले. खरे तर अजून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरु व्हायला दोन-अडीच महिन्यांचा अवकाश आहे.

मुख्यमंत्र्यांनीच आता खुलासा करुन टाकला ते बरे झाले. खरे तर अजून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरु व्हायला दोन-अडीच महिन्यांचा अवकाश आहे. खुद्द सरकारच म्हणते की, अजून आम्ही पावसाची आशा सोडलेली नाही. परतीचा का होईना पाऊस मेहरबानी करुन जाईल, असे अनेकाना वाटते तर सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, पैसेवारीची (त्यांचा शब्द आणेवारी) वाट न पाहता, आत्ताच दुष्काळ जाहीर करुन टाका. महसूल मंत्री म्हणतात, साखर तयार करायला खूप पाणी लागते, तेव्हां गाळप होऊ देणार नाही. त्यांचेच सहकारी मंत्री याला विरोध करतात. पाचामुखी परमेश्वर असतो. इथे डझनामुखी सरकार दिसते. राज्यातील सहकारी साखर उद्योग काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीची पाठराखण करणारा असल्याने तिला नामोहरम करण्याचा हेतु यामागे असेल तर राष्ट्रवादीही तक्रार करु शकत नाही. कारण लोकानीच पाच वर्षांसाठी आपले भवितव्य विद्यमान भाजपा-सेनेच्या सरकारच्या हाती सुपूर्द केले आहे. पण आता मुख्यमंत्री म्हणतात, जिथे प्यायलाही पाणी मिळण्याची मारामार होऊ शकते, तिथे गाळपावरील बंदीचा विचार होऊ शकतो. लागवडीवरील बंदीबाबत त्यांची सूचना संबंधित शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाकडे वळावे अशी आहे. ते होईल तेव्हां होईल. पण मुद्दा तो नाही. महसूल मंत्री खडसे म्हणतात, गाळपावर बंदी लादून गाळपासाठी उभा असलेला ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरु! तो कसा वापरणार? ऊसाचे वाढे किंवा बांडी जनावरे खातात किंवा खाऊ शकतात कारण ते ऊसाच्या तुलनेत मऊ आणि पाणीदार असते. तरीही सधन शेतकरी आणि बडे दूध व्यावसायिक त्याची कुट्टी करुन म्हणजे यंत्रात ते बारीक करुनच जनावरांना खाऊ घालतात. त्याच्यात एक महत्वाचा फायदा म्हणजे चाऱ्याचे नुकसान होत नाही. जनावरे संपूर्ण ऊस मात्र खाऊच शकत नाहीत, त्याची कुट्टीच करावी लागते. सरकारला चिंता छोट्या शेतकऱ्यांची व मोजकी जनावरे बाळगणाऱ्यांची असते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. ते खरे असतेच असे नाही. तरीही अशा लहानांकडे कडबा कुट्टी वा तत्सम साधने नसतातच. मग राखून ठेवलेला ऊस, दुष्काळी भागातील लहान शेतकरी, त्याची जित्राबे व सरकारला वाटणारी या दोहोंची चिंता यांचा मेळ कसा बसू शकतो? सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडेच मोडायचे असेल तर गाळपावर नव्हे लागवडीवरच सरकारने बंदी आणावी. बिना मेहनतीच्या या पिकापायी राजकारणात वाढलेले तण तरी काही प्रमाणात कमी होऊ शकेल.