शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

कालचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:21 IST

एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते.

प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे फळ इतरांपेक्षा वेगळे असते. जीवनात एखाद्याला लवकर तर एखाद्याला उशिराने यश प्राप्त होते. प्रत्येकाचे आयुष्यमान वेगळे असते. एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते. एखाद्याच्या जीवनात आनंद तर एखाद्याचे जीवन दु:खाने भरलेले असते. असे का होते, हे एक मोठे रहस्य आहे. या रहस्याला समजून घेण्यासाठी विश्वातील विचारवंतांनी खूप चिंतन केलेले आहे व आपआपले विचार मांडलेले आहेत. संस्कृत साहित्याचे प्रख्यात नाटककार भास यांनी सांगितलेले आहे-कालक्र मेण जगत: परिवर्तमानाचक्रारपङ्क्तिरिव गच्छति भाग्यपङ्क्ति:म्हणजेच कालक्र मानुसार बदलणाऱ्या या विश्वातील भाग्यरेषा चक्र रेषेनुसार बदलत असतात. ज्याप्रमाणे चक्र खाली-वर होत असते, त्याप्रमाणे मानवाचे भाग्य सुध्दा वर-खाली होत असते. असे दिसून येते की समान प्रयत्न करणाºया दोन व्यक्तींना समान यश मिळत नाही. विश्वातील या रहस्यमय बाजूस तत्ववेत्त्यांनी कालचक्र असे संबोधले आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की मी काळ आहे, जो सर्वांना संचलित करतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा मानव कर्म करतो, तेव्हा त्याचे काही कर्म असे असतात, ज्याचे तात्काळ फळ मिळत नाही, तर ते कर्म निसर्गाच्या कुशीत साचलेले असतात व अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते प्रकट होतात. या कर्मफळांचा प्रकट होण्याचा एक काळ असतो. पराकाष्ठेचे कर्म केल्यानंतरसुध्दा काही कर्मफळे तात्काळ प्रकट होत नाहीत. बºयाच वेळा असे दिसून येते की, खूप कमी कर्म केल्यानंतरही फळाची प्राप्ती लवकर होेते.विचारवंतांच्या मते- कर्मफळांचे हे प्रकटीकरण कालचक्रानुसार होते. हे कालचक्र कसे काम करते हे एक मोठे रहस्यच आहे. कालचा राजा आज रंक व कालचा रंक आज राजा कसा बनतो, हे समजणे कठीण आहे. कालचक्रामध्ये बदल करणे खूप कठीण आहे. परंतु आपण कर्म व धैर्याने त्याचा सामना करू शकतो. सतत योग्य कर्माचे अनुपालन व परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आपल्याला या कालचक्र ाच्या विळख्यातून वाचवू शकतात. योग्य वेळ, योग्य कर्माचे अधिष्ठान व कर्मफळास उशीर झाला तरीही धैर्याचे धारण, आपल्याला दृढ, मानिसक व शारीरिक स्वास्थ्य प्रदान करतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक