शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:29 IST

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत.

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांचे आकार तर एवढे मोठे आहेत, की छोट्या वाहनांचे संपूर्ण चाकच त्यामध्ये सामावते. परिणामी, वाहनचालकांना व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहनांच्या सरासरी वेगावर मर्यादा येऊन, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो, मनस्ताप सहन करावा लागतो, तो वेगळाच! खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळा संपला, की हे चित्र दिसते. यावर्षी तर विदर्भात फारसा पाऊसही झाला नाही. तरीदेखील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते निर्माणाचे निकृष्ट प्रतिचे काम आणि अत्यंत सुमार दर्जाची देखभाल व दुरुस्ती, हे त्यामागचे एक कारण आहे. आपल्या देशात रस्त्यांच्या कामात एवढा प्रचंड भ्रष्टाचार होतो, की वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेत उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितीची अपेक्षाच करता येत नाही. भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात, की भ्रष्टाचाराची वारंवार संधी मिळावी यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविल्या जातात? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर तर ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही. बहुधा रस्ते लवकरात लवकर खराब व्हावे आणि पुन्हा भ्रष्टाचाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठीच रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्या जात नसावी! डांबर आणि पाणी यांचे शत्रुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे रस्ते हवे असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणार नाही, अशी व्यवस्था हवी. दुर्दैवाने आपल्या देशात बहुतांश रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्याची सोयच नसते. एखाद्या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेल्या वस्तूंना, तो चिकट पदार्थ विरघळवून विलग करणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. डांबर या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेली खडी म्हणजे रस्ता! पाऊस पडला, की रस्त्यावर पाणी गोळा होते, वाहनांच्या टायरच्या दबावामुळे ते पाणी रस्त्याच्या पृष्ठभागाखाली शिरते, डांबराला विरघळवते आणि परिणामी खडी सुटी होऊन खड्डे पडतात! रस्त्यांवर खड्डे पडायला नको असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणारच नाही, अशा प्रकारे रस्त्यांचे निर्माण करायला हवे. त्यासाठी रस्त्यांना कडांच्या दिशेने उतार हवा आणि तेथून पाण्याचा सहज निचरा करण्याची व्यवस्था हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा साचून तुंबणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने यापैकी काहीही होत नाही आणि त्याचा परिपाक म्हणजे चाळणी झालेले रस्ते!

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा