शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

न्यायालय सक्रिय

By admin | Updated: February 17, 2016 02:47 IST

न्यायालयांच्या सक्रियतेवर इतके दिवस देशातील केवळ केन्द्र आणि राज्य सरकारेच तेवढी दूषण लावीत आली, पण आता ते काम बहुधा देशातील सरकारी बँकांदेखील करतील असे दिसते

न्यायालयांच्या सक्रियतेवर इतके दिवस देशातील केवळ केन्द्र आणि राज्य सरकारेच तेवढी दूषण लावीत आली, पण आता ते काम बहुधा देशातील सरकारी बँकांदेखील करतील असे दिसते. गेल्या सप्ताहात माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्तांची आपणहून दखल घेत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला चक्क एक आदेश जारी केला आणि या आदेशानुसार आता समस्त सरकारी बँकांनी ज्या कर्जदारांची पाचशे कोटींहून अधिकची कर्जे माफ केली आहेत, त्यांची यादीच सादर करायला फर्मावले आहे. रिझर्व्ह बँकेला ही सारी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावयाची आहे. माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार देशभरातल्या २९ बँकांनी एकूण १.१४लक्ष कोटी रुपयांची कर्जे माफ केल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते. उच्चांक अर्थात स्टेट बँकेचा. या बँकेने मार्च २०१५अखेर २१ हजार कोटींची व आधीच्या वर्षात तब्बल ४१हजार कोटींची कर्जे एका फटक्यात माफ करुन टाकली होती. अर्थात ज्यांनी कर्जे थकवली आणि अंतत: त्यांची माफीदेखील पदरात पाडून घेतली ते कोणी मध्यमवर्गीय पगारदार वा छोटे अथवा मध्यम उद्योग-व्यावसायिक नव्हेत. हे सत्कार्य बड्या ‘कॉर्पोरेट्सनीच’ केले आहे. अर्थात यात त्यांचा जितका दोष आहे तितकाच तो राजकीय नेतृत्वाचाही आहे आणि यामध्ये कोणताही आपपरभाव नाही. राजकीय क्षेत्रातील लोक बँकांवर दबाव टाकून अनिर्बन्ध कर्जवाटप करण्यास बँकांना भाग पाडीत असतात. तरीही दिलेले कर्ज वसूल करणे हा प्राय: बँकांचीच जबाबदारी असते. सरकारी बँकांच्या या बेजबाबदार वृत्तीवर अगदी अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही कठोर टीका केली होती. सामान्य वा मध्यम श्रेणीतील ऋणकोंकडील कर्जाची वसुली करण्यासाठी अलीकडच्या काळात काही बँकांनी चक्क दंडशक्तीचाही वापर सुरु केलेला असताना बड्या कर्जदारांकडे मात्र बँका अनैसर्गिक दयाभावनेने बघत असतात. अशा प्रवृत्तींच्या विरोधात भले राजन यांनी आता टीका केली असली तरी सर्वोच्च न्यायालयास तोंड देण्याचे काम मात्र रिझर्व्ह बँकेलाच करावे लागणार आहे. या वरिष्ठ बँकेला जबाबदार धरण्याची न्यायालयाची भूमिका योग्यच आहे. कारण सरकारी बँकाच्या व्यवहारांवर तिचेच नियंत्रण असते आणि कर्जाचे वाटप, त्यासाठी उपलब्ध होणारा निधी व त्यावरील व्याजदर निश्चिती या बाबी तिच्याच अखत्यारित येतात. जेव्हां संसद अथवा सरकार त्यांच्याकडून राज्यघटनेस अपेक्षित कर्तव्यांचे पालन करीत नाहीत तेव्हांच न्यायालये हस्तक्षेप करतात हा मुद्दा आता येथेही अधोरखित होतो आहे.