शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘स्टॅच्यू’ पोरखेळ नव्हे, जिद्दीने सामना व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 03:11 IST

Coronavirus : गेल्या दोन महिन्यात सोशल मीडियातून भीतिदायक व्हिडिओ आणि चुकीची माहिती येत राहिल्याने डोक्याची कचराकुंडी झाली आहे.

- विकास झाडे(संपादक, लोकमत, दिल्ली)सध्या जगापुढे एकमेव विषय आहे, कोरोना विषाणूचा! केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्ती भीतिग्रस्त आहे. रुग्णांचे दररोजचे आकडे हिमालयाकडे कूच करणारे दिसतात. देशाची लोकसंख्या १३० कोटी असल्याने अत्यंत विपरीत परिणाम होतील, या कल्पनेनेच सगळ्यांचा थरकाप उडाला आहे. साधा खोकला आणि शिंक आली तरी, पहिली शंका असते आपणही कोरोनाच्या रांगेत लागलो तर नाही ना याची. गेल्या दोन महिन्यात सोशल मीडियातून भीतिदायक व्हिडिओ आणि चुकीची माहिती येत राहिल्याने डोक्याची कचराकुंडी झाली आहे. यातून बाहेर निघायला बराच वेळ लागेल. परंतु भारताची अशी भयावह अवस्था का झाली असावी, यावरही मंथन होणे गरजेचे आहे. भारत सरकारने वेळीच पावले का उचलली नाहीत? हा प्रश्न वारंवार उपस्थित होईल.चीनच्या वुहान इथे डिसेंबरमध्येच कोरोनाची लागण झाली. ७ जानेवारीला पहिला बळी गेला. हा विषाणू अत्यंत जलद गतीने पसरतो आहे याबाबत भारताला जाणीव नव्हती असे नाही. वुहान ते भारताचे अंतर केवळ साडेतीन हजार किलोमीटर आहे. हा विषाणू हवेतून पसरत नसला तरी भारत आणि चीनचे व्यापारी संबंध लक्षात घेता भारत सरकारच्या देखरेख समितीची बैठक ८ जानेवारीला पार पडली. या बैठकीचे सार्थक काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात आहे. कोरोनावर मोदी सरकार गाफील होते का? असा प्रश्न उपस्थित करणे धाडसाचे ठरते. तब्बल अडीच महिने कोरोनावर सरकारदरबारी केवळ कृतिशून्य चर्चा झाली. चीननंतर अनेक देशात कोरोना झपाट्याने पसरत होता तेव्हा सरकार वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये व्यस्त होती. लाखो लोक विदेशातून भारतात येत गेलेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा भारत दौरा या बाबी सरकारच्या डोक्यावर होत्या. अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु असतानाच कोरोनाने भारताची मानगूट पकडली. पंतप्रधान मोदींना मात्र इकडे राजकीय लालसा खुणावत होती. मध्य प्रदेशातील सरकार पाडणे आणि आपले सरकार बनवणे त्यांना महत्त्वाचे वाटले. महाराजे म्हणवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:च्या पुनर्वसनाला महत्त्व दिले. केंद्र सरकार शांत बसले म्हणून महाराष्टÑ, दिल्ली, केरळ आदी राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी स्वत:च पुढाकार घेत नियोजन केले. राहुल गांधी कोरोनाची देशात त्सुनामी येईल असे दीड महिन्यापासून ओरडत आहेत, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.कोरोनावर सर्व राज्ये कामाला लागल्यानंतर मोदींनी रात्री आठ वाजताची घंटा वाजवली. मोदी देशाला संबोधित करतील असे म्हटले तरी जनतेच्या ह्दयाचा ठोका चुकतो. नोटबंदीच्या घोषणेची इथे पुनरावृत्ती झाली. त्यांनी २१ दिवस देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जिथे आहेत तिथेच थांबा, असे आवाहन केले. रात्री १२ वाजतापासूनच अंमलबजावणी होत असल्याचा तो बिगूल होता. लोकांच्या हातात उरले होते केवळ चार तास!. त्यांच्या आवाहनात स्पष्टता नसल्याने विलगीकरणाच्या या प्रयोगाचे चित्र उलट दिसले. सगळ्या दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्यात. ज्यांना घराचे दार ओलांडायचे नव्हते त्यांनी दुकानांमध्ये तुफान गर्दी केली. मुलांच्या खेळण्यात ‘स्टॅच्यू’ हा एक खेळ आहे. ‘स्टॅच्यू’ हा शब्द उच्चारताच सहभागी मित्रास आहे त्याच स्थितीत राहावे लागते. बघायला छान वाटते. तो दिसायला पुतळा वाटतो तरी त्यातून विविध कला शिल्पांचे दर्शनही होत असते. पोरांना मजा येते. परंतु हा खेळ चालतो केवळ अर्धा- एक मिनिटेच. मात्र, २१ दिवसांसाठी देशाला ‘स्टॅच्यू’ करणे हा पोरखेळ नव्हता. हा विषय अत्यंत गंभीर आहे. ही घोषणा करण्यापूर्वी हातातून गेलेल्या अडीच महिन्यांत नियोजन करण्याची गरज नव्हती का? मोदींनी १९ मार्चला पहिल्यांदा जनता कर्फ्यूचे आवाहन केले तेव्हा ‘मला काही आठवडे हवेत’ हे कोड्यात न बोलता त्याच दिवशी स्पष्ट केले असते की, प्रत्येकाने आपापल्या गावी जावे किंवा सुरक्षित ठिकाणी असावे तर आता निर्माण झालेल्या स्थितीपासून नक्कीच वाचता आले असते.जे कामाच्या किंवा रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीत आहेत असे लाखो लोक आजही अडकून आहेत. हजारो लोक शेकडो किलोमीटर पायी चालत गावाकडे निघाले आहेत. यूपीएससीच्या तयारीसाठी देशभरातून लाखो तरूण दिल्लीत आलेले असतात. एकीकडे क्लास बंद दुसरीकडे घरच्या लोकांना त्यांची चिंता. विद्यार्थ्यांनी खोलीत अक्षरश: स्वत:ला डांबून घेतले आहे. देशभरात अनेकांच्या नोकºया गेल्यात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल्याने कालच मयूर विहार परिसरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली. ट्रम्प भारतात आले. तेव्हा ईशान्य दिल्लीत दंगल सुरू होती. शेकडो घरे बेचिराख झालीत. १०० कुटुंबे मुस्तफाबादमध्ये शिबिरात दाखल झाली. लॉकडाऊनमुळे त्यांना इतक्या संख्येत एकत्र राहता येत नाही आणि दुसरा पर्यायही नाही. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉकडाऊन बाधितांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे सरकारचे पाऊल शुभवर्तमानाची नांदी ठरू शकते. परंतु आज लोक उपाशी आहेत त्याचे काय?कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना व्यक्तिगत संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) मिळत नाहीत. व्हेंटिलेटर्स, औषधी, रूग्णालये, खाटांचा सर्वत्र तुटवडा आहे. एम्समधील डॉक्टरांच्या वेदनांनी माणूस व्याकूळ होतो. दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. आता सगळ्यांनीच जिद्दीने सामना करणे हा एकमेव पर्याय आहे.