शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

जगण्याचे धैर्य हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:16 IST

परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी!

परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी! तारुण्यात नुकताच कोठे प्रवेश केलेल्या युवकांच्या अशा आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढू लागले आहे. परदेशात होणाऱ्या विविध प्रकारच्या सर्वेक्षणातून भारताचा, त्यातही पुण्या-मुंबईचा सर्वाधिक आनंदी शहरे असा निष्कर्ष निघत असताना त्या पार्श्वभूमीवर अशा आत्महत्या मन विदीर्ण करतात. मरणाला कवटाळण्याचे धैर्य दाखवणारी ही तरुण मुले जगण्यासाठी ते धैर्य का दाखवत नाहीत हा मोठा गहन प्रश्न आहे. जगणे त्यांच्यासाठी असे छळणारे का होत असावे? असा कोणता मोठा पहाड त्यांच्यावर कोसळला असतो की त्यांना जगावेसेच वाटत नाही? गेल्या काही वर्षांत जीवनमान उंचावले आहे. पालक आपल्या पाल्यांना फुलासारखे सांभाळतात. लहानपणापासून त्यांना जे हवे ते लगेचच आणून दिले जाते. पैशांचा अशा पालकांच्या बाबतीत काही प्रश्नच नसतो. प्रश्न असतो तो वेळेचा. कामाच्या व्यापात मुलांना आपण वेळ देत नाही, त्याची भरपाई ते त्यांच्यासाठी असा हवा तेवढा, त्यांच्या मागणीनुसार खर्च करून करायचा प्रयत्न करतात. वय नसताना गाडी घेऊन देणे, हौस म्हणून चारचाकीही चालवायला देणे, पार्टी कल्चरमध्ये त्याला सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात. मुले त्यामुळे हट्टी होतात. नाही असे ऐकायची त्यांना सवयच होत नाही. मग एखादी मुलगी नाही म्हणाली, एखाद्या परीक्षेत अपयश आले, एखाद्या मित्राची बरोबरी नाही करू शकले की लगेचच त्यांच्या इगोला धक्का लागतो. एक तर डिप्रेशनमध्ये जातात किंवा मग आत्महत्येसारखा आततायी मार्ग अवलंबतात. उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत अशा कुटुंबांमध्ये या समस्यांनी कधीचे घर केले आहे. हे सगळे बदलत्या सामाजिक स्थितीचे बळी आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी बदलले पाहिजे. आजकालच्या जमान्यात कोणीही मुलांवर छडी मारून संस्कार करा असे म्हणणार नाही, पण शालेय वयातील आपल्या मुलांना पालकांनी फक्त क्वॉलिटी टाइम दिला तर ती मानसिकदृष्ट्या खंबीर, कणखर बनतील व कोणत्याही परिस्थितीचा सामना करत जगण्याचे धैर्य त्यांच्यात येईल.