शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

संघर्ष आणि तडजोड

By admin | Updated: May 19, 2017 02:40 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने सरकारच्या विरोधात १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून पडली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी हा संप स्थगित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सरकार आंदोलन मिटविण्याबाबत पुढाकार घेणारच; पण या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते हे विशेष ! फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. पुणतांबा हे विखे यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पुढाकार घेतलेले डॉ. धनंजय धनवटे हे विखेंचे समर्थक आहेत. त्यामुळे विखेंची मदत घेऊन फडणवीस यांनी संप मिटविला, असा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावात ग्रामसभा घेऊन आंदोलन उभारण्याबाबत चळवळ सुरू केली होती. सरकारला निर्णय घेण्यासाठी अगोदरच मुदत देता आली असती. दोन्ही कॉँग्रेसने एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष यात्रा काढली, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या वाटाघाटी विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत होतात, हा सगळाच विरोधाभास आहे. आता दोन्ही कॉँग्रेसनेही आपली संघर्ष यात्रा थांबवून सरकारला निर्णय घेण्यास मुदत देणे सयुक्तिक ठरेल. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केल्यापासून सरकारची यंत्रणा जागी झाली होती. हे आंदोलन कसे थांबविता येईल याची चाचपणी कृषी विभागाचे अधिकारी करत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचे व त्यांची समजूत काढायची अशी रणनीती बहुधा ठरलेली होती. त्यात सरकारला अखेर यश आले. शेतकरी सरकारवर नाराज आहेत, म्हणून ते विरोधकांवर खूश आहे, अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून उद्या नवे नेते उभे राहिले तर ते विरोधकांनाही परवडणारे नाही. त्यामुळेच एकीकडे संघर्षाची व दुसरीकडे वाटाघाटीची भूमिका घेतली जाते. मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला. मात्र, कॉँग्रेस अद्याप काहीही बोललेली नाही हेही विशेष !मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकरी संपातच नाही, बहुधा कॉँग्रेसमध्येही केव्हाच फूट पाडली आहे. कॉँग्रेस नेत्यांचे संघर्ष आणि तडजोड, असे दोन्ही डगऱ्यांवर हात आहेत.