शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नगरसेवकांनो, काय हे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:32 IST

या देशाच्या समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, या देशाच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे इतकेच नव्हे तर या देशाच्या धर्मकारणाचाही संबंध राजकारणाशी आहे. इतके राजकारण या देशावर हावी झाले आहे.

या देशाच्या समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, या देशाच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे इतकेच नव्हे तर या देशाच्या धर्मकारणाचाही संबंध राजकारणाशी आहे. इतके राजकारण या देशावर हावी झाले आहे. राजकारणात ‘लंबी रेस का घोडा’ ठरायचे असेल तर व्होट बँकेचे गणित सांभाळता आले पाहिजे, ही पहिली अट आहे. परिणामी हे गणित सांभाळताना नियम, कायदा, सामाजिक संकेत आडवे येत असतील तर या नियम, कायदा, संकेतांना ‘आडवे’ करून पुढे गेले पाहिजे, असा ग्रह जवळपास सर्वच राजकारण्यांचा झाला आहे. हा ‘ग्रह’ नव्याने आठवण्याचे कारण महापालिकेने गठित केलेल्या उपद्रव शोधपथकातील पाच माजी सैनिकांनी दिलेले राजीनामे हे आहे. लष्करात आयुष्य घालविणा-या या शिस्तप्रिय सैनिकांनी या पथकातून फारकत का घेतली या प्रश्नाच्या मुळाशी गेले तर तळपायाची आग मस्तकात जाईल, इतका हा सर्व संतापजनक प्रकार आहे. या देशाचे प्रधानसेवक कमालीचे स्वच्छताप्रिय आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरकर नेतेही स्वच्छतेच्या बळावर शहराला स्मार्ट सिटीजच्या अग्रक्रमी नेण्यासाठी अहोरात्र धडपडताहेत. परंतु या सेनापतीद्वयांनी ज्या सेनेच्या बळावर अस्वच्छतेविरुद्धचा हा लढा उभारला आहे ती सेना मात्र आपल्या व्होटबँकेसाठी फितुरीचे राजकारण करीत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोधपथक गठित केले. यात स्वच्छतादूत म्हणून माजी सैनिकांची निवड करण्यात आली. परंतु सार्वजनिक ठिकाणी घाण करणाºयांवर कारवाई होऊ नये यासाठी चक्क प्रभागातील नगरसेवक व पदाधिकारीच दबाव आणत आहेत. हा अनैतिक दबाव असह्य झाल्याने या पथकातील पाच जवानांनी आपले राजीनामे मनपाच्या तोंडावर फेकून मारले आहेत. पथकातील सदस्यांनी नागरिकांकडून गैरमार्गाने वसुली करू नये यासाठी माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली. माजी सैनिकच का, तर ते करड्या शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष असतात. या सैनिकांनीही या कार्याला राष्ट्रीय कर्तव्य समजून आपले काम सुरू केले. या पथकामुळे सकारात्मक चित्र दिसू लागले. परंतु काहीच दिवसात व्होट बँकेच्या राजकारणासाठी या माजी सैनिकांवर दबाव आणणे सुरू झाले. आग ओकणाºया तोफगोळ्यांच्या माºयातही एक पाऊल मागे न डगमगणाºया या स्वाभिमानी सैनिकांच्या हृदयाला हा दबाव तोफगोळ्यापेक्षाही जास्त बोचला आणि त्यांनी एका फटक्यात हे काम सोडले. या निर्णयाने सैनिकांनी काहीच गमावले नाही. स्वच्छ शहराच्या मोहिमेला मात्र ग्रहण लागले. शहराच्या आरोग्याशी खेळणाºया राजकारण्यांना याचा जाब कुणीतरी कधी विचारेल का?