शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचे स्मशान! स्मशानाचा धर्म!

By admin | Updated: March 12, 2017 01:14 IST

रस्त्याने जाताना मी जेव्हा हिंदूंचे स्मशान, मुस्लिमांचे कब्रस्तान वा ख्रिश्चनांची दफनभूमी पाहतो तेव्हा विचारांचे काहूर माजते. हसावे की रडावे तेच कळत नाही. खरेतर मन विषण्ण होते.

- डॉ. नीरज देव

रस्त्याने जाताना मी जेव्हा हिंदूंचे स्मशान, मुस्लिमांचे कब्रस्तान वा ख्रिश्चनांची दफनभूमी पाहतो तेव्हा विचारांचे काहूर माजते. हसावे की रडावे तेच कळत नाही. खरेतर मन विषण्ण होते. माणूस म्हणविणाऱ्या माणसा-माणसांतील भिंती मरणानंतरही तशाच राहतात तर! धन-काञ्चन-हाडामासाच्या स्त्रीचासुद्धा त्याग करा, असे सांगणारा धर्म मृत्तिकावत् देहाचा लोभ का बरे सोडत नसावा? देहावर अंतिम संस्कार होणाऱ्या जागेचा व पद्धतीचा एवढा मोह, विरागी म्हणवून घेणाऱ्या धर्माला का बरे पडावा?स्मशान कोणाचेही असो हिंदूंची दहनभूमी वा मुस्लीम-ख्रिश्चनांची दफनभूमी; मन उदास करते. जीवनाची नश्वरता क्षणोक्षणी दाटून आणते. वाटायला लागते या जीवनात-जीवनातील धन-दौलत, मान-प्रतिष्ठेत काहीच अर्थ नाही. सारे काही इथे येऊन संपणारे. राजवाड्यात राहणारा असो की झोपडीत, शेवटी येथे सारे सारखेच. कळत-नकळत वाटायला लागते आता तरी बदमाशी सोडावी, वृथा लोभ सोडावा, काही तरी सत्कर्म करावे. परलोक मानणाऱ्या व न मानणाऱ्या दोहोंनाही असेच वाटते. यालाच तर म्हणतात ‘स्मशान वैराग्य’! स्मशानात येणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणवून देणे हाच असतो ‘स्मशानाचा धर्म’!स्मशान जशी जाणीव करून देते इहलोकाच्या नश्वरतेची तशीच नकळत आस जागवते परलोकाची-मृत्यूनंतरच्या अज्ञात प्रदेशाची अन् या आशेतच जन्म होतो धर्माचा. धर्म जरी समग्र जीवनावर अधिकार सांगत असला तरी त्याचा मूलभूत आधार असतो परलोकावर, भिस्त असते पाप-पुण्याच्या हिशोबावर. चिंता असते परलोक सुधारण्याची अन् ती जाणीव तीव्रपणे मिळते स्मशानातच. त्यामुळेच असेल की काय एकाच प्रसूतिगृहात जन्मणारी, एकाच शाळेत शिकणारी, एकाच ठिकाणी काम करणारी, वस्त्या-वस्त्यांच्या भिंती बांधून का होईना पण एकाच गावात राहणारी माणसे मृत्यूनंतर मात्र वेगवेगळ्या स्मशानात जातात. धर्म न मानणाऱ्यालासुद्धा त्याच्याच धर्माच्या स्मशानात वा कब्रस्तानात आणून जाळले वा गाडले जाते व त्याच्या मृतदेहावर धर्माचा शिक्का मारला जातो, भिंती पक्क्या होतात.मला ठाऊक नाही की भिंती बांधल्यामुळे मने दुरावतात की मनातच भिंती असतात म्हणून दुरावा निर्माण होतो? काही विचारवंतांना वाटते भिंती मनातच असतात, पण मनाचा अभ्यास करणाऱ्या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांना वाटते भिंती पाडल्या तर मने जवळ येतात. मग आपण असा प्रयोग आपण करून पाहायला काय हरकत आहे? दहन-दफनाची दोन्ही स्मशाने एकच करता आली तर...? भिंती पडायला आरंभ तरी होईल. समजा एक जरी करता नाही आली तरी दहन व दफनविधीला उपस्थित तर राहता येते. उपस्थित राहिलो तर निदान एवढे सत्य तरी कळेल की, कोणत्याही जाती-धर्माचा माणूस असो, त्याला जाळले जावो वा पुरले जावो तो शेवटी मातीलाच मिळतो. ते जर आपण वारंवार पाहत राहिलो तर कदाचित तुटलेली मने सांधता येतील, किमानपक्षी दुरावा तरी घटेल. निदान त्या दिशेने एखादे पाऊल तरी पडेल.कधी कधी असेही वाटते मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय करावे हा अधिकार सुजाण व्यक्तीने स्वत:च वापरून, आपल्या देहाचे दहन वा दफन काय करावे ते ठरवून ठेवावे. दहन व दफनभूमी अशी दोनच स्मशाने ठेवावीत व धर्मा-धर्माचा विचार न करता त्या व्यक्तीच्या मताचा आदर करीत त्याला त्या त्या भूमीत दहन वा दफन करावे. हे करता येणे अशक्य कोटीतील वाटेल, पण निव्वळ विचार करायला तरी काय हरकत आहे?

(लेखक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)