शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

न्यायालयालाच दया

By admin | Updated: January 13, 2016 03:28 IST

ज्या मंत्रिमंडळात मेनका गांधी एक मंत्री असतात त्याच मंत्रिमंडळाचा एक निर्णय पशुंवरील होणाऱ्या संभाव्य अत्याचाराच्या मागणीपुढे मान तुकवितो हे एक आश्चर्यच असताना

ज्या मंत्रिमंडळात मेनका गांधी एक मंत्री असतात त्याच मंत्रिमंडळाचा एक निर्णय पशुंवरील होणाऱ्या संभाव्य अत्याचाराच्या मागणीपुढे मान तुकवितो हे एक आश्चर्यच असताना आता त्या मुक्या प्राण्यांची दया अखेर सर्वोच्च न्यायालयालाच आली आहे. पशुंवरील अत्याचार वा त्यांनी दिली जाणारी क्रूर वागणूक याबाबत देशात अलीकडच्या काळात बरीच जागरुकता आली आहे. त्यामागे ‘पिटा’सारख्या काही स्वयंसेवी संस्थांबरोबरच मेनका गांधींसारख्या काही व्यक्तींचाही मोठा सहभाग आहे. या मंडळींचे प्राणीप्रेम बऱ्याचदा व विशेषत: मोकाट आणि भटक्या कुत्र्यांबाबत जनसामान्यांना तापदायकही ठरत असते. पण लोक ते सहन करतात. अशा स्थितीत केन्द्र सरकारने मागील सप्ताहात बैलगाड्यांच्या शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला व तोच आता न्यायालयाने स्थगित ठेवला आहे. दक्षिणेतील जलीकट्टू येथील शर्यती हे त्यामागील तात्कालिक कारण. पण खरे कारण राजकीय. तेथील मतदारांचे बैलगाड्यांच्या शर्यतीवरील प्रेम पाहून्Þा सरकारने हा निर्णय घेतला कारण सरकारला बैलांच्या होऊ शकणाऱ्या छळापेक्षा तेथील मते महत्वाची वाटली. अर्थात प्रश्न केवळ बैलगाड्या किंवा बैलांच्या शर्यतीपुरता मर्यादित नाही. अगदी कबुतरे आणि कोंबड्यांपासून मोठ्या जनावरांपर्यंत शर्यतीच्या नावाखाली त्यांच्यात झुंज लावण्याची व त्यातून विकृत आनंद मिळवायची परंपरा तशी जुनीच म्हणावी लागेल. यात जुगाराचा खेळदेखील मग ओघानेच येतो. याशिवाय आपलेच जनावर शर्यतीत अव्वल ठरावे म्हणून संबंधित लोक वाट्टेल ते उपायदेखील योजीत असतात. पण तरीही या विकृतीला राजमान्यता मिळाली. वास्तविक पाहाता सर्कस ही आजच्या काळात मृतप्राय झालेली एक कला आणि अनेकांच्या रोजगाराचे मोठे साधन आहे. तिच्यातील शिकारखाना हा अबालवृद्धांचा परम आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. सर्कस मालक त्या जनावरांची देखभालही उत्तम करीत असत कारण त्यांचे पोट या प्राण्यांवर अवलंबून असे. सरकारी देखरेखीखालील प्राणी संग्रहालयातील मरतुकड्या वन्य जीवांपेक्षा सर्कसमधील असे जीव तजेलदारच असत. पण त्यांच्यावरील बंदी कायम असताना विकृतीला मान्यता देणे सर्वथा गैरच होते.