शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विश्वासार्हतेलाच तडा?

By admin | Updated: December 30, 2016 02:54 IST

अंबानी किंवा अदानी यांच्यापेक्षा टाटा उद्योग समूह वेगळा या समजाला पहिला तडा गेला, तो रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया प्रकरणात आले त्यावेळी. गेल्या दोन महिन्यांत टाटा

अंबानी किंवा अदानी यांच्यापेक्षा टाटा उद्योग समूह वेगळा या समजाला पहिला तडा गेला, तो रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया प्रकरणात आले त्यावेळी. गेल्या दोन महिन्यांत टाटा उद्योग समूहात रतन टाटा विरूद्ध सायरस मिस्त्री यांच्यात जे गृहयुद्ध झडले, त्याने ‘टाटा’ या नावाभोवती विश्वासार्हतेचे जे भरभक्कम वलय होते, त्याला आता दुसरा तडा गेला आहे. रतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरच्या संघ मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्या उद्योग समूहाच्या विश्वासार्हतेला लागत असलेल्या ओहोटीला आणखी वेग येईल, असे पाऊल टाकले आहे. राष्ट्रउभारणीच्या कार्यात टाटा उद्योग समूह सामील झाला, तो सर जमशेटजी यांनी उद्योग जगतात आपले बस्तान बसवण्यास सुरूवात केल्यावर. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात घन:श्यामदास बिर्ला किंवा कमलनयन बजाज अथवा मफतलाल व साराभाई असे उद्योगपती आपापल्या परीने हातभार लावत होते. यापैकी बहुतेकांचे महात्मा गांधी यांच्याशी घनिष्ट संबंध होते आणि महात्माजींच्या सामाजिक कार्यात या सगळ्यांचा हातभार लागलेला होता. मात्र उद्योगपतींच्या या मांदियाळीत टाटा यांचे नाव फारसे घेतले जात नसे. टाटा उद्योग समूहाचा प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीला हातभार लागला नसला, तरी देशाच्या आर्थिक प्रगतीत टाटा यांचा वाटा मोठाच होता व आजही आहे. पोलाद, अवजड वाहने, विमान वाहतूक इत्यादी आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पायाभूत उद्योगांच्या उभारणीत टाटा यांचा सिंहाचा वाटा होता. नंतर अलीकडच्या काळात आधुनिक अर्थव्यवहाराला आवश्यक असणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांतही टाटा यांनी आपला जम बसवला. भारताच्या रोजगार निर्मितीच्या कार्यात टाटा उद्योग समूहाचे योगदान लक्षणीय आहे. हे सगळे करीत असतानाच टाटा उद्योग समूह सामाजिक कार्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठीही दमदार पावले टाकत आला आहे. आज टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या विविध सामाजिक विश्वस्त निधींमार्फत आरोग्य, शिक्षण यांपासून ते ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील अनेक गोष्टींवर अर्थसहाय्याबरोबरच तज्ज्ञांचा सल्ला व अंमलबजावणीसाठीही मदत केली जात असते. टाटा उद्योग समूहाइतका सामाजिक कार्यालयातील व्याप इतर कोणाचाच नाही. टाटा उद्योग समूहाला विश्वासार्हतेचे जे भरभक्कम वलय प्राप्त होत गेले, ते एकीकडे अशा जनहिताच्या कामासाठी पुढकार घेतल्याने आणि दुसऱ्या बाजूला सचोटी, पारदर्शकता, कार्यक्षमता या गुणांचा समुच्चय असलेल्या कार्यसंस्कृतीची चौकट मजबूत पायावर उभी करून त्या अंतर्गतच सर्व कंपन्यांचा व्यवहार चालवण्यावर कटाक्ष ठेवल्याने. साध्या मिठापासून ते मोटारी व सॉफ्टवेअरपर्यंत टाटा उद्योग समूहाच्या कोणत्याही उत्पादनाला विश्वासार्हता लाभून ग्राहकांनी त्यावर पसंतीची मोहोर उठवली, ती या कार्यसस्कृतीमुळेच. अर्थात आणखी एक मूलभूत पथ्य टाटा उद्योग समूहाने कायम कसोशीने पाळले. ते म्हणजे राजकारणापासून दूर राहण्याचे. रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया ध्वनिफितीत आल्यामुळे टाटा उद्योग समूह हे पथ्य पाळेनासा झाला आहे की काय, अशी शंकेची पाल चुकचुकली. पुढे टाटा उद्योग समूहातील गृहयुद्धाला तोंड फुटल्यावर रतन टाटा यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या. आता या गृहयुद्धात पहिल्या फेरीत तरी सायरस मिस्त्री यांची मात झाल्याचे दिसू लागल्यावर रतन टाटा सरसंघचालकांना भेटायला गेले. त्यामुळे टाटा उद्योग समूह राजकारणापासून दूर राहत राष्ट्र उभारणीच्या कामात सहभागी होण्याचे पथ्य वाऱ्यावर सोडून देत आहेत काय, या प्रश्नाच्या चर्चेला उधाण येणार आहे. अर्थात संघ करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी हातभार कसा लावता येईल, या संबंधी रतन टाटा व सरसंघचालक यांच्यात चर्चा झाली, असे सांगितले जात आहे. पण हा खुलासा लटका आहे. पहिली गोष्ट म्हणजे संघ जे काही ‘सामाजिक’ काम करीत आहे, ते आजचे नाही. आपल्या ‘वनवासी’ कामाबद्दल संघ कायम सांगत आला आहे. त्यावेळी कधी रतन टाटाच नव्हे, तर त्यांच्या आधी अनेक वर्षे या उद्योग समूहाची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळणारे जेआरडी टाटा यांनाही संघाच्या या ‘सामाजिक कामा’ची दखल घ्यावीशी वाटली नाही. आता तशी ती रतन टाटा यांना वाटत आहे, याचे कारण उघड आहे. ते म्हणजे सायरस मिस्त्री यांच्याशी रतन टाटा हे गृहयुद्ध खेळत आहेत, त्यात राज्यसंस्थेचे, म्हणजेच प्रस्थापित सरकारचे पाठबळ मिळवणे. मोदी हे स्वत:च कुशल राजकीय योद्धे असले, तरी त्यांच्या सरकारला संघाचे कवचकुंडल आहे. त्यामुळे संघाशी संधान बांधून सायरस मिस्त्री यांच्याशी सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या दुसऱ्या फेरीतील यशासाठी आवश्यक असलेल्या राज्यसंस्थेच्या पाठिंब्याची बेगमी टाटा करून ठेऊ पाहात असावेत. रतन टाटा यांनी टाकलेले पाऊल म्हणजे त्यांच्या आधीचे या उद्योग समूहाचे प्रमुख ‘जेआरडी’च नव्हेत, तर अन्य सर्व पूर्वसुरींनी जी भूमिका धारण केली होती, तिला छेद देण्याच्या वाटेवरील पहिले पाऊल ठरण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय ‘दुनिया मेरी मुठ्ठी मे’ असे घोषवाक्य बनवणाऱ्या आणि ‘ये पार्टी तो हमारी दुकान है’ अशी दर्पोक्ती करणाऱ्या उद्योगपतींच्या रांगेत बसण्याच्या दिशेनेही टाकलेले हे पहिले पाऊल ठरणार असेल तर ते जमिनीपासून चार अंगुळे वरतून चालणारा टाटा समूहाचा रथ जमिनीवर आणणेही ठरेल.