शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - यूपीचा कायापालट

By admin | Updated: March 29, 2017 00:56 IST

बिहारपाठोपाठ शेजारील उत्तर प्रदेशातही योगी महाराजांच्या संगतीने साक्षात रामराज्यच अवतरणार की काय, अशी आशा निर्माण झाली आहे

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारूबंदी केल्यापासून बिहारमधील लोक दूध प्यायला लागलेत म्हणे. परिणामी येथील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली. एवढेच नाही तर अनेकजण वाल्याचे वाल्मीकी होऊन आज सात्त्विक जीवन जगताहेत, असे कळते. हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा की आता बिहारपाठोपाठ शेजारील उत्तर प्रदेशातही योगी महाराजांच्या संगतीने साक्षात रामराज्यच अवतरणार की काय, अशी आशा निर्माण झाली आहे. गोरखपूरच्या मठाधिपतिपदावरून राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले योगी आदित्यनाथ यांनी सत्तासूत्रे स्वीकारताच उत्तर प्रदेशची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दोन दिवसातच त्यांनी अनधिकृत कत्तलखाने बंद करविले. सडकछाप मजनूंच्या बंदोबस्ताकरिता अ‍ॅन्टी रोमिओ स्क्वॉड सक्रिय केले. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेने सर्वात मोठी कोंडी झाली ती सरकारी कर्मचाऱ्यांची. त्यांचे गुटखा, पानमसाले, तंबाखू खाणेच बंद केल्याने कार्यालयात वेळ घालवायचा कसा, असा गंभीर प्रश्नच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कार्यालयात पानतंबाखू खाऊन भिंतीवर पिचकाऱ्या उडविणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच. तोसुद्धा योगींनी हिरावून घेतलाय. राज्याचे दोन मंत्री आणि काही अधिकारी हातात झाडू घेत साफसफाई करताना दिसले तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही मोठा हेवा वाटला. अधिकारी एवढी चांगली झाडझूड करतात हे माहिती असते तर आम्हीसुद्धा त्यांच्याकडून ही कामे करवून घेतली असती, असा टोमणा त्यांनी मारलाच. एकंदरीतच सांगायचे झाले तर नजीकच्या काळात आपल्याला या राज्याचा चेहरामोहरा बदलेला दिसणार हे नक्की. परंतु भाजपा आणि योगी आदित्यनाथांच्या विरोधकांनी मात्र या स्वच्छतेच्या झपाट्यात वेगळाच सूर लावलाय. योगी केवळ शाळा कार्यालयातील स्वच्छता आणि मजनूंना पकडण्यासच प्राधान्य देणार काय? राज्यातील खऱ्या रोगांवर ते उपचार करणार की नाहीत याबद्दलची साशंकता त्यांच्या मनात आहे. अल्पसंख्यकांवरील वाढते अत्याचार, धार्मिक तेढ, दंगलखोरी, महिला आणि दलितांविरुद्धचे गुन्हे, आरोग्याचा भीषण प्रश्न, भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलीस खाते या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. योगींनी घेतलेल्या निर्णयांचा अर्थ आणि उद्दिष्ट शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी सध्या चालविला आहे. तेही बरोबरच आहे. माणसाचा स्वभाव काही एका दिवसात बदलत नाही. योगींमध्ये अचानक जो बदल झालाय, त्यांच्या बोलण्यातून सामंजस्याचा जो सूर निघू लागलाय त्यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसण्याचे कारण नाही. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’ हे फक्त बोलण्यापुरतेच राहणार काय अशी भीती लोकांना आहे.