शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष आणि तडजोड

By admin | Updated: May 19, 2017 02:40 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने सरकारच्या विरोधात १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून पडली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी हा संप स्थगित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सरकार आंदोलन मिटविण्याबाबत पुढाकार घेणारच; पण या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते हे विशेष ! फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. पुणतांबा हे विखे यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पुढाकार घेतलेले डॉ. धनंजय धनवटे हे विखेंचे समर्थक आहेत. त्यामुळे विखेंची मदत घेऊन फडणवीस यांनी संप मिटविला, असा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावात ग्रामसभा घेऊन आंदोलन उभारण्याबाबत चळवळ सुरू केली होती. सरकारला निर्णय घेण्यासाठी अगोदरच मुदत देता आली असती. दोन्ही कॉँग्रेसने एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष यात्रा काढली, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या वाटाघाटी विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत होतात, हा सगळाच विरोधाभास आहे. आता दोन्ही कॉँग्रेसनेही आपली संघर्ष यात्रा थांबवून सरकारला निर्णय घेण्यास मुदत देणे सयुक्तिक ठरेल. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केल्यापासून सरकारची यंत्रणा जागी झाली होती. हे आंदोलन कसे थांबविता येईल याची चाचपणी कृषी विभागाचे अधिकारी करत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचे व त्यांची समजूत काढायची अशी रणनीती बहुधा ठरलेली होती. त्यात सरकारला अखेर यश आले. शेतकरी सरकारवर नाराज आहेत, म्हणून ते विरोधकांवर खूश आहे, अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून उद्या नवे नेते उभे राहिले तर ते विरोधकांनाही परवडणारे नाही. त्यामुळेच एकीकडे संघर्षाची व दुसरीकडे वाटाघाटीची भूमिका घेतली जाते. मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला. मात्र, कॉँग्रेस अद्याप काहीही बोललेली नाही हेही विशेष !मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकरी संपातच नाही, बहुधा कॉँग्रेसमध्येही केव्हाच फूट पाडली आहे. कॉँग्रेस नेत्यांचे संघर्ष आणि तडजोड, असे दोन्ही डगऱ्यांवर हात आहेत.