शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

नगरसेवकांनो, काय हे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:32 IST

या देशाच्या समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, या देशाच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे इतकेच नव्हे तर या देशाच्या धर्मकारणाचाही संबंध राजकारणाशी आहे. इतके राजकारण या देशावर हावी झाले आहे.

या देशाच्या समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, या देशाच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे इतकेच नव्हे तर या देशाच्या धर्मकारणाचाही संबंध राजकारणाशी आहे. इतके राजकारण या देशावर हावी झाले आहे. राजकारणात ‘लंबी रेस का घोडा’ ठरायचे असेल तर व्होट बँकेचे गणित सांभाळता आले पाहिजे, ही पहिली अट आहे. परिणामी हे गणित सांभाळताना नियम, कायदा, सामाजिक संकेत आडवे येत असतील तर या नियम, कायदा, संकेतांना ‘आडवे’ करून पुढे गेले पाहिजे, असा ग्रह जवळपास सर्वच राजकारण्यांचा झाला आहे. हा ‘ग्रह’ नव्याने आठवण्याचे कारण महापालिकेने गठित केलेल्या उपद्रव शोधपथकातील पाच माजी सैनिकांनी दिलेले राजीनामे हे आहे. लष्करात आयुष्य घालविणा-या या शिस्तप्रिय सैनिकांनी या पथकातून फारकत का घेतली या प्रश्नाच्या मुळाशी गेले तर तळपायाची आग मस्तकात जाईल, इतका हा सर्व संतापजनक प्रकार आहे. या देशाचे प्रधानसेवक कमालीचे स्वच्छताप्रिय आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरकर नेतेही स्वच्छतेच्या बळावर शहराला स्मार्ट सिटीजच्या अग्रक्रमी नेण्यासाठी अहोरात्र धडपडताहेत. परंतु या सेनापतीद्वयांनी ज्या सेनेच्या बळावर अस्वच्छतेविरुद्धचा हा लढा उभारला आहे ती सेना मात्र आपल्या व्होटबँकेसाठी फितुरीचे राजकारण करीत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोधपथक गठित केले. यात स्वच्छतादूत म्हणून माजी सैनिकांची निवड करण्यात आली. परंतु सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºयांवर कारवाई होऊ नये यासाठी चक्क प्रभागातील नगरसेवक व पदाधिकारीच दबाव आणत आहेत. हा अनैतिक दबाव असह्य झाल्याने या पथकातील पाच जवानांनी आपले राजीनामे मनपाच्या तोंडावर फेकून मारले आहेत. पथकातील सदस्यांनी नागरिकांकडून गैरमार्गाने वसुली करू नये यासाठी माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली. माजी सैनिकच का, तर ते करड्या शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष असतात. या सैनिकांनीही या कार्याला राष्ट्रीय कर्तव्य समजून आपले काम सुरू केले. या पथकामुळे सकारात्मक चित्र दिसू लागले. परंतु काहीच दिवसात व्होट बँकेच्या राजकारणासाठी या माजी सैनिकांवर दबाव आणणे सुरू झाले. आग ओकणाºया तोफगोळ्यांच्या माºयातही एक पाऊल मागे न डगमगणाºया या स्वाभिमानी सैनिकांच्या हृदयाला हा दबाव तोफगोळ्यापेक्षाही जास्त बोचला आणि त्यांनी एका फटक्यात हे काम सोडले. या निर्णयाने सैनिकांनी काहीच गमावले नाही. स्वच्छ शहराच्या मोहिमेला मात्र ग्रहण लागले. शहराच्या आरोग्याशी खेळणाºया राजकारण्यांना याचा जाब कुणीतरी कधी विचारेल का?