शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जाणीव आणि श्रीमंती

By admin | Updated: February 13, 2015 23:02 IST

अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय...

विजयराज बोधनकर - संकटकाळी अनेक माणसं एकमेकांना सहकार्य करतात. त्यामुळे अनेक संकटांचं निवारण होतं. त्या सहकार्याला जे विसरतात आणि पुन्हा स्वार्थीपणाने वागायला लागतात, तेव्हा त्यांचं हळूहळू पतन होतं. ती माणसं मग सामान्य ठरतात. त्यांनाच जाणीव नसलेली माणसं म्हणतात. पण जाणीव असलेली माणसं नेहमीच सर्वांना घेऊन चालतात. या जाणिवेच्या जाणतेपणामुळे जनमानसांत प्रसिद्धीस येतात. हा त्यांचा जाणतेपणा शुद्ध असतो, सात्त्विक असतो. ही श्रीमंत जाणीव माणसाला असा विचार करायला लावते की, आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी कष्ट घेतले, लहानाचं मोठं केलं ! नात्यागोत्यातल्या मित्रपरिवाराने अडचणीच्या वेळी मानसिक, आर्थिक सहकार्य केलं ! गरिबीच्या काळातही बायकोने काटकसरीने संसार चालविला! विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवावेत म्हणून गुरुजींनी मेहनत घेतली ! योग्यता नसतानाही एका मोठ्या माणसाच्या शिफारशीमुळे नोकरी लागलीे! कुठलंही व्याज न घेता मित्राने रक्कम दिली, म्हणून व्यवसाय बहरला ! या कंपनीत लागलो तेव्हा साधा क्लार्क होतो, पण साहेबांच्या स्फूर्ती आणि सहकार्यामुळे आज मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे ! अशा हजारो उदाहरणांची पंगत इथे मांडता येईल. जे हे सारं मान्य करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात तीच माणसं मोठी होतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्माविभूषण रघुनाथ माशेलकरांनी आपल्या गुरुचा उल्लेख एका भाषणात केला. ते म्हणाले, ‘आमच्या जोशी सरांनी साबण कसा बनवितात हे दाखवायसाठी सर्व विद्यार्थ्यांना कारखान्यात नेले. तिथेच मला संशोधनाची आवड निर्माण झाली. खिशातले पैसे तिकिटासाठी वापरून कारखान्यात घेऊन जाणाऱ्या जोशी सरांमुळेच मी आज शास्त्रज्ञ झालो’ ही कृतज्ञता त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीत व्यक्त केली. त्यामुळे सारे सभागृह भावनाविवश झाले. हे सांगण्याची श्रीमंत जाणीव माशेलकरांकडे होती. त्यामुळेच त्यांच्या प्रगतीची पाऊले झटपट पडली असावीत. अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय... हेही सांगायला ते विसरले नाहीत. म्हणूनच रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, जाणत्याचे पहावे ज्ञान।जाणत्याचे सिकावे ध्यान।जाणत्याचे सुक्ष्म चिन्ह।समजूनी घ्यावे॥जाणीव हीच खरी ईश्वराची पूजा आहे. पण दुर्दैवाने अशा ग्रंथांचा अभ्यास होण्यापेक्षा त्या ग्रंथांचे फक्त गंध, अक्षता, फुलांनी पूजन होते व पालखीतून मिरविले जाते. म्हणूनच अभ्यासनीय कृतीपेक्षा कर्मकांडामुळेच अजाणतेपणा शिल्लक राहतो व दु:खाचा वनवास घडतो.