शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

समाजाभिमुख उद्योजक

By admin | Updated: May 7, 2016 02:34 IST

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी ज्यांनी आकाशाएवढे कर्तृत्व गाजविले त्यामध्ये प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव ठळकपणे समोर येते. कल्पकतेने आणि सकारात्मक विचारांनी त्यांनी परिस्थितीवर मात केली. आजच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये प्रल्हादजींचा जन्म झाला. वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने घरची सगळी जबाबदारी अंगावर पडली. १० रुपये पगाराची नोकरी करीत असताना देशाची फाळणी झाली. या आघाताने छाब्रिया कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. अमृतसरमध्ये नोकरी करीत असताना परिचितांनी पुण्यात बोलावले. अगदी ३० रुपये पगार असलेली चांगली नोकरीही मिळाली; पण उद्यमशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बुधवार पेठेत त्यांनी इलेक्ट्रॉनिकचे दुकान टाकले. कापडविक्री केली. सायकलवर फिरून उपकरणांची विक्री सुरू केली. १९६०च्या दशकात महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाची पहाट फुटत होती. या वेळी फिनोलेक्स केबल या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल आणि ठिबक सिंचन यंत्रणा त्यांनी सादर केल्या. फिनोलेक्स पाइपने जगभर झुळझुळ पाणी फिरू लागले. इस्राईलच्या कंपन्यांनाही फिनोलेक्सशी सहकार्याचे करार करावे लागले. अवघ्या ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उद्योगसमूहाची आजची उलाढाल १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाळणीचे अश्रू अनुभवतानाच माणुसकीचा गहिवरही पाहिलेल्या प्रल्हादजींनी समाजाशी आपली नाळ कायम ठेवली. ते उत्तम मराठी बोलायचे. समाजासाठी सतत काही ना काही करण्याची त्यांना तळमळ होती. सामाजिक क्षेत्रातील कामासाठी त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ व ‘होप फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. नवे अभियंते घडविण्यासाठी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन फिनोलेक्स अकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. हिंजवडी येथे इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू केली. रत्नागिरीमध्ये शाळा सुरू केली. उद्योजकतेतून सामाजिक विकासाचा आदर्श त्यांनी घालून दिला. उद्योजकता पेरत, सामाजिक भान बाळगत आपण समाजाचे काही देणे लागतो, असे मानणाऱ्या पुण्यातील उद्योजकतेच्या सुसंस्कृत परंपरेतील एक शिलेदार प्रल्हाद छाब्रिया यांच्या रूपाने गमावला आहे.