शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाळणाघर कायदा हवाच

By admin | Updated: June 13, 2017 05:13 IST

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडावे लागल्याने त्यांना आपल्या मुला-मुलीला सांभाळण्यासाठी पाळणाघराची मदत घ्यावी लागते. मूल अगदी लहान असेल, तर पाळणाघरात त्याला ठेवून जाणे महिलांसाठी फारच गैरसोयीचे ठरते. त्यांचा शारीरिक, मानसिक ताण त्यांच्यावर येतो. अशा महिलांचे प्रमाण मोठे असल्याने खासगी, सरकारी किंवा कोणत्याही संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलात पाचशेपेक्षा जास्त महिला काम करीत असल्यास तेथे स्वतंत्र पाळणाघर चालविणे बंधनकारक करावे, अशी शिफारस राज्य महिला आयोगाने केली आहे. राज्य शासनाने महिलांना दिलासा देण्यासाठी पाळणाघरविषयक कायदा करावा, अशी मागणीही आयोगाने केली आहे. खरे तर विशिष्ट महिला कर्मचारी संख्या असली तर पाळणाघर हवेच, असे नियम आहेत. पण त्यांचे अस्तित्व फक्त कागदोपत्रीच असल्याने यासंबंधी थेट कायदाच करावा, असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने केला आहे. काही पाळणाघरांत बालकांची हेळसांड होते, काही ठिकाणी तर त्यांना अमानुष मारहाण होत असल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासन, स्वयंसेवी संस्था आणि खासगी व्यक्तींमार्फत चालविण्यात येत असलेली पाळणाघरांसाठी स्वतंत्र कायदा, तसेच कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने नुकताच घेतला होता. पण अद्याप त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने पाळणाघरांसंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री-राज्यपालांना दिला आहे. मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत शासकीय आस्थापनांतच जिथे पाळणाघरांची सोय नाही, तेथे खासगी क्षेत्रातील याविषयीची उपेक्षा काय वर्णावी?