शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बंद करा ही दुकानदारी

By admin | Updated: November 8, 2016 03:54 IST

केवळ उद्देश चांगला असून भागत नाही, तर त्याच्या पूर्तीची आकांक्षा गरजेची असते. ती नसेल तर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात आदिवासी आणि विमुक्त जाती

केवळ उद्देश चांगला असून भागत नाही, तर त्याच्या पूर्तीची आकांक्षा गरजेची असते. ती नसेल तर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात आदिवासी आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली आश्रमशाळांची योजना! या शाळांमधील कोवळ्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या पुढारलेपणाची लक्तरे देशभर टांगली गेली असतानाच, बुलडाणा जिल्ह्यातील पाळा येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लंैगिक अत्याचारांच्या प्रकरणामुळे तर राज्य सरकारच्या अब्रूचेच धिंडवडे निघाले आहेत. राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील मागास जाती-जमातींमधील विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे, या चांगल्या उद्देशाने आश्रमशाळांची योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. राज्यात सध्या ५४७ शासकीय, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांवरील तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनादी खर्चाचा संपूर्ण भार शासन पेलते. पण या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात दुकानदारी सुरू असल्यानेच पाळासारखी प्रकरणे समोर येतात. विद्यार्थ्यांना सकस भोजनासोबत दूध, केळी, अंडी, टूथपेस्ट, हेअर आॅईल, रेनकोट, स्वेटरही पुरविले जात असले तरी ते केवळ कागदोपत्रीच! प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होतो. बहुतांश विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सरकार आपल्यासाठी असा काही खर्च करते, याची गंधवार्ताच नसते.दहा वर्षात केवळ १९ आश्रमशाळांमध्ये तब्बल १०७७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे विदारक सत्य डॉ. सुभाष साळुंखे समितीने नुकतेच उघडकीस आणले. त्यापैकी काही मृत्यू नैसर्गिक व अपघाती असले तरी, प्रामुख्याने कुपोषण आणि आरोग्य सुविधांचा अभाव या दोन बाबीच कोवळ्या बालकांच्या जीवावर उठल्याचे स्पष्टपणे दिसते. अर्थात अपवाद म्हणून काही आदर्श आश्रमशाळा व निवासी शाळाही सुरू असून त्यातील काही तर अनुदानाविना सुरू आहेत.शंभरपेक्षा जास्त बेवारस गतिमंद, मूक-बधिर व बहुविकलांग मुलांचे मातापिता झालेल्या शंकरबाबा पापळकरांद्वारे संचलित स्व. अंबादासपंत बालसुधारगृह, बालपणी उकिरड्यावरचं जीणं जगून, आता फासेपारधी समाजातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भीक मागणाऱ्या मतीन भोसलेंची प्रश्नचिन्ह ही निवासी आश्रमशाळा, प्रा. रमेश बुटेरे यांनी अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी येथे साकारलेली आदर्श आश्रमशाळा, डॉ. प्रकाश आमटेंद्वारा नक्षलग्रस्त भागात चालविला जात असलेला लोक बिरादरी प्रकल्प आश्रमशाळा यांसारखी निराशेच्या समुद्रातील आशेची बेटं, अजूनही सगळं काही संपलं नसल्याची उमेद देतात इतकंच. त्यामुळे अब्रूचे निघाले तेवढे धिंडवडे पुरे झाले, असे सरकारला वाटत असल्यास अशा अनुदानित आश्रमशाळांची दुकानदारी सरकारने ताबडतोब बंद करायला हवी. पण म्हणून ही योजनाच बंद होता कामा नये. गरज आहे योजनेच्या प्रामाणिक अंमलबजावणीची! ती कशी करता येईल, याचा आदर्श वस्तुपाठ पापळकर, भोसले, बुटेरे, आमटे यांनी घालून दिला आहे. केवळ स्वपक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांची पोटं भरण्याची सोय लावण्याऐवजी, सेवाभावी वृत्तीच्या धडपड्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या हाती या आश्रमशाळा दिल्यास, सरकारचा पैसा सत्कारणी लागेल व समाजाच्या वंचित घटकांमधील मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गही मोकळा होऊ शकेल. फडणवीस सरकारने जलसंधारणाच्या क्षेत्रात सुरेश खानापूरकर, पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी निर्माण केलेल्या आदर्श प्रणालींचा अंगिकार करून जलयुक्त शिवारसारखी एक आशादायी योजना जन्माला घातली. आश्रमशाळा व निवासी शाळांच्या संदर्भातही सरकार तोच कित्ता गिरवू शकते. तसे झाले तरच या क्षेत्रातही महाराष्ट्र उर्वरित देशासमोर एक आदर्श उभा करू शकेल. - रवी टाले