शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जगण्याचे धैर्य हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:16 IST

परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी!

परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी! तारुण्यात नुकताच कोठे प्रवेश केलेल्या युवकांच्या अशा आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढू लागले आहे. परदेशात होणाऱ्या विविध प्रकारच्या सर्वेक्षणातून भारताचा, त्यातही पुण्या-मुंबईचा सर्वाधिक आनंदी शहरे असा निष्कर्ष निघत असताना त्या पार्श्वभूमीवर अशा आत्महत्या मन विदीर्ण करतात. मरणाला कवटाळण्याचे धैर्य दाखवणारी ही तरुण मुले जगण्यासाठी ते धैर्य का दाखवत नाहीत हा मोठा गहन प्रश्न आहे. जगणे त्यांच्यासाठी असे छळणारे का होत असावे? असा कोणता मोठा पहाड त्यांच्यावर कोसळला असतो की त्यांना जगावेसेच वाटत नाही? गेल्या काही वर्षांत जीवनमान उंचावले आहे. पालक आपल्या पाल्यांना फुलासारखे सांभाळतात. लहानपणापासून त्यांना जे हवे ते लगेचच आणून दिले जाते. पैशांचा अशा पालकांच्या बाबतीत काही प्रश्नच नसतो. प्रश्न असतो तो वेळेचा. कामाच्या व्यापात मुलांना आपण वेळ देत नाही, त्याची भरपाई ते त्यांच्यासाठी असा हवा तेवढा, त्यांच्या मागणीनुसार खर्च करून करायचा प्रयत्न करतात. वय नसताना गाडी घेऊन देणे, हौस म्हणून चारचाकीही चालवायला देणे, पार्टी कल्चरमध्ये त्याला सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात. मुले त्यामुळे हट्टी होतात. नाही असे ऐकायची त्यांना सवयच होत नाही. मग एखादी मुलगी नाही म्हणाली, एखाद्या परीक्षेत अपयश आले, एखाद्या मित्राची बरोबरी नाही करू शकले की लगेचच त्यांच्या इगोला धक्का लागतो. एक तर डिप्रेशनमध्ये जातात किंवा मग आत्महत्येसारखा आततायी मार्ग अवलंबतात. उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत अशा कुटुंबांमध्ये या समस्यांनी कधीचे घर केले आहे. हे सगळे बदलत्या सामाजिक स्थितीचे बळी आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी बदलले पाहिजे. आजकालच्या जमान्यात कोणीही मुलांवर छडी मारून संस्कार करा असे म्हणणार नाही, पण शालेय वयातील आपल्या मुलांना पालकांनी फक्त क्वॉलिटी टाइम दिला तर ती मानसिकदृष्ट्या खंबीर, कणखर बनतील व कोणत्याही परिस्थितीचा सामना करत जगण्याचे धैर्य त्यांच्यात येईल.