शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:29 IST

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत.

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांचे आकार तर एवढे मोठे आहेत, की छोट्या वाहनांचे संपूर्ण चाकच त्यामध्ये सामावते. परिणामी, वाहनचालकांना व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहनांच्या सरासरी वेगावर मर्यादा येऊन, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो, मनस्ताप सहन करावा लागतो, तो वेगळाच! खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळा संपला, की हे चित्र दिसते. यावर्षी तर विदर्भात फारसा पाऊसही झाला नाही. तरीदेखील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते निर्माणाचे निकृष्ट प्रतिचे काम आणि अत्यंत सुमार दर्जाची देखभाल व दुरुस्ती, हे त्यामागचे एक कारण आहे. आपल्या देशात रस्त्यांच्या कामात एवढा प्रचंड भ्रष्टाचार होतो, की वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेत उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितीची अपेक्षाच करता येत नाही. भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात, की भ्रष्टाचाराची वारंवार संधी मिळावी यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविल्या जातात? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर तर ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही. बहुधा रस्ते लवकरात लवकर खराब व्हावे आणि पुन्हा भ्रष्टाचाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठीच रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्या जात नसावी! डांबर आणि पाणी यांचे शत्रुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे रस्ते हवे असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणार नाही, अशी व्यवस्था हवी. दुर्दैवाने आपल्या देशात बहुतांश रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्याची सोयच नसते. एखाद्या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेल्या वस्तूंना, तो चिकट पदार्थ विरघळवून विलग करणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. डांबर या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेली खडी म्हणजे रस्ता! पाऊस पडला, की रस्त्यावर पाणी गोळा होते, वाहनांच्या टायरच्या दबावामुळे ते पाणी रस्त्याच्या पृष्ठभागाखाली शिरते, डांबराला विरघळवते आणि परिणामी खडी सुटी होऊन खड्डे पडतात! रस्त्यांवर खड्डे पडायला नको असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणारच नाही, अशा प्रकारे रस्त्यांचे निर्माण करायला हवे. त्यासाठी रस्त्यांना कडांच्या दिशेने उतार हवा आणि तेथून पाण्याचा सहज निचरा करण्याची व्यवस्था हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा साचून तुंबणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने यापैकी काहीही होत नाही आणि त्याचा परिपाक म्हणजे चाळणी झालेले रस्ते!

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा