शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनच की ते

By admin | Updated: June 2, 2016 02:00 IST

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत

तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत. पण हे सारे एकप्रकारे शवविचेछदनासारखेच असेल. देशातील लष्करास आवश्यक दारुगोळा साठवून ठेवल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या लष्करी भांडारास अचानक आग लागावी आणि या आगीने मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा भस्मसात करतानाच त्याहून अधिक क्लेषकारक आणि दु:खद म्हणजे लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या आणि अग्नी प्रतिबंधक तुकडीतील जवानांचा बळी घ्यावा ही बाब दुर्लक्षिण्यासारखी आणि सहजभावाने घेण्यासारखी नाही. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात असताना तेथील एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि दक्षता याबाबत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीच शंका बोलून दाखविली आहे. देश पारतंत्रात असताना ब्रिटिशांनी या भांडाराची निर्मिती केली होती आणि त्यांनी सुरक्षेची जी काही यंत्रणा तयार केली होती, तीच आजदेखील कायम असल्याचेही या निवृत्तांनी म्हटले आहे. वस्तुत: जिथे लष्कराचा वास आहे किंवा जो भूभाग संरक्षण यंत्रणेच्या तीक्ष्ण नजरेखाली आहे तिथे झाला तर केवळ अपघातच होऊ शकतो, घातपात नव्हे अशी स्थिती कोणे एकेकाळी असेल, पण आज ती तशी नाही, हे नाकारता येत नाही. देशातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आणि अत्यंत रास्तपणे ज्याला देशातील लोकशाहीचे गंडस्थळ मानले जाते असे संसद भवन अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांपासून सुरक्षित राहू शकत नाही आणि केवळ तितकेच नव्हे तर भारतीय हवाई दलाच्या मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळात अतिरेकी घुसतात तेव्हां पुलगावसारखी घटना घडल्यानंतर जनसामान्यांच्या मनात घातपाताची शंका डोकावली तर त्यात आश्चर्य नाही. पण जेव्हां हा नि:संशय घातपात नाही असे काही लोक अगदी नि:संदिग्धपणे सांगतात आणि ते सांगतानाच या दारुगोळा भांडाराच्या विस्तीर्ण परिसरात वाढलेल्या आणि आता वाळलेल्या गवताकडे अंगुलीनिर्देश करतात तेव्हां चिंता आणखीनच खोलवर जाते. या वाळलेल्या गवतावर एखादी अज्ञात ठिणगी पडून पुढील हाहाकार माजला असेल तर मग आपत्ती निवारण कार्यक्रमात कोणत्या बाबींचा समावेश होत असतो आणि संभाव्य आपत्तींचे धोके म्हणून कशाकशाचा समावेश केला जातो हा गंभीर उत्सुकतेचा विषय ठरतो. या घात वा अपघाताची चौकशी झाल्यानंतर आता तिथे भविष्यात असा कोणताही प्रकार घडणार नाही याची ग्वाही देणारी वक्तव्ये केली जातील. केवळ तितकेच नव्हे तर देशातील सर्व संवेदनशील आणि संरक्षक दलांच्या दृष्टीने मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या वास्तू तसेच परिसरात आता कसा चोख बंदोबस्त तैनात केला गेला आहे याचा तपशीलदेखील जाहीर केला जाईल. पण जनसामान्यांना या तपशीलात नव्हे तर देशाच्या सुरक्षेत स्वारस्य असते आणि जेव्हां केव्हां अशा घटना घडतात तेव्हां मन कातर होऊन जाते.