शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गुन्ह्याची चढती कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 04:35 IST

महिलांची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. मग ते अगदी निर्भया प्रकरण असो अथवा कोपर्डीचे. महिला सुरक्षितता हा सुरक्षा यंत्रणांसह सरकारचा जरी प्राधान्याचा विषय असला तरीदेखील महिलांच्या संदर्भातील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र निर्माण करते.

महिलांची सुरक्षितता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. मग ते अगदी निर्भया प्रकरण असो अथवा कोपर्डीचे. महिला सुरक्षितता हा सुरक्षा यंत्रणांसह सरकारचा जरी प्राधान्याचा विषय असला तरीदेखील महिलांच्या संदर्भातील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र निर्माण करते. महिला अत्याचाराच्या घटना तर रोज माध्यमांतून मांडल्या जात असतातच. मात्र आता बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जारी केलेली आहे. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील गायब झालेल्या पाच लाख लोकांमधून ९४ हजार आपल्या राज्यातील आहेत. त्यात तब्बल ४९ हजार महिलांचा समावेश आहे. ही आकडेवारी केवळ गेल्या वर्षीची आहे. यातून या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढते. या आकडेवारीमुळे महाराष्ट्राची एक काळी बाजू उजेडात आली आहे. खरेतर पूर्वी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य समजले जायचे. अनेक ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंग मिळवण्यासाठी धडपड करीत. अगदी निवृत्तीनंतरही महाराष्ट्रात आयुष्य घालवणारे शेकडो अधिकारी आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची सुरक्षेची प्रतिमा ढासळत चालल्याचे चित्र दिसते. नव्या आकडेवारीमुळे राज्याची गुन्ह्याची दिसलेली चढती कमान गौरवास्पद नक्कीच नाही. एकेकाळी स्कॉटलंड पोलिसांबरोबर तुलना होणाºया मुंबई पोलिसांची कामगिरीही या आकडेवारीच्या निमित्ताने तपासायला हवी. गुन्ह्यांमध्ये महिलांचा वाढता वापर केवळ चिंताजनक नाही, तर गुन्ह्याची परिसीमा गाठणारा आहे. त्यामुळे बेपत्ता होणाºया महिलांचा शोध घेण्याचे प्रमाण आणि त्यामागची कारणे याचा गांभीर्याने तपास व्हायला हवा. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची ही आकडेवारी गुन्ह्यांचे प्रमाण सिद्ध करणारी अधिकृत आकडेवारी असल्याने पोलिसांच्या कामगिरीचा आलेखही एका बाजूने स्पष्ट होतो. आधीच सांगलीसारख्या घटनांनी पोलीस खात्याला काळिमा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातून ही गुन्ह्यांची वाढती आकडेवारी भूषणावह नाही. त्यामुळे सर्वच समाजधुरिणांनी याचा सर्व स्तरावर विचार करायला हवा. राज्याच्या विकासाचा अजेंडा कितीही बडवला तरी वाढती गुन्हेगारी हेही राज्याची गडद बाजू दाखवणारी चिंताजनक बाब असते. हा चिंतेचा विषय आता चिंतनाचा व्हायला हवा. आपल्याकडे अनेक उत्तम पोलीस अधिकाºयांचावारसा आहे. काही जुन्या, जाणत्या धुरिणांना एकत्र करून विचार विनिमय व्हायला हवा. तरच राज्याची खºया अर्थाने प्रगती साधणे शक्य होईल.

 

टॅग्स :Crimeगुन्हा