शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनच की ते

By admin | Updated: June 2, 2016 02:00 IST

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत. पण हे सारे एकप्रकारे शवविचेछदनासारखेच असेल. देशातील लष्करास आवश्यक दारुगोळा साठवून ठेवल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या लष्करी भांडारास अचानक आग लागावी आणि या आगीने मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा भस्मसात करतानाच त्याहून अधिक क्लेषकारक आणि दु:खद म्हणजे लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या आणि अग्नी प्रतिबंधक तुकडीतील जवानांचा बळी घ्यावा ही बाब दुर्लक्षिण्यासारखी आणि सहजभावाने घेण्यासारखी नाही. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात असताना तेथील एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि दक्षता याबाबत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीच शंका बोलून दाखविली आहे. देश पारतंत्रात असताना ब्रिटिशांनी या भांडाराची निर्मिती केली होती आणि त्यांनी सुरक्षेची जी काही यंत्रणा तयार केली होती, तीच आजदेखील कायम असल्याचेही या निवृत्तांनी म्हटले आहे. वस्तुत: जिथे लष्कराचा वास आहे किंवा जो भूभाग संरक्षण यंत्रणेच्या तीक्ष्ण नजरेखाली आहे तिथे झाला तर केवळ अपघातच होऊ शकतो, घातपात नव्हे अशी स्थिती कोणे एकेकाळी असेल, पण आज ती तशी नाही, हे नाकारता येत नाही. देशातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आणि अत्यंत रास्तपणे ज्याला देशातील लोकशाहीचे गंडस्थळ मानले जाते असे संसद भवन अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांपासून सुरक्षित राहू शकत नाही आणि केवळ तितकेच नव्हे तर भारतीय हवाई दलाच्या मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळात अतिरेकी घुसतात तेव्हां पुलगावसारखी घटना घडल्यानंतर जनसामान्यांच्या मनात घातपाताची शंका डोकावली तर त्यात आश्चर्य नाही. पण जेव्हां हा नि:संशय घातपात नाही असे काही लोक अगदी नि:संदिग्धपणे सांगतात आणि ते सांगतानाच या दारुगोळा भांडाराच्या विस्तीर्ण परिसरात वाढलेल्या आणि आता वाळलेल्या गवताकडे अंगुलीनिर्देश करतात तेव्हां चिंता आणखीनच खोलवर जाते. या वाळलेल्या गवतावर एखादी अज्ञात ठिणगी पडून पुढील हाहाकार माजला असेल तर मग आपत्ती निवारण कार्यक्रमात कोणत्या बाबींचा समावेश होत असतो आणि संभाव्य आपत्तींचे धोके म्हणून कशाकशाचा समावेश केला जातो हा गंभीर उत्सुकतेचा विषय ठरतो. या घात वा अपघाताची चौकशी झाल्यानंतर आता तिथे भविष्यात असा कोणताही प्रकार घडणार नाही याची ग्वाही देणारी वक्तव्ये केली जातील. केवळ तितकेच नव्हे तर देशातील सर्व संवेदनशील आणि संरक्षक दलांच्या दृष्टीने मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या वास्तू तसेच परिसरात आता कसा चोख बंदोबस्त तैनात केला गेला आहे याचा तपशीलदेखील जाहीर केला जाईल. पण जनसामान्यांना या तपशीलात नव्हे तर देशाच्या सुरक्षेत स्वारस्य असते आणि जेव्हां केव्हां अशा घटना घडतात तेव्हां मन कातर होऊन जाते.