शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - सरपंच सातवी पास!

By admin | Updated: July 4, 2017 00:16 IST

नगराध्यक्षांप्रमाणे सरपंचांची निवडही यापुढे थेट जनतेतून केली जाणार आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या

नगराध्यक्षांप्रमाणे सरपंचांची निवडही यापुढे थेट जनतेतून केली जाणार आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमात सुधारणा करणारा कायदा विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात पारित झाला की, या थेट निवडीचा मार्ग मोकळा होईल. राज्यात अलीकडे झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला. ‘गांव से संसद तक’ हे भाजपाचे मिशन आहे. २०१९ च्या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून या मिशनकडे पाहिले जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे या पक्षाचे वारू सध्या चौफेर आहेत. राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती आहेत. गेली अनेक वर्षे ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली सरपंचांची निवड केली जात होती. निवडून आलेले सदस्यच सरपंचपदासाठी मतदान करू शकत होते. आता सरपंच निवडीचे अधिकार ग्रामस्थांना मिळाले आहेत. सरपंच हे घटनात्मक पद आहे. पंचायत राज कायद्याने ग्रामसभेचे अधिकार वाढवले, पण सरपंच नामधारीच ठेवले. आता सरपंच आणि ग्रामसभेचे अधिकार वाढणार आहेत, हे स्वागतार्ह आहे. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींकडे बक्कळ पैसा आलेला आहे. या निधीवर डोळा ठेवून सरपंच पदासाठी बोली लावण्याचे आणि राजकीय सोयीसाठी, भाऊबंदकीसाठी अविश्वास ठराव आणून वर्षाला सरपंच बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. नव्या तरतुदीमुळे या गोष्टींना चाप बसेल. सरपंच पदासाठी किमान सातवी पासची अट लागू केल्याने सुशिक्षित तरुणांना वाव मिळेल. ग्रामपंचायती आता डिजिटल होत आहेत. सातबारा, जन्म-मृत्यू दाखला, रहिवास प्रमाणपत्र आदी आवश्यक दाखले आॅनलाईन मिळण्याची सोय झाली आहे. त्यासाठी सरपंच पदावरील व्यक्ती सुशिक्षितच हवी. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामविकासाला चालना देण्यासाठी या नव्या बदलाचे स्वागतच होईल. आरक्षित जागेवर ‘डमी’ उभा करून उपसरपंचाच्या माध्यमातून कारभार करण्याच्या प्रकारांनादेखील चाप बसेल. यापुढे सरपंच हेच ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. तशी तरतूद कायद्यात होऊ घातली आहे. त्यामुळे एखाद्या वजनदार व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा गुंडाळून टाकण्याचे प्रकार थांबतील. प्रश्न एवढाच आहे की, या थेट निवडीमुळे सरपंच एका पक्षाचा आणि ग्रामपंचायतीत बहुमत दुसऱ्याच पक्षाचे अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यातून नव्या वादाला तोंड फुटू शकते. अनेक नगरपालिकांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे.