शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाभिमुख उद्योजक

By admin | Updated: May 7, 2016 02:34 IST

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी ज्यांनी आकाशाएवढे कर्तृत्व गाजविले त्यामध्ये प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव ठळकपणे समोर येते. कल्पकतेने आणि सकारात्मक विचारांनी त्यांनी परिस्थितीवर मात केली. आजच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये प्रल्हादजींचा जन्म झाला. वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने घरची सगळी जबाबदारी अंगावर पडली. १० रुपये पगाराची नोकरी करीत असताना देशाची फाळणी झाली. या आघाताने छाब्रिया कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. अमृतसरमध्ये नोकरी करीत असताना परिचितांनी पुण्यात बोलावले. अगदी ३० रुपये पगार असलेली चांगली नोकरीही मिळाली; पण उद्यमशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बुधवार पेठेत त्यांनी इलेक्ट्रॉनिकचे दुकान टाकले. कापडविक्री केली. सायकलवर फिरून उपकरणांची विक्री सुरू केली. १९६०च्या दशकात महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाची पहाट फुटत होती. या वेळी फिनोलेक्स केबल या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल आणि ठिबक सिंचन यंत्रणा त्यांनी सादर केल्या. फिनोलेक्स पाइपने जगभर झुळझुळ पाणी फिरू लागले. इस्राईलच्या कंपन्यांनाही फिनोलेक्सशी सहकार्याचे करार करावे लागले. अवघ्या ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उद्योगसमूहाची आजची उलाढाल १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाळणीचे अश्रू अनुभवतानाच माणुसकीचा गहिवरही पाहिलेल्या प्रल्हादजींनी समाजाशी आपली नाळ कायम ठेवली. ते उत्तम मराठी बोलायचे. समाजासाठी सतत काही ना काही करण्याची त्यांना तळमळ होती. सामाजिक क्षेत्रातील कामासाठी त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ व ‘होप फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. नवे अभियंते घडविण्यासाठी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन फिनोलेक्स अकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. हिंजवडी येथे इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू केली. रत्नागिरीमध्ये शाळा सुरू केली. उद्योजकतेतून सामाजिक विकासाचा आदर्श त्यांनी घालून दिला. उद्योजकता पेरत, सामाजिक भान बाळगत आपण समाजाचे काही देणे लागतो, असे मानणाऱ्या पुण्यातील उद्योजकतेच्या सुसंस्कृत परंपरेतील एक शिलेदार प्रल्हाद छाब्रिया यांच्या रूपाने गमावला आहे.