शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:29 IST

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत.

सध्या विदर्भातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जिल्हा मार्ग असोत, की राज्य व राष्ट्रीय महामार्ग, काही अपवाद वगळता, बहुतांश रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. काही खड्ड्यांचे आकार तर एवढे मोठे आहेत, की छोट्या वाहनांचे संपूर्ण चाकच त्यामध्ये सामावते. परिणामी, वाहनचालकांना व प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहनांच्या सरासरी वेगावर मर्यादा येऊन, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो, मनस्ताप सहन करावा लागतो, तो वेगळाच! खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळा संपला, की हे चित्र दिसते. यावर्षी तर विदर्भात फारसा पाऊसही झाला नाही. तरीदेखील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते निर्माणाचे निकृष्ट प्रतिचे काम आणि अत्यंत सुमार दर्जाची देखभाल व दुरुस्ती, हे त्यामागचे एक कारण आहे. आपल्या देशात रस्त्यांच्या कामात एवढा प्रचंड भ्रष्टाचार होतो, की वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेत उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितीची अपेक्षाच करता येत नाही. भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात, की भ्रष्टाचाराची वारंवार संधी मिळावी यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविल्या जातात? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर तर ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही. बहुधा रस्ते लवकरात लवकर खराब व्हावे आणि पुन्हा भ्रष्टाचाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठीच रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्या जात नसावी! डांबर आणि पाणी यांचे शत्रुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे रस्ते हवे असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणार नाही, अशी व्यवस्था हवी. दुर्दैवाने आपल्या देशात बहुतांश रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्याची सोयच नसते. एखाद्या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेल्या वस्तूंना, तो चिकट पदार्थ विरघळवून विलग करणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. डांबर या चिकट पदार्थाच्या साहाय्याने एकत्र जोडलेली खडी म्हणजे रस्ता! पाऊस पडला, की रस्त्यावर पाणी गोळा होते, वाहनांच्या टायरच्या दबावामुळे ते पाणी रस्त्याच्या पृष्ठभागाखाली शिरते, डांबराला विरघळवते आणि परिणामी खडी सुटी होऊन खड्डे पडतात! रस्त्यांवर खड्डे पडायला नको असतील, तर रस्त्यांवर पाणी थांबणारच नाही, अशा प्रकारे रस्त्यांचे निर्माण करायला हवे. त्यासाठी रस्त्यांना कडांच्या दिशेने उतार हवा आणि तेथून पाण्याचा सहज निचरा करण्याची व्यवस्था हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा साचून तुंबणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने यापैकी काहीही होत नाही आणि त्याचा परिपाक म्हणजे चाळणी झालेले रस्ते!

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा