शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

CoronaVirus News : बंद दरवाजाआड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 06:09 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो, हे नव्या पिढीला समजले गेले.

माणूस भटकण्याच्या अवस्थेतून बाहेर पडला, त्याला हजारो वर्षे झाली. वस्ती करून राहू लागला. निवासाची सोय करून एकत्र राहू लागला. अधिक विकासासाठी आणि आनंदी जीवनासाठी तो बाहेर पडत असला तरी सायंकाळ होताच बंद दरवाजाच्या आड येऊन विश्रांती घ्यायची, हा त्याचा नित्यक्रम होता. मात्र, त्याची अधिक सुखी, समाधानी जीवनासाठीची गती इतकी वाढली की, तो चोवीस तास पुन्हा-पुन्हा भटकंती करू लागला. आठ-आठ तासांच्या पाळीत चोवीस तास काम करू लागला. वाहतुकीची अनेक साधने चोवीस तास चालू ठेवू लागला. आनंदात अखंड विहार करण्यासाठी त्याने ‘नाईट लाईफ’ची कल्पनाही मांडली आणि त्याचा उपभोग तो घेऊ लागला. उत्पादन, निर्मिती, व्यवहार आणि पैशांचा खेळ अहोरात्र करत राहिला. त्याची त्याला सवयच जडली. सर्वकाही अंगवळणी पडले. ऐशारामी समाजरचनेत समूहाने राहू लागला.

या सर्वांपासून उपेक्षित असणाराही मोठा वर्ग दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बंद दरवाजे उघडून दुनियादारी करू लागला. तोच माणूस आज त्या दरवाजाच्या दिशेने मिळेल त्या मार्गाने मागे धावतो आहे. गेली चौपन्न दिवस संपूर्ण देश बंद दरवाजाच्या आड आहे. तो आणखीन तेरा दिवस ३१ मेपर्यंत दरवाजा बंदच ठेवण्यात येणार आहे. आपल्या देशात जवळपास एक लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आली आहे, त्यापैकी ३६ हजारजण बरे झाले असले तरी तीन हजारजणांना प्राणाला मुकावे लागले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग तरी कमी होत नाही. विशेषत: मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा धोका वाढतो आहे. परिणामी, या महानगरीतील गावाकडील माणूस ‘आपला गावच बरा’ म्हणून परत जातो आहे. कोट्यवधी स्थलांतरित मजूरवर्ग आपापल्या गावी जाऊन दरवाजाआड लपण्याचा प्रयत्न करतो आहे.

२४ मार्चला अचानक एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, असा निर्बंध घालण्यात आला. आधुनिक जगात हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे होते. मात्र, उपायही नव्हता; तसेच तीनवेळा हा लॉकडाऊन वाढविण्यात आला. आता चौथ्यांदा वाढवून येत्या ३१ मेपर्यंत संपूर्ण देशातील दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रभाव किंवा लागण कमी आहे, तेथे थोडी सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू मिळाव्यात म्हणून वाहतुकीत सूट दिली आहे. हे सर्व माणसाला तात्पुरते जगण्याला लागणाऱ्या वस्तूंसाठी आहे. तेवढ्यावर आता माणसाला जगता येत नाही. आर्थिक प्रश्नांची आणि व्यवस्थेची गुंतागुंत एवढी करून ठेवली आहे की, संपूर्ण समाजाचे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावेच लागणार आहेत.

लॉकडाऊन करून, दरवाजे बंद करून आत बसलो तरी समाजात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही. तो कोठे ना कोठे समाजात राहणार आहे. भारतात लॉकडाऊनचा परिणाम खूप सकारात्मक झाला. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. त्यापैकी मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, असे मानले जाते. ते सिद्ध मात्र झालेले नाही. आपण संसर्गित किती लोक आहोत, याचा नेमका अंदाज येत नाही, हेदेखील मान्य करावे लागेल. बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो हे नव्या पिढीला समजले गेले.

प्लेग किंवा इतर महामारीने माणसाच्या समोर मृत्यू उभे राहण्याचे दिवस संपले होते. आपणास अलीकडे याची गंधवार्ताही नव्हती. ती आता कोरोनामुळे कानावर आली आहे. समाज समूहाने राहताना सार्वजनिक आरोग्यासाठी अद्याप किती काम करावे लागणार आहे. अन्न प्रत्येकास मिळावे; पण ते सुरक्षितही असावे आदी धडेपण शिकविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा उगम कसा आणि कुठून झाला, याचा अद्याप शोध लागला नसला तरी अनेक गोष्टी शिकवून गेला आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये राहून सर्व मानवजातीच्या सुरक्षेचा विचार करण्याची ही एक संधी चालून आली आहे. अद्याप विषाणूचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालेलो नाही आहोत. त्यामुळे चौथा टप्पाही यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी थोडे कष्ट पडले, तरी ते स्वीकारावे लागतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या