शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Coronavirus:...मग असा ठपका ठेवायची वेळ भावी पिढीने आणू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:35 IST

आजच्या स्थितीत आपल्या राजकारणाचे चित्र कसे असायला हवे व त्याच्या मर्यादा कशा ठरवायला हव्यात, हा मोठाच प्रश्न आहे.

डॉ. अश्वनी कुमारराष्ट्रीय लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ केल्यामुळे ‘कोरोना’ देशातून लवकर काढता पाय घेईल, या विषयीच्या आशा मावळल्या आहेत. तसेच राष्ट्रीय चिंताही वाढली असून आता पुढे काय, याविषयी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अनेक स्थलांतरित कामगार आपली बायको, मुले आणि चीजवस्तूंसह अन्नाविना, डोक्यावर छप्पर नसताना, आरोग्याच्या सुखसोयी नसताना आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करीत असलेले दिसत आहेत. सुरत आणि मुंबई येथे सरकारकडून पुरेशी काळजी घेत नसल्याबद्दल त्यांनी निषेधही व्यक्त केला.महामारीमुळे राजकारण संपुष्टात येईल वा लोकशाहीच्या तत्त्वांचा विनाश होईल असे नाही; पण अशा आव्हानांचा सामना करताना रचनात्मक संवाद सुरू करण्याची पंतप्रधानांची जबाबदारी आहे, हेही विसरून चालणार नाही. राष्ट्रीय संवाद सुरू केल्याने सत्तेविषयी संघर्ष सुरू होईल, असे समजण्याचे कारण नाही.

पण तबलिगी जमातच्या काही लोकांनी बेजबाबदार वर्तन केले म्हणून त्या समाजाला सरसकट दोषी ठरवणे योग्य होणार नाही. राज्य सरकारांनी उपेक्षितांसाठी काम करण्याची जबाबदारी घटनेने त्यांच्यावर टाकलेली आहे. अशावेळी विरोधकांचे वर्तनसुद्धा देशाला अस्थिर करणारे नसावे, अशीच कुणीही अपेक्षा करील. सध्याच्या कामात पंतप्रधानांना संशयाचा फायदा मिळू शकतो, हे खरे असले तरीही सर्वच पक्षांनी राजकीय मतभेदांचा त्याग करून या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज व्हावे. यावेळी आपण परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे असून, नव्या जगात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालो आहोत. अशावेळी आपण भपकेबाज अक्षमता दाखवली किंवा लोभी संधिसाधूपणा केला, असा ठपका ठेवायची वेळ भावी पिढीने आणू नये.

आजच्या स्थितीत आपल्या राजकारणाचे चित्र कसे असायला हवे व त्याच्या मर्यादा कशा ठरवायला हव्यात, हा मोठाच प्रश्न आहे. त्याचा आरंभ अग्रक्रम निश्चित करून करायला हवा आणि निर्णयात झालेल्या चुकांची कबुली देण्याचा प्रांजळपणा दाखवायला हवा. सार्वजनिक आरोग्यासाठी, वैद्यकीय संशोधनासाठी आणि आरोग्यसेवा देणारी व्यवस्था उभारण्यासाठी आपण कमी तरतूद केली, हे मान्यच करायला हवे. तसेच मानवाच्या स्थितीविषयीही संवेदनशीलता बाळगलेली नाही, हेही तितकेच खरे आहे. आपल्या पूर्वजांनी मानवी जीवन कसे परस्परात गुंतलेले आहे, याविषयी जाण ठेवण्याचे जे शहाणपण बाळगले होते त्याला आपण सोडचिठ्ठी दिली. आधुनिकता स्वीकारण्यातच आपण धन्यता मानली.

सध्याची अवस्था पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात झालेला ºहास, मिळून-मिसळून राहण्याच्या तत्त्वांचा केलेला त्याग आणि सामाजिक व वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यातील अभावामुळे निर्माण झालेली आहे. आपण कौटुंबिक संवाद व मित्रता यांची उपेक्षा केल्यामुळे सध्याचा पेचप्रसंग उभा झाला आहे. अध्यात्माच्या आधारावर मानवता बाळगणाऱ्या या समाजाकडून कर्तव्यावर असणाºया डॉक्टरांवर हल्ले का केले जातात आणि कामावर असलेल्या पोलिसाचा हात तलवारीने छाटून टाकण्याचे धाडस का केले जाते, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. समाजातील हा विसंवाद दूर करण्याचा आपल्या राजकारणाचा हेतू असायला हवा.

आपण हे वास्तव समजून घेतले पाहिजे आणि टीका करून दोषारोपण करण्याचे टाळायला हवे. कल्याणकारी समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचालीच्या दृष्टीने आपण राजकारणाचे शुद्धिकरण करून त्याची दिशा ठरवायला हवी. ‘राजकारण्यांच्या असमंजसपणाने विनाश ओढवतो’, असे इतिहासकार कुमारस्वामी यांनी जे विचार व्यक्त केले आहेत, ते लक्षात ठेवायला हवे. आपल्या व्यवस्थेतील उणिवा जाणून घ्यायला हव्यात. आपले अग्रक्रम चुकीचे आहेत आणि भुकेच्या विरोधातील उपाय चुकीच्या गृहितकांवर आधारित असल्याने ही स्थिती ओढवली आहे, हे समजून घ्यायला हवे. आपल्या नेतृत्वाने भविष्याविषयी लोकांच्या मनात आशा निर्माण करायला हव्या व त्याची पूर्तता करण्याची क्षमता दाखवायला हवी.

न्यायपूर्ण समाजनिर्मिती करणे हेच आपले उद्याच्या काळासाठीचे उद्दिष्ट हवे. लोकांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांना मदत करण्याची भूमिका असायला हवी. आर्थिक क्षमता व सामाजिक न्याय या दोहोंनी हातात हात घालून वाटचाल करायला हवी. सर्वांना समानतेने न्याय लागू व्हायला हवा. हा समाज वृद्धांचे संरक्षण करणारा असावा व व्हेंटिलेटरच्या अभावामुळे जीवन वा मृत्यू यातून निवड करण्याची वेळ व्यक्तीवर येऊ नये, मानवी जीवनाचा सन्मान राखला जावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जे स्वत:च्या प्राणांचे मोल द्यायला तयार असतात त्यांच्या त्यागाविषयी कृतज्ञ असायला हवे.

सध्याच्या आव्हानाला आपण कशाप्रकारे तोंड दिले, याविषयीचे मत पुढील पिढ्या व्यक्त करणार आहेत. तेव्हा पूर्वीच्या घटनांपासून योग्य बोध घेऊन आपण भविष्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी. त्यासाठी सध्याच्या आव्हानाचा एकजुटीने सामना करायला हवा. त्यातून लोकशाही संस्था मजबूत होईल. लोकांच्या प्रेमाच्या व कृतज्ञतांच्या आधारावरच लोकशाहीची सत्ता उभी असते, हे पंतप्रधानांनी समजून घ्यावे. सध्याच्या पंतप्रधानांनी लोकांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारांशी व राजकीय नेत्यांशी संवाद साधण्याचे काम केले, ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. इतिहास घडविण्याची जबाबदारी एखाद्या पुरुषावर वा स्त्रीवर येऊन पडत नाही. मानवतेच्या रक्षणाचा हा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे. त्यातून मिळणारे यश साºया जनतेचे सामूहिक यश असेल, हेही विसरून चालणार नाही.

(लेखक सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या