शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शवविच्छेदनच की ते

By admin | Updated: June 2, 2016 02:00 IST

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत. पण हे सारे एकप्रकारे शवविचेछदनासारखेच असेल. देशातील लष्करास आवश्यक दारुगोळा साठवून ठेवल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या लष्करी भांडारास अचानक आग लागावी आणि या आगीने मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा भस्मसात करतानाच त्याहून अधिक क्लेषकारक आणि दु:खद म्हणजे लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या आणि अग्नी प्रतिबंधक तुकडीतील जवानांचा बळी घ्यावा ही बाब दुर्लक्षिण्यासारखी आणि सहजभावाने घेण्यासारखी नाही. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात असताना तेथील एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि दक्षता याबाबत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीच शंका बोलून दाखविली आहे. देश पारतंत्रात असताना ब्रिटिशांनी या भांडाराची निर्मिती केली होती आणि त्यांनी सुरक्षेची जी काही यंत्रणा तयार केली होती, तीच आजदेखील कायम असल्याचेही या निवृत्तांनी म्हटले आहे. वस्तुत: जिथे लष्कराचा वास आहे किंवा जो भूभाग संरक्षण यंत्रणेच्या तीक्ष्ण नजरेखाली आहे तिथे झाला तर केवळ अपघातच होऊ शकतो, घातपात नव्हे अशी स्थिती कोणे एकेकाळी असेल, पण आज ती तशी नाही, हे नाकारता येत नाही. देशातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आणि अत्यंत रास्तपणे ज्याला देशातील लोकशाहीचे गंडस्थळ मानले जाते असे संसद भवन अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांपासून सुरक्षित राहू शकत नाही आणि केवळ तितकेच नव्हे तर भारतीय हवाई दलाच्या मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळात अतिरेकी घुसतात तेव्हां पुलगावसारखी घटना घडल्यानंतर जनसामान्यांच्या मनात घातपाताची शंका डोकावली तर त्यात आश्चर्य नाही. पण जेव्हां हा नि:संशय घातपात नाही असे काही लोक अगदी नि:संदिग्धपणे सांगतात आणि ते सांगतानाच या दारुगोळा भांडाराच्या विस्तीर्ण परिसरात वाढलेल्या आणि आता वाळलेल्या गवताकडे अंगुलीनिर्देश करतात तेव्हां चिंता आणखीनच खोलवर जाते. या वाळलेल्या गवतावर एखादी अज्ञात ठिणगी पडून पुढील हाहाकार माजला असेल तर मग आपत्ती निवारण कार्यक्रमात कोणत्या बाबींचा समावेश होत असतो आणि संभाव्य आपत्तींचे धोके म्हणून कशाकशाचा समावेश केला जातो हा गंभीर उत्सुकतेचा विषय ठरतो. या घात वा अपघाताची चौकशी झाल्यानंतर आता तिथे भविष्यात असा कोणताही प्रकार घडणार नाही याची ग्वाही देणारी वक्तव्ये केली जातील. केवळ तितकेच नव्हे तर देशातील सर्व संवेदनशील आणि संरक्षक दलांच्या दृष्टीने मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या वास्तू तसेच परिसरात आता कसा चोख बंदोबस्त तैनात केला गेला आहे याचा तपशीलदेखील जाहीर केला जाईल. पण जनसामान्यांना या तपशीलात नव्हे तर देशाच्या सुरक्षेत स्वारस्य असते आणि जेव्हां केव्हां अशा घटना घडतात तेव्हां मन कातर होऊन जाते.