शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

CoronaVirus News : बंद दरवाजाआड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 06:09 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो, हे नव्या पिढीला समजले गेले.

माणूस भटकण्याच्या अवस्थेतून बाहेर पडला, त्याला हजारो वर्षे झाली. वस्ती करून राहू लागला. निवासाची सोय करून एकत्र राहू लागला. अधिक विकासासाठी आणि आनंदी जीवनासाठी तो बाहेर पडत असला तरी सायंकाळ होताच बंद दरवाजाच्या आड येऊन विश्रांती घ्यायची, हा त्याचा नित्यक्रम होता. मात्र, त्याची अधिक सुखी, समाधानी जीवनासाठीची गती इतकी वाढली की, तो चोवीस तास पुन्हा-पुन्हा भटकंती करू लागला. आठ-आठ तासांच्या पाळीत चोवीस तास काम करू लागला. वाहतुकीची अनेक साधने चोवीस तास चालू ठेवू लागला. आनंदात अखंड विहार करण्यासाठी त्याने ‘नाईट लाईफ’ची कल्पनाही मांडली आणि त्याचा उपभोग तो घेऊ लागला. उत्पादन, निर्मिती, व्यवहार आणि पैशांचा खेळ अहोरात्र करत राहिला. त्याची त्याला सवयच जडली. सर्वकाही अंगवळणी पडले. ऐशारामी समाजरचनेत समूहाने राहू लागला.

या सर्वांपासून उपेक्षित असणाराही मोठा वर्ग दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बंद दरवाजे उघडून दुनियादारी करू लागला. तोच माणूस आज त्या दरवाजाच्या दिशेने मिळेल त्या मार्गाने मागे धावतो आहे. गेली चौपन्न दिवस संपूर्ण देश बंद दरवाजाच्या आड आहे. तो आणखीन तेरा दिवस ३१ मेपर्यंत दरवाजा बंदच ठेवण्यात येणार आहे. आपल्या देशात जवळपास एक लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आली आहे, त्यापैकी ३६ हजारजण बरे झाले असले तरी तीन हजारजणांना प्राणाला मुकावे लागले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग तरी कमी होत नाही. विशेषत: मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा धोका वाढतो आहे. परिणामी, या महानगरीतील गावाकडील माणूस ‘आपला गावच बरा’ म्हणून परत जातो आहे. कोट्यवधी स्थलांतरित मजूरवर्ग आपापल्या गावी जाऊन दरवाजाआड लपण्याचा प्रयत्न करतो आहे.

२४ मार्चला अचानक एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, असा निर्बंध घालण्यात आला. आधुनिक जगात हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे होते. मात्र, उपायही नव्हता; तसेच तीनवेळा हा लॉकडाऊन वाढविण्यात आला. आता चौथ्यांदा वाढवून येत्या ३१ मेपर्यंत संपूर्ण देशातील दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रभाव किंवा लागण कमी आहे, तेथे थोडी सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू मिळाव्यात म्हणून वाहतुकीत सूट दिली आहे. हे सर्व माणसाला तात्पुरते जगण्याला लागणाऱ्या वस्तूंसाठी आहे. तेवढ्यावर आता माणसाला जगता येत नाही. आर्थिक प्रश्नांची आणि व्यवस्थेची गुंतागुंत एवढी करून ठेवली आहे की, संपूर्ण समाजाचे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावेच लागणार आहेत.

लॉकडाऊन करून, दरवाजे बंद करून आत बसलो तरी समाजात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही. तो कोठे ना कोठे समाजात राहणार आहे. भारतात लॉकडाऊनचा परिणाम खूप सकारात्मक झाला. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. त्यापैकी मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, असे मानले जाते. ते सिद्ध मात्र झालेले नाही. आपण संसर्गित किती लोक आहोत, याचा नेमका अंदाज येत नाही, हेदेखील मान्य करावे लागेल. बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो हे नव्या पिढीला समजले गेले.

प्लेग किंवा इतर महामारीने माणसाच्या समोर मृत्यू उभे राहण्याचे दिवस संपले होते. आपणास अलीकडे याची गंधवार्ताही नव्हती. ती आता कोरोनामुळे कानावर आली आहे. समाज समूहाने राहताना सार्वजनिक आरोग्यासाठी अद्याप किती काम करावे लागणार आहे. अन्न प्रत्येकास मिळावे; पण ते सुरक्षितही असावे आदी धडेपण शिकविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा उगम कसा आणि कुठून झाला, याचा अद्याप शोध लागला नसला तरी अनेक गोष्टी शिकवून गेला आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये राहून सर्व मानवजातीच्या सुरक्षेचा विचार करण्याची ही एक संधी चालून आली आहे. अद्याप विषाणूचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालेलो नाही आहोत. त्यामुळे चौथा टप्पाही यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी थोडे कष्ट पडले, तरी ते स्वीकारावे लागतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या