शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या गणिताची गोळा-बेरीज

By admin | Updated: June 25, 2017 01:35 IST

शालेय स्तरावर शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते अथवा विद्यार्थी नापास होत असतात. परिणामी शैक्षणिक नुकसान होते

पूजा दामलेशालेय स्तरावर शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते अथवा विद्यार्थी नापास होत असतात. परिणामी शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या आठवड्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दहावीसाठी गणित ऐच्छिक विषय ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना राज्य शिक्षण मंडळाला दिली. न्यायालयाच्या या सूचनेनंतर विविध स्तरांवर चर्चा रंगल्या. यामध्ये अनेकांनी याला पसंती दिली, पण शिक्षक स्तरातून याला कडाडून विरोध झाला. गणित हा विषय खरोखरच उपयुक्त आहे का नाही, याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेतले.घरात शालेय विद्यार्थी असल्यावर ‘अभ्यासाला बस’ हे वाक्य नेहमीच ऐकायला मिळते. पण अभ्यास कर म्हणजे नक्की काय, याचे उत्तर हे अनेकदा पाठांतर करणे असेच असते. कारण, गेल्या कित्येक वर्षांत शिक्षण व्यवस्थेत मूलत: बदल झाले नाहीत. अभ्यासक्रमात बदल करण्यात येतो, पण हे बदल म्हणजे ठिगळ लावण्याचा प्रकार असतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला या अभ्यासक्रमातून चालना मिळत नसल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी व्यक्त केले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या गणितामुळे त्यांचे व्यवहार ज्ञान वाढते. आयुष्यात, व्यवहारात उपयुक्त असणारे गणिताचे ज्ञान त्यांना मिळते. पण इयत्ता आठवीनंतर शिकवल्या जाणाऱ्या गणिताचा व्यवहारात तितकासा उपयोग होत नाही. पण विद्यार्थ्यांवर हा विषय लादला जातो. गणित विषय ऐच्छिक केल्यावरही जवळपास ८० टक्के विद्यार्थी गणित विषयालाच पसंती देतील. दहावीत ९५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी १२ वीला अनेकदा ६५ टक्क्यांवर येतो आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणावेळी त्याला केटी लागतात. यावरून स्पष्ट होते की, दहावीचे शिक्षण, गुण हे पाठांतरावर असतात. याउलट परिस्थिती ही इंटरनॅशनल बोर्डच्या अभ्यासक्रमाची आहे. विद्यार्थ्यांच्या ‘क्रिटिकल थिकिंग’ला तेथे वाव मिळतो. आपल्या बोर्डाच्या अभ्यासक्रमात साचेबद्ध उत्तरे अपेक्षित असतात. यामुळे विद्यार्थ्यांची पाठांतर क्षमता वाढते, पण विचार क्षमता वाढत नाही. त्यामुळे अभ्यासाच्या रचनेविषयी विचार व्हायला हवा. गणित विषय ऐच्छिक करणे ही पहिली पायरी आहे. प्रत्यक्षात संपूर्ण अभ्यासक्रमात बदल करणे अपेक्षित आहे. सत्तरच्या दशकात बोर्डाकडे गणिताचे तीन पर्याय होते. गणित विषयाची आवड नसलेले विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय शिकतील. अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. भांडुप येथील सरस्वती विद्यामंदिरमधील शिक्षक लीलाधर महाजन यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासाठी गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गणित विषय ऐच्छिक केल्यास व्यवहार आणि पर्यायाने आयुष्यात विद्यार्थी मागे पडतील. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात रस नसतो, अशा विद्यार्थ्यांना दहावीनंतर कला, वाणिज्य शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण दहावीपर्यंत गणित शिकणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.गणित विषय हा कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण सोडतात, नापास होतात हे विधान योग्य नाही. गणित विषयात आलेख, सांख्यिकी आणि संभाव्यता हे धडे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना गुण मिळवता येतात. यामधून विद्यार्थ्यांना २० ते २५ गुण सहज मिळतात. शाळेकडून विद्यार्थ्यांना १५ ते २० गुण मिळतात. त्यामुळे विद्यार्थी ३५ ते ४० गुण सहज मिळवू शकतो. अन्य विषयांत पाठांतर लागते, पण गणित विषयामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. गणित हा सरावाचा विषय आहे. दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध आहे. गणितच ऐच्छिक का, दहावीपर्यंत विद्यार्थी इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, मराठी हे विषयही शिकत असतो. गणितामुळे नफा, तोटा, बेरीज, गुणाकार, क्षेत्रफळ अशा विषयांचे ज्ञान मिळते. त्यामुळे या विषयाची आवड असणारे विद्यार्थी पुढे जाऊन जीवनात वेगळे काही तरी करून दाखवतात हे निश्चित. त्यामुळे गणित विषयाला पर्याय नको, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.

poojadamle.15@gmail.com