शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

संघर्ष आणि तडजोड

By admin | Updated: May 19, 2017 02:40 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने सरकारच्या विरोधात १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून पडली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी हा संप स्थगित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सरकार आंदोलन मिटविण्याबाबत पुढाकार घेणारच; पण या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते हे विशेष ! फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. पुणतांबा हे विखे यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पुढाकार घेतलेले डॉ. धनंजय धनवटे हे विखेंचे समर्थक आहेत. त्यामुळे विखेंची मदत घेऊन फडणवीस यांनी संप मिटविला, असा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावात ग्रामसभा घेऊन आंदोलन उभारण्याबाबत चळवळ सुरू केली होती. सरकारला निर्णय घेण्यासाठी अगोदरच मुदत देता आली असती. दोन्ही कॉँग्रेसने एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष यात्रा काढली, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या वाटाघाटी विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत होतात, हा सगळाच विरोधाभास आहे. आता दोन्ही कॉँग्रेसनेही आपली संघर्ष यात्रा थांबवून सरकारला निर्णय घेण्यास मुदत देणे सयुक्तिक ठरेल. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केल्यापासून सरकारची यंत्रणा जागी झाली होती. हे आंदोलन कसे थांबविता येईल याची चाचपणी कृषी विभागाचे अधिकारी करत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचे व त्यांची समजूत काढायची अशी रणनीती बहुधा ठरलेली होती. त्यात सरकारला अखेर यश आले. शेतकरी सरकारवर नाराज आहेत, म्हणून ते विरोधकांवर खूश आहे, अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून उद्या नवे नेते उभे राहिले तर ते विरोधकांनाही परवडणारे नाही. त्यामुळेच एकीकडे संघर्षाची व दुसरीकडे वाटाघाटीची भूमिका घेतली जाते. मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला. मात्र, कॉँग्रेस अद्याप काहीही बोललेली नाही हेही विशेष !मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकरी संपातच नाही, बहुधा कॉँग्रेसमध्येही केव्हाच फूट पाडली आहे. कॉँग्रेस नेत्यांचे संघर्ष आणि तडजोड, असे दोन्ही डगऱ्यांवर हात आहेत.