शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराची कोंडी फोडण्यातही युती!

By admin | Updated: November 4, 2016 04:46 IST

उसाच्या पहिल्या उचलीचा प्रश्न सोडविताना चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारची बाजू सक्रिय सहभाग घेऊन सांभाळली.

उसाच्या पहिल्या उचलीचा प्रश्न सोडविताना चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारची बाजू सक्रिय सहभाग घेऊन सांभाळली. शिवाय सत्तेत युती असलेल्या स्वाभिमानी या घटक पक्षालाही सांंभाळले. संवादाने प्रश्न सुटू शकतात, हेच दाखवून दिले.पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागातील शेतकऱ्यांची पंधरावी ऊस परिषद जयसिंगपूर येथे नुकतीच पार पडली. परिषदेत ऊसाला दर देण्याची मागणी केली जाणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या परिषदेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम परिषदेवर होईल, असा प्रचार सोशल मीडियावर करण्यात येत होता, कारण एकच, संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी जैन समाजातून येतात. त्यांनी मराठा क्रांती मोर्चात सक्रिय सहभाग घेतला नाही, असाही आक्षेप घेतला जात होता. मात्र, राजू शेट्टी यांनी दोन वर्षांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेच्या व्यासपीठावर प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. शिवाय मराठा समाजाच्या दु:खाचे मूळ शेतीविषयी शासनाच्या दुर्लक्षात असल्याची व परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती थांबली असल्याची भूमिका वारंवार मांडली होती.स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सत्तारूढही झाली असून संघटनेचे नेते सदाभाऊ खोत राज्याचे कृषी राज्यमंत्री आहेत. या आधी ऊस परिषदेत साखर कारखानदारांबरोबरच सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. आघाडी सरकारच्या धोरणांमुळेच उसाला अधिकचा दर मिळत नाही, असा प्रचार करण्यात येत होता. आता सरकारमध्येच शेतकरी संघटना असल्याने संघर्षाची वेळ आली तर मार्ग कसा काढला जाणार, याचीही उत्सुकता होती. आघाडीचे सरकार सत्तेवर असताना, आम्ही मधे पडणार नाही, चर्चा करणार नाही, साखर कारखाने शेतकऱ्यांचेच आहेत, तेव्हां त्यांनीच ठरवावे, अशी भूमिका सरकारकडून घेतली जात होती. त्यामुळे वारंवार संघर्षाचे प्रसंग उद्भवले. त्याचवेळी कारखान्यांना गाळप सुरू करायचा असतानाच शेतकरी संघटनेला दर वाढवून घेऊन चळवळीला यश मिळते आहे, हे दाखवून द्यायचे होते. परिणामी, शेतकरी संघटनेची प्रतिमा उंचावत गेली. राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे उसाला अधिकाधिक दर मिळू लागला, यावर शेतकऱ्यांचा ठाम विश्वास होता आणि आजही तो आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या संघटनेच्या चळवळीला बळ देताना जात-पात पाहिली नाही. त्यांनी खासदारकीची निवडणूक लढविली, तेव्हाही जाती-पाती पलीकडे जाऊन दोनदा त्यांना मोठ्या बहुमताने निवडून दिले.यंदा परिस्थती थोडी वेगळी होती. स्वाभिमानी सत्ताधारी झाली होती. दराची कोंडी कशी फुटणार, याबाबत जनमानसात उत्सुकता होती. गळीत हंगाम कधी सुरू होणार, पहिली उचल किती मिळणार याचीच चर्चा कोल्हापुरात रंगली होती. ऊस परिषदेत मागणी केली असली तरी प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल देणे शक्य नाही, हे सर्वांना माहीत होते. मात्र, गत वर्षी साखरेचे दर पडलेले असताना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर घेण्यात आला. शिवाय तो दर दोन टप्प्यांत देण्यात आला होता. महाराष्ट्रातील सुमारे २८ साखर कारखान्यांना अद्यापही त्यातील १२८ कोटी रुपये द्यायचे आहेत. या पार्श्वभूमीवर रास्त आणि किफायतशीर भावापेक्षा (एफआरपी) किमान २०० ते ३०० रुपये अधिक दर दिला जावा, अशी भूमिका होती. दराची ही कोंडी फोडण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिवाळीच्या सुटीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. शेतकरी संघटना प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रमुख यांच्यात चर्चा घडवून आणली. चचअंती तोडगा निघाला. संवादाने प्रश्न सुटू शकतात, हेच दाखवून दिले. ‘एफआरपी’पेक्षा प्रतिटनास १७५ रुपये जादा दर मिळविण्यात यश मिळवून शेतकरी संघटनाही उपकृत झाली. एक प्रकारे सत्ताधारी युतीतील पक्षांनी कोंडी फोडण्यातही युती केली, असे म्हणायला हरकत नाही. गत वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाची उपलब्धता कमी असताना संघर्षाची वेळ येणे योग्य नव्हते. शिवाय गळीत हंगाम लांबणेही साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी योग्य नव्हते. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणातील ही युती संघर्ष टाळू शकली, हीच जमेची बाजू आहे.- वसंत भोसले